शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

CoronaVirus: स्थलांतरित कामगार अर्धपोटी; सरकारकडून अपुरा धान्यपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:12 IST

लॉकडाऊनमध्ये सुरू आहेत हाल

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे आलेल्या साथीपायी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे शाहदरा, साहिबाबाद, गुरूग्राम या औद्योगिक विभागांत अडकून पडलेल्या हजारो स्थलांतरित कामगारांचे सध्या प्रचंड हाल होत आहेत. त्यांना सरकारतर्फे देण्यात येणारे अन्नधान्य अपुरे आहे. त्यामुळे ते व त्यांच्या सोबत असलेले कुटुंबीय यांना अर्धपोटी राहायचे प्रसंग येत आहेत. तसेच निर्बंधांचे कडक पालन करण्याच्या नावाखाली या मजुरांना कधीकधी पोलिसांच्या काठीचा प्रसादही मिळत आहे. आपल्या मूळ गावी कधी परतायला मिळेल याकडे हे स्थलांतरित कामगार डोळे लावून बसलेले आहेत.शाहदरा, साहिबाबाद, गुरूग्राम आदी ठिकाणच्या औद्योगिक वस्त्यांमध्ये दरमहा ७ ते १० हजार रुपये कमावणाऱ्या अर्धकुशल कामगारांचे, त्यातही जे कुटुंबीयांबरोबर राहातात त्यांचे तर विलक्षण हाल होत आहेत. लॉकडाउनमुळे गेले महिनाभर उद्योगधंदे बंद आहेत. सरकारकडून मिळणारे अन्नधान्य अपुरे असून त्यामुळे बऱ्याचदा अर्धपोटी राहावे लागत आहेत. मूळ गावी परत जाईपर्यंत आपण जिवंत तरी राहू का, याची शाश्वती या कामगारांना राहिलेली नाही. हे मजूर दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये राहातात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे या स्थलांतरित कामगारांना शक्य होत नाही. त्यामुळे नियम पाळत नसल्याबद्दल त्यांना कधीकधी पोलिसांकडून होणारा लाठीमारही सहन करावा लागतो.अशाच कामगारांपैकी एक असलेले सरोज हे आपली तीन मुले व पत्नीसह शाहदरा औद्योगिक वसाहतीच्या जवळ एका घरात राहातात. तांब्याला पॉलिश करण्याच्या कारख्यान्यात ते काम करायचे. दरमहा १० हजार रुपये उत्पन्न असूनही त्यातही ते नीट भागवायचे. मात्र लॉकडाउन लागू झाल्यानंतर त्यांची कमाई थांबलेली आहे. सरोज मूळचे बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मूळ गावी जायला मिळेपर्यंत शाहदरामध्ये कसेबसे तगून राहायचे आहे इतकेच त्यांनी सध्या ठरविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या