शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
5
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
6
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
7
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
8
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
9
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
10
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
11
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
12
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
13
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
14
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
15
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
16
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
17
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
18
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
19
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
20
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

CoronaVirus: पोलिसांच्या भीतीने रेल्वे मार्गाने ६०० किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 02:15 IST

बांधकाम मजुरांचे उलटे स्थलांतर; गावी जाण्यासाठी १४ दिवसांची पायपीट

रायगड (ओडिसा) : लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी मजुरांचे लोंढेच्या लोंढे आपल्या गावी जाण्यासाठी रस्त्यांवर उतरत असल्याचे आणि पायी घरी चालल्याचे वृत्त पाहिले आहे. झारखंड येथील आपल्या गावी जाण्यासाठी आंध्र प्रदेशातून तब्बल सहाशे किलोमीटर अंतर चौदा दिवसांत कापलेल्या मजुरांच्या गटाला ओडिसा पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले. पोलिसांच्या भीतीने या मजुरांनी रस्त्याचा मार्ग न धरता, चक्क रेल्वे मार्गाचा वापर केल्याचे समोर आले आहे. सोबत घेतलेले बिस्कीट आणि वाटेतील गावातील लोकांनी दिलेल्या अन्नावर त्यांनी दिवस काढल्याची माहिती समोर आली आहे.लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. अनेक ठिकाणी कोणतीही सोय न झाल्याने रोजंदारीवर काम करणारे मजूर आपल्या गावी जात आहेत. रेल्वे, स्थानिक बससेवा बंद असल्याने अनेक मजूर पायीच घरी जाणे पसंत करीत आहेत. मात्र, रस्त्यावर गर्दी करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांकडून काठीचा प्रसाद मिळत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एका बांधकाम प्रकल्पावर असलेल्या ११ मजुरांनी रेल्वे मार्गाच्या बाजूने पायी घरी जाण्याचा निर्णय घेतला.मोबाईलवरील गुगल मॅप, रेल्वे मार्गावरील चार्जिंग पॉइंटवर मोबाईल चार्ज करीत कधी घनदाट जंगल, तर कधी डोंगर कपारी आणि रेल्वे बोगद्यातून मार्गक्रमण करीत मजुरांनी १४ दिवसांत तब्बल ६०० किलोमीटर अंतर कापले. ओडिशातील रायगड जिल्ह्यात रेल्वे स्थानकानजीक पोलिसांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांचा घराचा प्रवास अर्ध्यावर थांबला. पोलिसांनी त्यांना विलगीकरण कक्षात धाडले आहे.झारखंडमधील लामरी कालन परिसरातील चटनिया गावातील रहिवासी असलेले बांधकाम मजूर प्रमोद कुमार राम म्हणाले, की आम्ही बांधकाम कंपनीमध्ये ७ दिवस काम केल्यानंतर लॉकडाऊन घोषित झाला. आम्ही ठेकेदाराकडे पैसे मागितल्यावर तो पळून गेला. कंपनीने आमची कोणतीही सोय केली नाही. काही दिवस आम्ही काढले.मात्र, रोजगारच नसल्याने जवळचे पैसेही संपू लागले. अखेर आम्ही घरी जायचा निर्णय घेतला. रस्त्याने गेल्यास पोलिसांचा मार बसेल म्हणून आम्ही रेल्वे मार्गाने जायचा निर्णय घेतला. मोबाईल ट्रॅकिंग सिस्टिीमचा वापर केला. तसेच, रेल्वेने आंध्र प्रदेशात या पूर्वी प्रवास झाला असल्याने रेल्वेमार्ग परिसरातील काही स्टेशन आणि भाग परिचयाचा होता. त्यामुळे अडचण आली नाही.दररोज दुपारी चार वाजल्यापासून रात्री उशिरा पर्यंत चालून, दररोज सरासरी चाळीस किलोमीटरहून अधिक अंतर पार केले. प्रत्येकाच्या जवळ दोनशे ते तीनशे रुपये होते. त्यातून बिस्कीटचे पुडे खरेदी केले. मार्गात लागणाºया गावातील नागरिकांनीही अन्न दिले. त्यावर गुजराण केली.-सुनील चौधरी, रा. मांझी गाव,जि. गढवा, झारखंड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या