शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus: कोरोनामुळे New Year सेलिब्रेशनवर निर्बंधांचे सावट; केंद्रानं बोलावली उच्चस्तरीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 09:51 IST

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लोकांनी बचावासाठी बूस्टर डोस घ्यावा, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - चीनसह अनेक देशांत कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकार सतर्क झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड टेस्ट सुरू आहे. परदेशातून येणाऱ्यांची कोविड चाचणी होणार आहे. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं कोविड प्रोटोकॉलचं पालन करावं लागेल. 

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लोकांनी बचावासाठी बूस्टर डोस घ्यावा, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. आत्तापर्यंत कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत, परंतु प्रतिबंधात्मक उपायांवर जोरदार काम सुरू झाले आहे. ज्या लोकांना आधीच कोणताही आजार आहे किंवा वृद्ध आहेत त्यांनी विशेषतः त्याचे पालन करावे. आरोग्य मंत्रालय दर आठवड्याला कोविड संदर्भात आढावा बैठक घेणार आहे.

चीनमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या कोविडसाठी ओमायक्रॉनचा BF.7 कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. भारतातही याचे ४ रुग्ण आढळले आहेत. सूत्रांनुसार, ऑक्टोबरमध्ये गुजरातमध्ये या व्हेरिएंटची पुष्टी झाली होती. आतापर्यंत गुजरातमध्ये तीन आणि ओडिशातून एक रुग्ण समोर आला आहे. BF.7 हा BF.5 चा सब व्हेरिएंट आहे. जो Omicron चा एक व्हेरिएंट आहे. हा व्हेरिएंट संक्रमित असून फार लवकर तो दुसऱ्याला पसरतो. हा व्हेरिएंट आधीच यूएस, यूके, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांसह अनेक देशांमध्ये आढळला आहे.

आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, भारतातील ९८% लोकसंख्येने कोविडविरुद्ध  नैसर्गिक अँन्टिबॉडी विकसित केली आहेत. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. काही लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे आणि एक लहान लहर येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय फारसा फरक पडणार नाही. दुसरीकडे, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यामुळे भारताला घाबरण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे.

केंद्र सरकारनंतर आज दिल्ली सरकारचीही कोरोनावर महत्त्वाची बैठक होणार आहे. बुधवारी दिल्लीत कोरोनाचे पाच रुग्ण आढळले. तेथे एका रुग्णाचा मृत्यू झाला. यूपी आणि कर्नाटक सरकारनेही कोविडबाबत पावले उचलली आहेत. यूपीच्या उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, कोविड-प्रभावित देशांमध्ये प्रवास करून परतलेल्या लोकांची तपासणी करण्यात यावी आणि विमानतळावर दक्षता वाढवावी. देशात कोविडची रोजची प्रकरणे २०० पेक्षा कमी आहेत. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू नवीन रुग्णांच्या बाबतीत आघाडीवर आहेत, परंतु एकूण रुग्णसंख्येत घट झाली आहे. २० डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, या पाच राज्यांमध्ये नवीन कोविड प्रकरणांपैकी ८४% प्रकरणे आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार