शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
11
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
12
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
13
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
15
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
16
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
17
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
18
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
19
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
20
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

Coronavirus : देशात २१ राज्यांतील ७५ जिल्ह्यांत लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 3:37 AM

Coronavirus : १०० दिवसांत २ कोटी लोक विदेशातून आले भारतात

- हरीश गुप्तानवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या राक्षसाशी संपूर्ण देशात लढण्यासाठी अखेर भारताची तयारी झाली आहे. एक दिवसाची जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) सोमवार सकाळपासूनच लॉक डाऊनमध्ये (राहत असलेला भाग सोडण्यास प्रतिबंध) रूपांतरित झाली. ही लॉक डाऊन उपाययोजना पहिल्या टप्प्यात दिल्लीसह २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ७५ जिल्ह्यांत लागू झाली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन या उपाययोजनेत आणखी राज्ये समाविष्ट होऊ शकतील.जागतिक आरोग्य संघटनेने (हू) गेल्या आठवड्यात पाठवलेल्या एका गोपनीय अहवालानंतरनरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. कोरोनाची महामारी रोखण्यासाठी पूर्ण लॉक डाऊनची गरज असल्याचा इशारा अहवालात देण्यात आलेला आहे. याबाबत एक आॅडियो क्लिप शनिवारी समोर आली. तिच्यात या शिफारशी केलेल्या आहेत. परंतु, प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने असा काही आशय नाकारला आहे.तथापि, रविवारी सायंकाळी दिल्लीत नवे निर्बंध लागू केले गेल्यानंतर अनेक भागांत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे शीघ्र कृती दल तैनात केले गेले.रेल्वेंत कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह अहवाल असलेले १२ प्रवासी आढळल्यानंतर सरकार सावध झाले. आता यातून लोकांकडून लोकांना कोरोनाची बाधा होऊ शकते म्हणून सरकारला काळजी वाटत आहे.या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत पॅसेंजर रेल्वेची सेवा ताबडतोब थांबवली गेली आहे आणि अनेक राज्यांनी आंतरराज्य बससेवा २४ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद केली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महत्वाच्या २५ ठिकाणांसह ७५ जिल्ह्यांत हे निर्बंध असून ही यादी तीन दिवसांनंतर दुसरा आढावा घेतल्यानंतर वाढेल.१०० दिवसांत २ कोटी लोक विदेशातून आले भारतातकोरोना विषाणूवरील मंत्र्यांच्या गटाने नागरी उड्डयन आणि पर्यटन मंत्रालयाला दिलेल्या सविस्तर अहवालात लक्ष वेधले की, गेला डिसेंबर, जानेवारी, फेब्रवारी आणि मार्च महिन्याच्या पहिल्या काही दिवसांपर्यंत दररोज दोन लाखांपेक्षा जास्त भारतीय नागरिक आणि विदेशी लोकांसह प्रवासी कोणतीही तपासणी न होता भारतात आले आहेत. या १०० दिवसांत जवळपास दोन कोटी लोक विदेशांतून भारतात आले आहेत.जवळपास एक लाख चिनी पर्यटक गेल्या चार महिन्यांत चीनमधून भारतात आले तर भारतात आलेल्या इटालियन पर्यटकांची संख्या सुमारे १.५ लाख आहे. एकट्या २०१९ मध्ये भारतात १.१० कोटी विदेशी पर्यटक आले व त्यांनी सध्या लॉक डाऊन असलेल्या जिल्ह्यांना भेट दिली. हे विदेशी पर्यटक पर्यटनस्थळांवर स्थानिक लोकांमध्ये मिसळले आणि ते पर्यटक अतिशय मोकळेपणे रेल्वे आणि बसेसनी फिरले.वस्तुस्थिती ही आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २४ व २५ फेब्रुवारी या भारत दौऱ्याच्या दिवसांपर्यंत कोरोना व्हायरसबद्दल धोक्याच्या घंटा क्वचितच वाजवल्या गेल्या. अपवाद फक्त खबरदारीचे उपाय योजना करण्याची केलेली आवाहने. परंतु, कोणतेही निर्बंध किंवा क्लॅम्प डाऊन नव्हते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या