शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
4
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
5
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
6
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
7
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
8
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
9
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
10
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
11
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
12
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
13
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
14
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
15
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
16
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
17
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
18
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
19
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
20
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?

CoronaVirus News: सरकारनं सध्या लोकांच्या हाती पैसा देऊ नये, त्याऐवजी...; अभिजीत बॅनर्जींची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 10:59 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना संकट आणि आर्थिक आव्हानांबद्दल राहुल गांधींचा अभिजीत बॅनर्जींशी संवाद

नवी दिल्ली: कोरोचा संकट गहिरं होत असल्यानं अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानं वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी आज नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला. मोदी सरकार देशवासीयांना दिलासा देण्यासाठी दुसरं आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत असताना बॅनर्जी यांनी एक महत्त्वाची सूचना केली. सर्वसामान्यांच्या हाती आता थेट पैसा देऊ नका. तो काही दिवसांनंतर द्या, असं बॅनर्जी म्हणाले.देशातल्या जनतेच्या हाती थेट पैसा दिल्यास समस्या कमी होण्याऐवजी त्या वाढतील, अशी भीती बॅनर्जींनी व्यक्त केली. 'अर्थव्यवस्था ठप्प असताना लोकांच्या हाती थेट पैसा देणं योग्य ठरणार नाही. उत्पादन आणि मागणी यामधील अंतर वाढल्यास महागाई वाढेल. त्यामुळे सरकारनं आता लोकांच्या हाती पैसा न देता दोन महिन्यांनंतर द्यावा. लॉकडाऊन संपल्यानंतर तो लोकांना खर्च करता येईल,' असं बॅनर्जी यांनी म्हटलं.काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या योजना अतिशय चांगल्या आहेत. मात्र आताचं सरकार त्या योजना नीट लागू करत नसल्याचं निरीक्षण बॅनर्जींनी नोंदवलं. यूपीए सरकारच्या अनेक योजना चांगल्या होत्या. या सरकारनं त्याच योजनांवर पुढे काम केलं याकडे लक्ष वेधताना त्यांनी आधार कार्डचा संदर्भ दिला. यूपीए सरकारच्या अनेक योजना कोरोना संकटाच्या काळातही उपयोगी ठरू शकतात. मात्र आज त्यांची देशभरात अंमलबजावणी केली जात नाही, असं बॅनर्जी म्हणाले.येत्या काळात बँकांसमोरील समस्या आणखी वाढतील आणि नोकऱ्या वाचवणंदेखील कठीण होईल, असा मुद्दा राहुल यांनी उपस्थित केला. त्यावर खरंच अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याचं बॅनर्जी म्हणाले. देशाला आर्थिक पॅकेजची गरज आहे. अमेरिका, जपाननं अशा पॅकेजची घोषणा केली आहे. मात्र आपल्याकडे अद्याप अशा प्रकारच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलेली नाही. लहान उद्योगांना आर्थिक मदतीची गरज असून चालू तिमाहीचं कर्ज माफ करण्यात यावं, असं मत बॅनर्जी यांनी व्यक्त केलं."त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा"ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा; मोदींनाही ई-मेल करणारदिलासादायक! गेल्या २४ तासांत १०७४ जण कोरोनामुक्त; बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण २८ टक्क्यांवर

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या