शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

coronavirus: मोदी सरकार पुन्हा लॉकडाऊनवर करतंय विचार? प्रकाश जावडेकरांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 18:29 IST

Coronavirus in India : फेब्रुवारी महिन्यापासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. त्यातच मार्च महिन्यात देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे.

नवी दिल्ली -  जानेवारी महिन्यामध्ये देशातील कोरोनाचा (Coronavirus)संसर्ग जवळपास नियंत्रणात आला असे वाटत असतानाच फेब्रुवारी महिन्यापासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. त्यातच मार्च महिन्यात देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रामध्ये तर  काही मोठ्या शहरांत लॉकडाऊन (lockdown ) करण्याचे संकेत आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार लॉकडाऊनचा विचार करतंय का? अशी विचारणा केली असता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी सूचक उत्तर दिले आहे. (Modi government thinking of lockdown again? The answer given by Prakash Javadekar)

आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत बैठकील निर्णयांची माहिती घेतली. यावेळी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वाढत असलेल्या निर्बंधांमुळे लॉकडाऊन लागणार का, अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे, अशी विचारणा केली असता प्रकाश जावडेकर म्हणाले की, केंद्र सरकार ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, आम्ही अशा राज्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. कोरोना व्यवस्थापनाचे उपाय गतवर्षी सर्व लोकांनी पाहिले आहेत. आताही कोरोना व्यवस्थापन रोग्य रीतीने झाले तर कोरोनाचा फैलाव होणार नाही. जावडेकर यांच्या म्हणण्याचा अर्थ सरकारकडून लॉकडाऊन लावण्याबाबत किंवा थांबवण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून  आहे. 

दरम्यान, देशातील वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर  कोरोना लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता देशभरात सुरू झालेल्या कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. आज कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयानुसार येत्या १ एप्रिलपासून देशातील ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. 

आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. देशातील ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना १ एप्रिलपासून कोरोनावरील लस दिली जाईल भारताकडे कोरोनावरील लसीचे पुरेसे डोस आहेत. तसेच भारतात अनेक लसी चाचणीच्या टप्प्यात आहेत, असेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारPrakash Javadekarप्रकाश जावडेकर