शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

Coronavirus Live Updates: पुढील १०० दिवसांपर्यंत कोरोनाची दुसरी लाट; २५ लाखांहून अधिक लोकांना बाधा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 07:14 IST

एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाने अध्ययनानुसार, कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त आहे

हरिश गुप्तानवी दिल्ली : भारतातील कोविड-१९ साथीची दुसऱ्या लाटेचा प्रभाव मेअखरपर्यंत राहू शकतो; परंतु, एप्रिलच्या मध्यापर्यंत या लाटेचा जोर वाढू शकतो. पंधरा फेब्रुवारी सुरु झालेली कोविड-१९ साथीच्या दुसरी लाट शंभर दिवसापर्यंत राहू शकते, असे स्पष्ट करतांना भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाने दुसऱ्या लाटेदरम्यान २५ लाखांहून अधिक लोकांना कोविडची बाधा होऊ शकते, असेही संकेत आहेत.

एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाने अध्ययनानुसार, कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त आहे. तथापि, लस उपलब्ध असल्याने लक्षणीय फरक होईल. एसबीआय नियमितपणे कोविड संशोधन अध्ययन करीत आहे. राजस्थान, गुजरात, केरळ, उत्तरांड, हरयाणा यासारख्या राज्यातील ज्येष्ठांच्या लोकसंख्येच्या २० टक्के ६० वर्षे वयाच्या लोकांचे लसीकरण झाले आहे. तथापि, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचे प्रमाण कमी आहे.

अन्य एका अहवालानुसार, भारतात ज्या वेगाने कोरोना संसर्गाचा फैलाव होत आहे, त्यापेक्षा भारतातील लसीकरणाचा दर अधिक आहे. दोन महिन्यांत भारतातील एकूण कोरोना रुग्ण संख्येच्या तुलनेत ५ कोटी ३० लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आला आहे. मागच्या एक वर्षात १ कोटी १७ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली. दिलासादायक म्हणजे कोविडच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग पसरण्याचा दर (आर-फॅक्टर) १.३२ आहे. २०२० मध्ये २७ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान हा दर १.८३ टक्के होता. नंतर हा दर एप्रिलच्या दुसऱ्या आणि मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याते १.२३ वर उतरला होता.

गेल्या २४ तासांत देशात आढळलेले ५३,४७६ बाधित

कोरोनाबाधितांचा नवा उच्चांक, रिकव्हरी रेटमध्येही घट

देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून, गुरुवारी गेल्या २४ तासांत तब्बल ५३ हजार ४७६ बाधितांची नोंद झाली. २३ ऑक्टोबरपासून प्रथमच एका दिवसात ५० हजारांहून अधिक बाधित आढळून आले आहेत. गेल्या दहा दिवसांत बाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. रिकव्हरी रेट ९५.२८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. 

लॉकडाऊन प्रभावी ठरला का?लॉकडाऊन निष्प्रभावी ठरेल. महाराष्ट्र आणि पंजाबसह इतर राज्य याची उदाहरणे आहेत. तेव्हा कोरोनावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे, हाच एकमात्र प्रभावी उपाय असल्याचे अहवालात नमूद आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील संसर्ग फैलावण्याचे प्रमाण जवळपास स्थिर आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या