शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

CoronaVirus : महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या वाटेवर! केंद्र सरकारचा इशारा; लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 07:00 IST

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. केंद्रीय पथकाने अलीकडेच महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी केली.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून, देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याची ही चिन्हे आहेत, सबब लसीकरणाचा वेग वाढविला जावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. (CoronaVirus Maharashtra on the way to the second wave! Central government warning; Suggestions for speeding up vaccination) केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. केंद्रीय पथकाने अलीकडेच महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी केली. त्या पाहणीच्या आधारावरच केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात पुढील मुद्दे मांडले आहेत. 

मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ कायम; यंत्रणांसमोर चिंतामुंबईत मंगळवारी १ हजार ९२२ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, चौघांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांचा आकडा ३ लाख ४७ हजार ५८१ वर पोहोचला आहे. २,२३,०००+ - देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा  राज्यात नवे रुग्ण - १७,८६४एकूण बाधित - २३,४७,३२८एकूण मृत्यू - ५२,९९६

१२,७४,००० डोस मिळणार -महाराष्ट्राला १८ मार्चपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे आणखी १२,७४,००० डोस प्राप्त होणार आहेत. राज्यात लसींचा तुटवडा जाणवू दिला जाणार नसल्याचेही राजेश भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे.

‘आठवड्याला २० लाख डोस उपलब्ध करून द्या’कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी आठवड्याला २० लाख डोस उपलब्ध करून द्या. अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली. 

पंतप्रधानांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.

जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचे ताशेरे- कोरोनाबाधितांचा शोध घेणे, नमुने गोळा करणे, चाचण्या करणे यासंदर्भात मर्यादित प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. - औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालय, तसेच नाशिकमधील वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. - यासंदर्भात सखोल तपास होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या बदलत्या स्थितीबाबत जिल्हा प्रशासने फारशी गंभीर नाहीत. - आपण केलेल्या बंदोबस्तावर ते खूश असून, हे योग्य नाही. त्यांनी प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले.

३४ दिवसांमध्ये २५४% वाढसक्रिय रुग्णांच्या संख्येत ११ फेब्रुवारी रोजी राज्यात ३६,९१७ एवढे कोरोनाचे उपचाराधीन रुग्ण होते. आता १५ मार्च रोजी १,३०,५४७  एवढे सक्रिय रुग्ण आहेत. म्हणजेच ३४ दिवसांमध्ये यात जवळपास २५४ टक्के वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने राज्याला सुनावले -- बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करण्याची प्रक्रियाही धिम्या गतीने- शहरी, तसेच ग्रामीण भागातही लोकांमध्ये कोरोनाविषयी बेफिकिरी, शिस्तीचे पालन होत नाही 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीState Governmentराज्य सरकार