शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

coronavirus : लॉकडाऊननंतर दिल्लीतून उत्तर प्रदेशाकडे मोठ्या प्रमाणावर पलायन, रस्त्यावर गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 12:14 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  मात्र रोजगार जाऊन अनिश्चीतता निर्माण झाल्याने अनेक गावाकडे पलायन जात आहेत.

नवी दिल्ली - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेले लाखो मजूर आपल्या गावांच्या दिशेने पलायन करत आहेत. यापैकी अनेक जण चालत गावाच्या दिशेने निघाले आहेत, तर काहीजण उतार प्रदेश सरकारने सोय केलेल्या बसमधून गावाच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यांवर मोठी गर्दी झाली आहे. तर दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर मोठी गर्दी झाली आहे. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  मात्र रोजगार जाऊन अनिश्चीतता निर्माण झाल्याने अनेक गावाकडे पलायन जात आहेत. रस्त्यावरून पायी निघालेल्या मजुरांसाठी योगी आदित्यनाथ सरकारने विशेष बसची सुविधा सुरू केली आहे. दरम्यान, यांची माहिती कळताच लोकांची मोठी गर्दी आनंद विहार बस डेपोमध्ये झाली. गाझियाबादमधील लाल कुवा येथील बस डेपोतही अशीच मोठी गर्दी झाली होती. 

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. देशभरात आतापर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 900 च्या पुढे पोहोचली आहे. तर आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशासमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत देशात लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. 

दुसरीकडे यूरोपीय देश आणि अमेरिकेत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. संपूर्ण जगात मिळून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 27 हजारांवर पोहोचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNew Delhiनवी दिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेश