शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : "...तोपर्यंत कुणालाही असहाय्य वाटू नये", लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 16:30 IST

CoronaVirus: कोरोनावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे.

ठळक मुद्देजगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोनावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे.

कोलकाता : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक राज्यात अडकलेल्या बंगालींना घरी परतण्याचे आश्वासन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. सोमवारी ममता बॅनर्जी यांनी भावूक ट्विट करत म्हटले आहे की, परराज्यात अकडलेल्या बंगाली नागरिकांच्या परतीसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यामुळे पश्चिम बंगालच्या बाहेर अडकलेल्या लाखो नागरिकांना घरी परतण्याची आशा आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ट्विट करत म्हणाल्या की, "कोरोना संकटाच्या काळात आम्ही  राज्यातील जनतेसोबत आहेत. लॉकडाऊनमध्ये राज्याबाहेर देशातील वेगवेगळ्या भागात अडकलेल्या नागरिकांची मदत करण्यासाठी बंगाल सरकार शक्य ती मदत करण्यास तयार आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत."

याचबरोबर, ममता बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मी इथे आहे, तोपर्यंत बंगालमधील कोणत्याही व्यक्तीला असहाय्य  वाटू नये. संकटाच्या या काळात मी तुमच्याबरोबर आहे. मी वैयक्तिकरित्या या प्रकरणाकडे लक्ष देत आहे आणि सर्वांना शक्य ती मदत करण्यास आम्ही कसलीही कसर सोडणार नाही. यासाठी प्रयत्न सुद्धा सुरु केले आहेत." तसेच, राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेल्या बंगालमधील सर्व विद्यार्थ्यांना लवकरच परत आणले जाईल, असे आश्वासनही ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे बाहेर राज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने पुढाकार घेतला आहे. कोट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने राजस्थानला बसेस पाठविल्या. सर्व विद्यार्थी सुखरूप राज्यात परत आणले. त्याचबरोबर, महाराष्ट्रातील नांदेडमध्ये अडकलेल्या ३८०० शीख यात्रेकरूंना परत आणण्यासाठी पंजाब सरकार सुद्धा प्रयत्न करत आहे. १०० शीखांची पहिली तुकडीही महाराष्ट्रातून रवाना झाली आहे. याशिवाय, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या आपल्या राज्यातील लोकांना परत पाठविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी