शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोना संसर्गाचा सामना करायला येत्या रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळू या, पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 07:41 IST

गर्दी करण्याचे टाळण्यासाठी आपण सर्वांनी मिळून रविवार, २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’चा प्रयोग करू या. त्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांनी घरातच राहू या

नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गाचा सामना आपण सर्वांनी एकत्र येऊ न करायचा आहे. कोरोनामुळे देशवासीयांना घाबरून जाण्याचे कारण नाही. पण गर्दी करणे, निष्कारण घराबाहेर पडणे टाळायला हवे. पुढील काही आठवडे घरातून बाहेर जाऊ नका. गर्दी करण्याचे टाळण्यासाठी आपण सर्वांनी मिळून रविवार, २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’चा प्रयोग करू या. त्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांनी घरातच राहू या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.हा जनता कर्फ्यूचा (जनतेतर्फे स्वयंस्फूर्त संचारबंदी) प्रयोग किती यशस्वी होतो, यावर पुढील पावले टाकता येतील, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. म्हणजेच जनता कर्फ्यूला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून सरकार पुढील उपाययोजना करेल, असे दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला उद्देशून केलेल्या अतिशय भावनिक भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या महिन्या - दीड महिन्यात १३0 कोटी भारतवासीयांनी ठामपणे कोरोनाचा सामना केला आहे. पण तेवढे पुरेसे नाही. त्यामुळे आपल्याला याहून अधिक सतर्क राहायला हवे. जागतिक महामारीच्या रूपाने पुढे आलेल्या कोरोनाच्या विषाणूंवर अद्याप औैषध सापडलेले नाही. त्यामुळे संकल्प व संयम पाळूनच आपणा सर्वांना मिळून कोरोनाला तोंड द्यायचे आहे.आपल्याला हा संयम व संकल्प ‘जनता कर्फ्यू’च्या स्वरूपात दाखवून द्यायचा आहे. या काळात कोणीच घराबाहेर पडता कामा नये. पण संध्याकाळी ५ वाजता सर्वांनी घराच्या दरवाजापाशी येऊ न टाळ्या वाजवून कोरोनाच्या मुकाबल्यासाठी लढणारे डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करावे, असे मोदी म्हणाले. मात्र या दिवशी अत्यावश्यक सेवांसाठी तसेच आरोग्य तपासणीसाठी बाहेर पडणाऱ्यांना अडवू नका. या लढाईत आपल्याला मदत करण्यासाठीच काही जणांना बाहेर पडावे लागेल, हे लक्षात घ्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.वृत्तपत्रांचे कौतुकपंतप्रधानांनी आपल्या भाषणात वृत्तपत्रांचेही कौतुक केले. ते म्हणाले, या संपूर्ण संकटाच्या काळात वर्तमानपत्रांनी जे काम केले आहे, ते अतुलनीय आहे.धान्याचा साठा करू नकाअन्नधान्याची वा कोणत्याच वस्तूची साठवणूक करू नका. त्यासाठी गर्दी करू नका. आपल्याकडे धान्याचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे त्याची टंचाई भासणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, कोरोनाचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्स तयार करण्यात येत आहे. कोरोनाविरुद्ध लढताना निर्माण झालेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची जबाबदारी या टास्क फोर्सवर राहील.पगार कापणे चुकीचेजे अत्यावश्यक सेवेत नाहीत, त्यांनी कामावर जाऊ नये. पण त्यांचे पगार कंपन्या, व्यापारी व उद्योजकांनी कापू नयेत, असे आवाहन करून पंतप्रधान मोदी म्हणाले, या काळात गरीब व कामगारांचे हितही पाहायचे आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांची आर्थिक अडचण होणार नाही, हे पाहणे आपली जबाबदारी आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी