शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! 'कोरोना कायमस्वरुपी नसणार, लवकरच याचा अंत होणार'; शास्त्रज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 12:48 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात 24 तासांत कोरोनाचे 2,71,202 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली.

नवी दिल्ली - देशात गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी (16 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,71,202 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा साडे चार लाखांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रिकव्हरी रेट 94.51 टक्क्यांवर आहे. याच दरम्यान एक मोठा दिलासा मिळाला आहे. 

देशात लसीकरण मोहीम सुरू केली असून आतापर्यंत लाखो लोकांनी लस घेतली आहे. कोरोनाविरोधात लसीकरण हे सर्वात मजबूत शस्त्र असल्याचं वॉशिंग्टनमधील शास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद (Dr Kutub Mahmoood) यांनी म्हटलं आहे. कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो आणि लवकरच कोरोना देखील संपेल, असंही त्यांनी सांगितलं. "कोरोना कायमस्वरूपी राहू शकत नाही आणि तो संपेल. हा एक प्रकारचा खेळ आहे आणि या खेळात कोणीही विजेता नाही, हा ड्रॉ होणार आहे. एक वेळ येईल जेव्हा हा व्हायरस लपून जाईल आणि आपण खरोखरच जिंकू. आपल्याला आपल्या मास्कच्या मागे लपून राहावं लागणार नाही, त्यापासून आपली सुटका होईल. या क्षणाच्या आपण खूप जवळ आलोय, असं मला वाटतं. जसजसे आपण या वर्षात पुढे जाऊ, तस तसं आपण लवकरच महामारीतून बाहेर येऊ" असं डॉ. कुतुब यांनी म्हटलं आहे. 

"आपल्याकडे लस, अँटीव्हायरल आणि अँटिबॉडिज ही शस्त्रे"

"कोरोना व्हायरस आपलं स्वरुप सातत्याने बदलत आहे आणि माणसातील बदलत्या प्रतिकारशक्तीशी जुळवून घेण्याचा दबाव असतो आणि मग तो या नवीन प्रकारांना बनवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते सुटू शकतील. हा एक बुद्धिबळाच्या खेळासारखा खेळ आहे. व्हायरस आणि माणूस यांच्यात हे एक साधर्म्य आहे. माणसाच्या आणि व्हायरसच्या हालचाली सुरू आहे. आपण बचावासाठी मास्क, हँड सॅनिटायझर्स, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत आहोत. आपल्याकडे लस, अँटीव्हायरल आणि अँटिबॉडिज ही शस्त्रे आहेत, जी आपण कोरोना विरुद्ध वापरली आहेत" असं डॉ. कुतुब यांनी सांगितलं.

"12 महिन्यांत जवळपास 60 टक्के लसीकरण साध्य"

"देशासाठी आणि भारतातील लस उत्पादकांसाठी ही खरोखर मोठी उपलब्धी आहे. भारतीय लसी जागतिक स्तरावर वापरल्या जातात. आणि गेल्या वर्षी यावेळी आपण या लसींना भारतीय DCGI मार्फत मंजुरी मिळवण्याच्या प्रक्रियेत होतो. त्यानंतर आपातकालीन वापराची परवानगी मिळाली आणि 12 महिन्यांत आपण जवळपास 60 टक्के लसीकरण साध्य केले आहे. ही भारत सरकार, आरोग्य मंत्रालय आणि लस उत्पादकांसाठी मोठी उपलब्धी आहे,” असं देखील डॉ. कुतुब यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन