शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : "...तोपर्यंत कुणालाही असहाय्य वाटू नये", लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 16:30 IST

CoronaVirus: कोरोनावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे.

ठळक मुद्देजगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोनावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे.

कोलकाता : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक राज्यात अडकलेल्या बंगालींना घरी परतण्याचे आश्वासन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. सोमवारी ममता बॅनर्जी यांनी भावूक ट्विट करत म्हटले आहे की, परराज्यात अकडलेल्या बंगाली नागरिकांच्या परतीसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यामुळे पश्चिम बंगालच्या बाहेर अडकलेल्या लाखो नागरिकांना घरी परतण्याची आशा आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ट्विट करत म्हणाल्या की, "कोरोना संकटाच्या काळात आम्ही  राज्यातील जनतेसोबत आहेत. लॉकडाऊनमध्ये राज्याबाहेर देशातील वेगवेगळ्या भागात अडकलेल्या नागरिकांची मदत करण्यासाठी बंगाल सरकार शक्य ती मदत करण्यास तयार आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत."

याचबरोबर, ममता बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मी इथे आहे, तोपर्यंत बंगालमधील कोणत्याही व्यक्तीला असहाय्य  वाटू नये. संकटाच्या या काळात मी तुमच्याबरोबर आहे. मी वैयक्तिकरित्या या प्रकरणाकडे लक्ष देत आहे आणि सर्वांना शक्य ती मदत करण्यास आम्ही कसलीही कसर सोडणार नाही. यासाठी प्रयत्न सुद्धा सुरु केले आहेत." तसेच, राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेल्या बंगालमधील सर्व विद्यार्थ्यांना लवकरच परत आणले जाईल, असे आश्वासनही ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे बाहेर राज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने पुढाकार घेतला आहे. कोट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने राजस्थानला बसेस पाठविल्या. सर्व विद्यार्थी सुखरूप राज्यात परत आणले. त्याचबरोबर, महाराष्ट्रातील नांदेडमध्ये अडकलेल्या ३८०० शीख यात्रेकरूंना परत आणण्यासाठी पंजाब सरकार सुद्धा प्रयत्न करत आहे. १०० शीखांची पहिली तुकडीही महाराष्ट्रातून रवाना झाली आहे. याशिवाय, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या आपल्या राज्यातील लोकांना परत पाठविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी