शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

coronavirus: दिल्लीत लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मजुरांची गावी जाण्यासाठी धावपळ, बस स्थानकात उसळली गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 09:00 IST

lockdown in delhi 2021: लॉकडाऊनच्या घोषणेनंतर परराज्यांमधील मजुरांनी गावी जाण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने गेल्या वर्षच्या कामगारांच्या पलायनाची आठवण ताजी झाली आहे.

ठळक मुद्दे संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर दिल्लीमध्ये गोंधळाचे वातावरण परराज्यांमधील मजुरांनी गावी जाण्यासाठी सुरू केली धावपळ दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने गेल्या वर्षच्या कामगारांच्या पलायनाची आठवण झाली ताजी

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी दिल्लीमध्ये ६ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. (lockdown in delhi 2021) ही संचारबंदी काल रात्री १० वाजल्यापासून लागू झाली असून, २६ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान, संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर दिल्लीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, परराज्यांमधील मजुरांनी गावी जाण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने गेल्या वर्षच्या कामगारांच्या पलायनाची आठवण ताजी झाली आहे. ( After the announcement of the lockdown in Delhi, the workers rushed to the village, the crowd at the bus station)

दिल्लीत सहा दिवसांच्या संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर आनंदविहार पोलीस ठाण्यात परराज्यातील स्थलांतरीत मजुरांची मोठी गर्दी झाली. भीती आणि शंका लोकांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मजुरांना दिल्लीत राहण्याचे आवाहन केले होते. तरीही त्यांच्या आवाहनाचा परिणाम झालेला दिसला नाही. अनेक मजुरांना लवकरात लवकर गावी जाण्याची घाई दिसून येत होती. 

हे दृष्य पाहिल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्थलांतरीत मजुरांना दिल्लीत थांबवण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले. सरकार पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. हे केवळ लहान लॉकडाऊन आहे. तसेच त्याचा अवधी वाढणार नाही. तो वाढवावा लागणार नाही. तुम्ही दिल्ली सोडून जाऊ नका. हा निर्णय आम्हाला नाईलाजास्तव घ्यावा लागला आहे. या काळात आम्ही दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर बेड्सची व्यवस्था करू. केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालMigrationस्थलांतरण