शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

Coronavirus : कोरोना संसर्गाचा सामना करायला येत्या रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळू या, पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 07:41 IST

गर्दी करण्याचे टाळण्यासाठी आपण सर्वांनी मिळून रविवार, २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’चा प्रयोग करू या. त्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांनी घरातच राहू या

नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गाचा सामना आपण सर्वांनी एकत्र येऊ न करायचा आहे. कोरोनामुळे देशवासीयांना घाबरून जाण्याचे कारण नाही. पण गर्दी करणे, निष्कारण घराबाहेर पडणे टाळायला हवे. पुढील काही आठवडे घरातून बाहेर जाऊ नका. गर्दी करण्याचे टाळण्यासाठी आपण सर्वांनी मिळून रविवार, २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’चा प्रयोग करू या. त्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांनी घरातच राहू या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.हा जनता कर्फ्यूचा (जनतेतर्फे स्वयंस्फूर्त संचारबंदी) प्रयोग किती यशस्वी होतो, यावर पुढील पावले टाकता येतील, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. म्हणजेच जनता कर्फ्यूला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून सरकार पुढील उपाययोजना करेल, असे दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला उद्देशून केलेल्या अतिशय भावनिक भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या महिन्या - दीड महिन्यात १३0 कोटी भारतवासीयांनी ठामपणे कोरोनाचा सामना केला आहे. पण तेवढे पुरेसे नाही. त्यामुळे आपल्याला याहून अधिक सतर्क राहायला हवे. जागतिक महामारीच्या रूपाने पुढे आलेल्या कोरोनाच्या विषाणूंवर अद्याप औैषध सापडलेले नाही. त्यामुळे संकल्प व संयम पाळूनच आपणा सर्वांना मिळून कोरोनाला तोंड द्यायचे आहे.आपल्याला हा संयम व संकल्प ‘जनता कर्फ्यू’च्या स्वरूपात दाखवून द्यायचा आहे. या काळात कोणीच घराबाहेर पडता कामा नये. पण संध्याकाळी ५ वाजता सर्वांनी घराच्या दरवाजापाशी येऊ न टाळ्या वाजवून कोरोनाच्या मुकाबल्यासाठी लढणारे डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करावे, असे मोदी म्हणाले. मात्र या दिवशी अत्यावश्यक सेवांसाठी तसेच आरोग्य तपासणीसाठी बाहेर पडणाऱ्यांना अडवू नका. या लढाईत आपल्याला मदत करण्यासाठीच काही जणांना बाहेर पडावे लागेल, हे लक्षात घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.वृत्तपत्रांचे कौतुकपंतप्रधानांनी आपल्या भाषणात वृत्तपत्रांचेही कौतुक केले. ते म्हणाले, या संपूर्ण संकटाच्या काळात वर्तमानपत्रांनी जे काम केले आहे, ते अतुलनीय आहे.धान्याचा साठा करू नकाअन्नधान्याची वा कोणत्याच वस्तूची साठवणूक करू नका. त्यासाठी गर्दी करू नका. आपल्याकडे धान्याचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे त्याची टंचाई भासणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, कोरोनाचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्स तयार करण्यात येत आहे. कोरोनाविरुद्ध लढताना निर्माण झालेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची जबाबदारी या टास्क फोर्सवर राहील.पगार कापणे चुकीचेजे अत्यावश्यक सेवेत नाहीत, त्यांनी कामावर जाऊ नये. पण त्यांचे पगार कंपन्या, व्यापारी व उद्योजकांनी कापू नयेत, असे आवाहन करून पंतप्रधान मोदी म्हणाले, या काळात गरीब व कामगारांचे हितही पाहायचे आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांची आर्थिक अडचण होणार नाही, हे पाहणे आपली जबाबदारी आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी