शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

CoronaVirus : महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या वाटेवर! केंद्र सरकारचा इशारा; लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 07:00 IST

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. केंद्रीय पथकाने अलीकडेच महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी केली.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून, देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याची ही चिन्हे आहेत, सबब लसीकरणाचा वेग वाढविला जावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. (CoronaVirus Maharashtra on the way to the second wave! Central government warning; Suggestions for speeding up vaccination) केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. केंद्रीय पथकाने अलीकडेच महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी केली. त्या पाहणीच्या आधारावरच केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात पुढील मुद्दे मांडले आहेत. 

मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ कायम; यंत्रणांसमोर चिंतामुंबईत मंगळवारी १ हजार ९२२ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, चौघांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांचा आकडा ३ लाख ४७ हजार ५८१ वर पोहोचला आहे. २,२३,०००+ - देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा  राज्यात नवे रुग्ण - १७,८६४एकूण बाधित - २३,४७,३२८एकूण मृत्यू - ५२,९९६

१२,७४,००० डोस मिळणार -महाराष्ट्राला १८ मार्चपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे आणखी १२,७४,००० डोस प्राप्त होणार आहेत. राज्यात लसींचा तुटवडा जाणवू दिला जाणार नसल्याचेही राजेश भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे.

‘आठवड्याला २० लाख डोस उपलब्ध करून द्या’कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी आठवड्याला २० लाख डोस उपलब्ध करून द्या. अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली. 

पंतप्रधानांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.

जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचे ताशेरे- कोरोनाबाधितांचा शोध घेणे, नमुने गोळा करणे, चाचण्या करणे यासंदर्भात मर्यादित प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. - औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालय, तसेच नाशिकमधील वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. - यासंदर्भात सखोल तपास होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या बदलत्या स्थितीबाबत जिल्हा प्रशासने फारशी गंभीर नाहीत. - आपण केलेल्या बंदोबस्तावर ते खूश असून, हे योग्य नाही. त्यांनी प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले.

३४ दिवसांमध्ये २५४% वाढसक्रिय रुग्णांच्या संख्येत ११ फेब्रुवारी रोजी राज्यात ३६,९१७ एवढे कोरोनाचे उपचाराधीन रुग्ण होते. आता १५ मार्च रोजी १,३०,५४७  एवढे सक्रिय रुग्ण आहेत. म्हणजेच ३४ दिवसांमध्ये यात जवळपास २५४ टक्के वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने राज्याला सुनावले -- बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करण्याची प्रक्रियाही धिम्या गतीने- शहरी, तसेच ग्रामीण भागातही लोकांमध्ये कोरोनाविषयी बेफिकिरी, शिस्तीचे पालन होत नाही 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीState Governmentराज्य सरकार