शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
4
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
5
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
6
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
7
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
8
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
9
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
10
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
11
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
12
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
13
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
14
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
15
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
16
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
17
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
18
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
19
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
20
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला

CoronaVirus News :मोदींच्या भारताकडे कोणी डोळे वटारून पाहू शकत नाही, भाजपाचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 14:43 IST

CoronaVirus : कॉंग्रेस नेत्यांनी कोरोनाविरुद्धच्या देशातील लढाईला खराब करून राजकीय फायद्यासाठी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

नवी दिल्लीः कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, भारतालाही त्याचा फटका बसला आहे. देशात टाळेबंदी असल्यानं अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अशा परिस्थितीत मोदी सरकार सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे या कोरोनाच्या संकटातही अनेक नेते राजकारण करत असल्याचं समोर आलं आहे. कोरोना विषाणूपासून ते अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका करणाऱ्या राहुल गांधींवरही आता भाजपानं पलटवार केला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल यांच्या आरोपांना एक एक करत उत्तर दिलं आहे. चीन आणि नेपाळच्या मुद्द्यावरून राहुल यांनी केंद्र सरकारला परिस्थिती स्पष्ट करण्यास सांगितले होते.त्यावर रविशंकर प्रसाद म्हणाले की, 'नरेंद्र मोदींच्या भारताकडे कोणीही डोळे वटारून दाखवू शकत नाहीत'. कॉंग्रेस नेत्यांनी कोरोनाविरुद्धच्या देशातील लढाईला खराब करून राजकीय फायद्यासाठी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. प्रसाद म्हणाले की, पंजाब आणि राजस्थानसारख्या कॉंग्रेसशासित राज्यांनी सर्वप्रथम लॉकडाऊन लागू केले आहे. देशात या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत केवळ 4345 लोक मृत्युमुखी पडले आहेत. दुसरीकडे, जगात 3 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. जगातील 15 देशांमध्ये कोरोना हा एक मोठा आजार बनला आहे. त्यांची लोकसंख्या 142 कोटी आहे. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि इतर देशांचा समावेश आहे. 26 मेपर्यंत या देशांमध्ये कोरोनामधून सुमारे 3.43 लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत. पुढे रविशंकर प्रसाद म्हणाले, भारताची लोकसंख्या 137 कोटी आहे आणि आपल्या देशात 4,345 लोकांचे मृत्यू झाले आहेत. 64 हजारांहून अधिक रुग्णांची कोरोनातून मुक्तता झाली आहे.राहुल गांधी देशाचा संकल्प अन् लढा कमकुवत करीत आहेत: प्रसादप्रसाद म्हणाले की, राहुल गांधी 5 मार्गांनी देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला आणि संकल्पाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 1- नकारात्मकता पसरवणे, 2- संकटाच्या वेळी देशाविरुद्ध काम करणे. 3- चुकीचं श्रेय घेणे,  4- सांगायचं वेगळंच आणि भलतंच काहीतरी करायचं. 5- चुकीच्या गोष्टी आणि खोट्या बातम्या पसरवणे. ' भिलवाडा मॉडेलचंही राहुल गांधींनी खोटारडेपणानं श्रेय घेतल्याचाही आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री राहुल गांधींचं म्हणणे ऐकत नाहीत? : भाजपालॉकडाऊनबाबत राहुल गांधींच्या प्रश्नांवर प्रसाद म्हणाले की, कॉंग्रेसशासित राज्यांनी सर्वप्रथम याची घोषणा केली. पंजाबने प्रथम लॉकडाऊन जाहीर केला. मग राजस्थान या राज्यानं लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या अगोदर महाराष्ट्र आणि पंजाबने 31 मेपर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ दिली. प्रसाद म्हणाले, 'राहुल गांधी, तुम्ही म्हणता की लॉकडाऊन हा तोडगा नाही, तर मग तुम्ही आपल्या मुख्यमंत्र्यांना हे का स्पष्टपणे  सांगत नाही? की ते तुमचे ऐकत नाहीत की तुमच्या मताचा काही विचार करीत नाहीत?, असा टोलाही प्रसाद यांनी लगावला आहे. 'राहुल जबाबदारीतून पळत काढत आहेत'महाराष्ट्राच्या युती सरकारमध्ये कॉंग्रेसला मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, या राहुल गांधींच्या कालच्या वक्तव्यावरही प्रसाद यांनी हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, राहुल गांधी जबाबदा-यांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत आहेत. लॉकडाऊनबद्दल राहुल गांधी यांनी खोटे बोलल्याचा आरोप प्रसाद यांनी केला. लॉकडाऊनचा देशाला फायदा झाला, असेही त्यांनी सांगितले. इतर मोठ्या देशांपेक्षा भारतात कमी मृत्यू झाले असतील आणि जास्त रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असल्यास त्याचं श्रेय लॉकडाऊनला जाते, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत. 

हेही वाचा

भारत-चीन तणाव वाढला! युद्धाच्या तयारीला वेग द्या; शी जिनपिंग यांचे सेनेला आदेश

बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात, पवार फडणवीसांवर भडकले

CoronaVirus News: आनंद महिंद्रांनी शेअर केला 'खास' फोटो; युजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया

लडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक अन् नव्याच शस्त्रानं हल्ला; लष्कराचं जबरदस्त प्रत्युत्तर

CoronaVirus News: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?; राणेंच्या 'त्या' विधानावर फडणवीस बोलले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी