शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

CoronaVirus: स्थलांतरित कामगार अर्धपोटी; सरकारकडून अपुरा धान्यपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:12 IST

लॉकडाऊनमध्ये सुरू आहेत हाल

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे आलेल्या साथीपायी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे शाहदरा, साहिबाबाद, गुरूग्राम या औद्योगिक विभागांत अडकून पडलेल्या हजारो स्थलांतरित कामगारांचे सध्या प्रचंड हाल होत आहेत. त्यांना सरकारतर्फे देण्यात येणारे अन्नधान्य अपुरे आहे. त्यामुळे ते व त्यांच्या सोबत असलेले कुटुंबीय यांना अर्धपोटी राहायचे प्रसंग येत आहेत. तसेच निर्बंधांचे कडक पालन करण्याच्या नावाखाली या मजुरांना कधीकधी पोलिसांच्या काठीचा प्रसादही मिळत आहे. आपल्या मूळ गावी कधी परतायला मिळेल याकडे हे स्थलांतरित कामगार डोळे लावून बसलेले आहेत.शाहदरा, साहिबाबाद, गुरूग्राम आदी ठिकाणच्या औद्योगिक वस्त्यांमध्ये दरमहा ७ ते १० हजार रुपये कमावणाऱ्या अर्धकुशल कामगारांचे, त्यातही जे कुटुंबीयांबरोबर राहातात त्यांचे तर विलक्षण हाल होत आहेत. लॉकडाउनमुळे गेले महिनाभर उद्योगधंदे बंद आहेत. सरकारकडून मिळणारे अन्नधान्य अपुरे असून त्यामुळे बऱ्याचदा अर्धपोटी राहावे लागत आहेत. मूळ गावी परत जाईपर्यंत आपण जिवंत तरी राहू का, याची शाश्वती या कामगारांना राहिलेली नाही. हे मजूर दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये राहातात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे या स्थलांतरित कामगारांना शक्य होत नाही. त्यामुळे नियम पाळत नसल्याबद्दल त्यांना कधीकधी पोलिसांकडून होणारा लाठीमारही सहन करावा लागतो.अशाच कामगारांपैकी एक असलेले सरोज हे आपली तीन मुले व पत्नीसह शाहदरा औद्योगिक वसाहतीच्या जवळ एका घरात राहातात. तांब्याला पॉलिश करण्याच्या कारख्यान्यात ते काम करायचे. दरमहा १० हजार रुपये उत्पन्न असूनही त्यातही ते नीट भागवायचे. मात्र लॉकडाउन लागू झाल्यानंतर त्यांची कमाई थांबलेली आहे. सरोज मूळचे बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मूळ गावी जायला मिळेपर्यंत शाहदरामध्ये कसेबसे तगून राहायचे आहे इतकेच त्यांनी सध्या ठरविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या