शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

CoronaVirus News: धोका वाढला! देशातील ६४० पैकी 'इतक्या' जिल्ह्यांना कोरोनाचा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 16:47 IST

CoronaVirus News: लॅन्सेट ग्लोबल हेल्थच्या अहवालानं चिंतेत वाढ; नऊ राज्यांमधील परिस्थिती अतिशय गंभीर

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या अतिशय झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची चिंता वाढली आहे. त्यातच आता लॅन्सेट ग्लोबल हेल्थच्या अहवालामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. लॅन्सेटच्या अहवालानुसार, भारतातील ९८ टक्के भाग कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. देशातील ६४० जिल्ह्यांपैकी ६२७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याची आकडेवारी लॅन्सेटनं प्रसिद्ध केली आहे. अमेरिकेनंतर भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगानं वाढत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.भारतातील कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा स्तरावर योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी आवश्यक असल्याचं लॅन्सेटनं अहवालात म्हटलं आहे. 'कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागांवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या भागांमध्ये योजनाबद्ध पद्धतीनं काम करण्याची गरज आहे. कोरोनाचा फैलाव वाढलेल्या भागांत लॉकडाऊन किंवा अन्य निर्बंध लागू करणं आवश्यक आहे,' असं लॅन्सेटनं अहवालात नमूद केलं आहे.भारत सरकारनं दिलेल्या आकडेवारीच्या आधारे लॅन्सेटनं अहवाल तयार केला आहे. जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या, तिथली लोकसंख्या आणि आरोग्य सुविधांच्या मदतीनं अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवालातील माहितीनुसार देशातल्या नऊ राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. यामध्ये मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओदिशा आणि गुजरात यांचा समावेश आहे. ईशान्य भारतामधील स्थिती सध्या तरी चांगली आहे. सामाजिक, आर्थिक, स्वच्छता, आरोग्य सुविधा असे विविध निकष लक्षात घेऊन लॅन्सेटनं भारतातील कोरोना स्थितीचा अहवाल तयार केला आहे. भारताच्या ९ राज्यांमधील परिस्थिती अतिशय गंभीर असून त्यासंदर्भात तातडीनं पावलं उचलण्याची गरज लॅन्सेटनं व्यक्त केली आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा धोक्याचा इशारा लॅन्सेटनं दिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या