शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

CoronaVirus, LockdownNews: 17 मेनंतरही लॉकडाउन वाढणार का?; डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिलं 'असं' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 21:39 IST

देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 59,000वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 19,00हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन टप्प्या टप्प्याने उठवावा असेही म्हटले आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाउन दोन वेळा वाढवण्यात आला आहेलॉकडाउन वाढणार की नाही, यावर शेवटचा निर्णय 16 मेरोजीचदेशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 59,000वर

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाउन दोन वेळा वाढवण्यात आला आहे. असे असतानाही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. या पुढेही लॉकडाउन वाढवायचा की नाही, यावर सरकार मंथन करत आहे. 

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन पुढे वाढेल, की नाही, हे अनेक गोष्टींवर विचार करून ठरवले जाईल. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. त्यांच्याशी सातत्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडून राज्यांच्या स्थितीची माहिती मिळाल्यानंतर, यासंदर्भात पंतप्रधान तज्ज्ञांची मदत घेतील. त्यांच्याशी सल्लामसलत झाल्यानंतरच लॉकडाउन पुढे वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल. 

आणखी वाचा - CoronaVirus News: दिलासादायक; "फ्लॅट नव्हे, लवकरच रिव्हर्स येईल 'कोरोना ग्राफ', आता 'स्वदेशी' टेस्टिंग किट्सने होणार तपासणी"

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील 135 कोटी जनतेचे हित लक्षात घेऊन अनेक निर्णय घेत असतात. लॉकडाउन वाढणार की नाही, यावर शेवटचा निर्णय 16 मेरोजीच समोर येईल, असे हर्षवर्धन म्हणाले. आज तकने आयोजित केलेल्या 'ई-एजेंडा' या कार्यक्रमात ते बोलत होते.

आणखी वाचा - CoronaVirus News : भारतासाठी आनंदाची बातमी; "अमेरिका, इटली सारखा धोका नाही, अत्यंत वाईट परिस्थितीसाठीही देश तयार"

देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 59,000वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 19,00हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन टप्प्या टप्प्याने उठवावा असेही म्हटले आहे.

आणखी वाचा - 40 कुटुंबांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश; पूर्वजांना औरंगजेबाने मुस्लीम बनवल्याचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकारdoctorडॉक्टरGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी