शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

coronavirus: मोदी सरकार पुन्हा लॉकडाऊनवर करतंय विचार? प्रकाश जावडेकरांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 18:29 IST

Coronavirus in India : फेब्रुवारी महिन्यापासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. त्यातच मार्च महिन्यात देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे.

नवी दिल्ली -  जानेवारी महिन्यामध्ये देशातील कोरोनाचा (Coronavirus)संसर्ग जवळपास नियंत्रणात आला असे वाटत असतानाच फेब्रुवारी महिन्यापासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. त्यातच मार्च महिन्यात देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रामध्ये तर  काही मोठ्या शहरांत लॉकडाऊन (lockdown ) करण्याचे संकेत आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार लॉकडाऊनचा विचार करतंय का? अशी विचारणा केली असता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी सूचक उत्तर दिले आहे. (Modi government thinking of lockdown again? The answer given by Prakash Javadekar)

आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत बैठकील निर्णयांची माहिती घेतली. यावेळी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वाढत असलेल्या निर्बंधांमुळे लॉकडाऊन लागणार का, अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे, अशी विचारणा केली असता प्रकाश जावडेकर म्हणाले की, केंद्र सरकार ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, आम्ही अशा राज्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. कोरोना व्यवस्थापनाचे उपाय गतवर्षी सर्व लोकांनी पाहिले आहेत. आताही कोरोना व्यवस्थापन रोग्य रीतीने झाले तर कोरोनाचा फैलाव होणार नाही. जावडेकर यांच्या म्हणण्याचा अर्थ सरकारकडून लॉकडाऊन लावण्याबाबत किंवा थांबवण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून  आहे. 

दरम्यान, देशातील वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर  कोरोना लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता देशभरात सुरू झालेल्या कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. आज कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयानुसार येत्या १ एप्रिलपासून देशातील ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. 

आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. देशातील ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना १ एप्रिलपासून कोरोनावरील लस दिली जाईल भारताकडे कोरोनावरील लसीचे पुरेसे डोस आहेत. तसेच भारतात अनेक लसी चाचणीच्या टप्प्यात आहेत, असेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारPrakash Javadekarप्रकाश जावडेकर