शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनाचे 103 नवे रुग्ण सापडले; संक्रमितांची संख्या 499वर, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 09:10 IST

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 499वर गेली आहे. महाराष्ट्रात जवळपास 97 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देकर्नाटकात 33 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात 30 लोक कोरोना संक्रमित आहेत. दिल्लीत 29 लोकांना याची बाधा झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे.या जीवघेण्या रोगाला थोपवण्यासाठी 30 राज्यांनी लॉक डाऊन केलं आहे. पंजाब, महाराष्ट्र, चंदीगडमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. दिल्लीतही कर्फ्यूसदृश्य परिस्थिती आहे. 

नवी दिल्लीः भारतात जीवघेण्या कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. एका दिवसांत देशभरात कोरोनाचे नवीन 103 रुग्ण समोर आले आहेत. तसेच या रोगानं आतापर्यंत 10 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 499वर गेली आहे. महाराष्ट्रात जवळपास 97 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये 60 लोक संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. या जीवघेण्या रोगाला थोपवण्यासाठी 30 राज्यांनी लॉक डाऊन केलं आहे. पंजाब, महाराष्ट्र, चंदीगडमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. दिल्लीतही कर्फ्यूसदृश्य परिस्थिती आहे. इतर राज्यांची काय परिस्थिती?कर्नाटकात 33 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात 30 लोक कोरोना संक्रमित आहेत. दिल्लीत 29 लोकांना याची बाधा झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 29 संक्रमित असून, एकाचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्येही 3 संक्रमित असून, एकाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात संक्रमितांची संख्या 97 असून, आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये 21 जण संक्रमित आढळले असून, एकाचा मृत्यू ओढवला आहे. पश्चिम बंगालमध्ये सात जणांना संसर्ग झालेला असून, एकाचा मृत्यू झाला आहे. या विषाणूला नियंत्रित करण्यासाठी सरकारनं काही निर्बंध लादले असून, त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर केंद्र सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात 14,500हून अधिक लोक मृत्युमुखी पडत आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंजाब सरकारने सोमवारी कर्फ्यू लावला आहे. लोक लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरत असल्यानं मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कर्फ्यूची घोषणा केली. यावेळी, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवांवर बंदी घातली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही लोक लॉकडाऊन नियमांचे गांभीर्याने पालन करत नसल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. जनतेनं लॉकडाऊन नियमांचे योग्य प्रकारे पालन कसे होईल, याची काळजी घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, झारखंड आणि नागालँडने राज्यव्यापी लॉकडाऊन जाहीर केले आहे, तर बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्येही जमावबंदी करण्यात आली आहे. केरळ, राजस्थान आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांनी आधीच अंशतः किंवा पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. .लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यास होणार कारवाईदिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईसह देशभरातील 80 जिल्ह्यांमध्ये 31 मार्चपर्यंत रेल्वे आणि आंतरराज्यीय बससेवा स्थगित ठेवून लोकांच्या प्रवास आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणा-या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यास केंद्र सरकारने राज्य सरकारांना सांगितले आहे. लॉकडाउनची अंमलबजावणी महाराष्ट्रभर झाली आहे. मुंबईत बससेवा बंद करण्यात आल्या असून, जिल्ह्यांच्या हद्दींनाही सील ठोकण्यात आले आहे. दिल्लीतल्या एम्सने ओपीडी, विशेष सेवांसह सर्व नवीन व वृद्ध रुग्णांची नोंदणी आजपासून पुढील आदेश होईपर्यंत थांबविण्याचे आदेश जारी केले आहेत. यापूर्वी एम्सने कोविड 19 साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी 23 मार्चपासून रुग्णांची नियमित वॉल्किन ओपीडी नोंदणी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी एम्सने सांगितले की, सर्व अनावश्यक शस्त्रक्रिया व उपचार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 21 मार्चपासून केवळ आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात येतील, असे निर्देश देण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षण संस्थांना योग्य प्रमाणात व्हेंटिलेटर आणि उच्च-प्रवाहित ऑक्सिजन पुरवठा खरेदी करण्यास सांगितले आहे. यासह रुग्णालयाच्या आवारात गर्दी कमीत कमी ठेवण्यास सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्ली