शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

CoronaVirus: स्थलांतरित कामगार अर्धपोटी; सरकारकडून अपुरा धान्यपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:12 IST

लॉकडाऊनमध्ये सुरू आहेत हाल

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे आलेल्या साथीपायी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे शाहदरा, साहिबाबाद, गुरूग्राम या औद्योगिक विभागांत अडकून पडलेल्या हजारो स्थलांतरित कामगारांचे सध्या प्रचंड हाल होत आहेत. त्यांना सरकारतर्फे देण्यात येणारे अन्नधान्य अपुरे आहे. त्यामुळे ते व त्यांच्या सोबत असलेले कुटुंबीय यांना अर्धपोटी राहायचे प्रसंग येत आहेत. तसेच निर्बंधांचे कडक पालन करण्याच्या नावाखाली या मजुरांना कधीकधी पोलिसांच्या काठीचा प्रसादही मिळत आहे. आपल्या मूळ गावी कधी परतायला मिळेल याकडे हे स्थलांतरित कामगार डोळे लावून बसलेले आहेत.शाहदरा, साहिबाबाद, गुरूग्राम आदी ठिकाणच्या औद्योगिक वस्त्यांमध्ये दरमहा ७ ते १० हजार रुपये कमावणाऱ्या अर्धकुशल कामगारांचे, त्यातही जे कुटुंबीयांबरोबर राहातात त्यांचे तर विलक्षण हाल होत आहेत. लॉकडाउनमुळे गेले महिनाभर उद्योगधंदे बंद आहेत. सरकारकडून मिळणारे अन्नधान्य अपुरे असून त्यामुळे बऱ्याचदा अर्धपोटी राहावे लागत आहेत. मूळ गावी परत जाईपर्यंत आपण जिवंत तरी राहू का, याची शाश्वती या कामगारांना राहिलेली नाही. हे मजूर दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये राहातात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे या स्थलांतरित कामगारांना शक्य होत नाही. त्यामुळे नियम पाळत नसल्याबद्दल त्यांना कधीकधी पोलिसांकडून होणारा लाठीमारही सहन करावा लागतो.अशाच कामगारांपैकी एक असलेले सरोज हे आपली तीन मुले व पत्नीसह शाहदरा औद्योगिक वसाहतीच्या जवळ एका घरात राहातात. तांब्याला पॉलिश करण्याच्या कारख्यान्यात ते काम करायचे. दरमहा १० हजार रुपये उत्पन्न असूनही त्यातही ते नीट भागवायचे. मात्र लॉकडाउन लागू झाल्यानंतर त्यांची कमाई थांबलेली आहे. सरोज मूळचे बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मूळ गावी जायला मिळेपर्यंत शाहदरामध्ये कसेबसे तगून राहायचे आहे इतकेच त्यांनी सध्या ठरविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या