शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Coronavirus: धक्कादायक! मास्क न घालताच स्टेजवर दिसले राज्यपाल; मुख्यमंत्री अन् इतर मंत्र्यांना दिली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 17:14 IST

भाजपामधील तीन आणि काँग्रेसमधून भाजपात आलेल्या ज्योतिरादित्य शिंदेंच्या जवळच्या दोघांना राज्यपालांनी मंत्रिपदाची शपथ दिली.

भोपाळः मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मंत्रिमंडळाची आज स्थापन करण्यात आली असून, भाजपामधील तीन आणि काँग्रेसमधून भाजपात आलेल्या ज्योतिरादित्य शिंदेंच्या जवळच्या दोघांना राज्यपालांनी मंत्रिपदाची शपथ दिली. मंचावर असलेले राज्यपाल लालजी टंडन, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि शपथविधीसाठी पोहोचलेले सर्वच आमदार सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताना पाहायला मिळाले. परंतु सगळ्यांनीच चेहऱ्यावर मास्क घातलेलं दिसलं नाही. भाजपाचे वरिष्ठ आमदार आणि माजी मंत्री नरोत्तम मिश्रा, आदिवासीबहुल भागातील उमरिया जिल्ह्यातील मानपूरच्या आमदार मीना सिंह, हरदाचे आमदार कमल पटेल, शिंदेंच्या गटातील तुलसी सिलावट आणि गोविंद सिंह राजपूत हे मुख्यमंत्री आणि राज्यपालांसह मंचावर बसले होते. पण सगळ्यांनी मास्क घातलेलं नव्हतं.मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे सर्वांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर नरोत्तम मिश्रा यांनी केंद्रीय नेतृत्व आणि मुख्यमंत्री शिवराज यांचे आभार मानले. मला डझनभर विभागांचा अनुभव आहे, तरीही जेसुद्धा खातं मिळेल त्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन. कोरोनामुळे छोटं कॅबिनेट स्थापन झाले आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे टीम मोदी म्हणून काम करत होते, आता आम्ही टीम शिवराज यांच्या नेतृत्वात काम करू, असंही नरोत्तम मिश्रा यांनी सांगितलं आहे. राज्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार आणि सलग 15 वर्षे मंत्री असलेले माजी विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांना पहिल्या टप्प्यात संधी न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भार्गव यांच्या व्यतिरिक्त भुपेंद्रसिंग, गौरीशंकर बिसेन, विजय शाह, यशोधरा राजे शिंदे, राजेंद्र शुक्ला आणि रामपाल सिंह यांच्यासह कॉंग्रेसतर्फे भाजपामध्ये असलेले भुहूलाल सिंग, महेंद्रसिंग सिसोदिया आणि प्रभुराम चौधरी सध्या मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. शिवराज सिंह चौहान यांनी 23 मार्च रोजी राजभवनात मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एकट्याने शपथ घेतली. शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रिमंडळाविना 28 दिवस कामकाज पाहिले, यासाठी विरोधकांनीही त्याला अनेकदा लक्ष्य केले. 230 सदस्य असलेल्या मध्य प्रदेशच्या विधानसभेतील संख्येनुसार मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 15 टक्के म्हणजे 35 सदस्य असू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या खात्यांचं वाटप करण्यात आलेलं नाही. त्यामुळे दोन खात्यांची जबाबदारी एका मंत्र्यांकडे दिली जाऊ शकते. 3 मे रोजी मंत्रिमंडळाच्या दुसर्‍या संभाव्य विस्तारानंतरच खात्यांचे वाटप केले जाणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान