शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: स्थलांतरित कामगार अर्धपोटी; सरकारकडून अपुरा धान्यपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:12 IST

लॉकडाऊनमध्ये सुरू आहेत हाल

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे आलेल्या साथीपायी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे शाहदरा, साहिबाबाद, गुरूग्राम या औद्योगिक विभागांत अडकून पडलेल्या हजारो स्थलांतरित कामगारांचे सध्या प्रचंड हाल होत आहेत. त्यांना सरकारतर्फे देण्यात येणारे अन्नधान्य अपुरे आहे. त्यामुळे ते व त्यांच्या सोबत असलेले कुटुंबीय यांना अर्धपोटी राहायचे प्रसंग येत आहेत. तसेच निर्बंधांचे कडक पालन करण्याच्या नावाखाली या मजुरांना कधीकधी पोलिसांच्या काठीचा प्रसादही मिळत आहे. आपल्या मूळ गावी कधी परतायला मिळेल याकडे हे स्थलांतरित कामगार डोळे लावून बसलेले आहेत.शाहदरा, साहिबाबाद, गुरूग्राम आदी ठिकाणच्या औद्योगिक वस्त्यांमध्ये दरमहा ७ ते १० हजार रुपये कमावणाऱ्या अर्धकुशल कामगारांचे, त्यातही जे कुटुंबीयांबरोबर राहातात त्यांचे तर विलक्षण हाल होत आहेत. लॉकडाउनमुळे गेले महिनाभर उद्योगधंदे बंद आहेत. सरकारकडून मिळणारे अन्नधान्य अपुरे असून त्यामुळे बऱ्याचदा अर्धपोटी राहावे लागत आहेत. मूळ गावी परत जाईपर्यंत आपण जिवंत तरी राहू का, याची शाश्वती या कामगारांना राहिलेली नाही. हे मजूर दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये राहातात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे या स्थलांतरित कामगारांना शक्य होत नाही. त्यामुळे नियम पाळत नसल्याबद्दल त्यांना कधीकधी पोलिसांकडून होणारा लाठीमारही सहन करावा लागतो.अशाच कामगारांपैकी एक असलेले सरोज हे आपली तीन मुले व पत्नीसह शाहदरा औद्योगिक वसाहतीच्या जवळ एका घरात राहातात. तांब्याला पॉलिश करण्याच्या कारख्यान्यात ते काम करायचे. दरमहा १० हजार रुपये उत्पन्न असूनही त्यातही ते नीट भागवायचे. मात्र लॉकडाउन लागू झाल्यानंतर त्यांची कमाई थांबलेली आहे. सरोज मूळचे बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मूळ गावी जायला मिळेपर्यंत शाहदरामध्ये कसेबसे तगून राहायचे आहे इतकेच त्यांनी सध्या ठरविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या