शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

CoronaVirus: देशात भारी! 'या' राज्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 06:57 IST

देशापुढे ठेवला आदर्श; राज्यात साथ आटोक्यात येण्याची चिन्हे

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये उपचार सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या रुग्णांपेक्षा या साथीतून बरे झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे. सारा देश ‘कोविड-१९’नामक भयंकर महामारीचा मुकाबला करत असताना, साथ नियंत्रणात कशी आणावी याचा आदर्श केरळने घालून दिला आहे. या राज्यात १४० रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून या आजारातून बरे झालेल्यांची संख्या २५७ झाली आहे.केरळमध्ये शनिवारपर्यंत कोरोना विषाणूमुळे संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३९९ झाली असून, त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या सर्वाधिक असून, त्यानंतर तमिळनाडू व केरळ या राज्यांचा क्रमांक लागतो. मात्र, महाराष्ट्रामध्ये रुग्णांची एकूण संख्या ३ हजारांपेक्षा जास्त तर तमिळनाडूमध्ये १ हजारपेक्षा जास्त इतकी आहे. केरळमध्ये मात्र बाधितांची संख्या या दोन राज्यांपेक्षा कमी आहे. कोरोना विषाणूच्या एकूण रुग्णसंख्येबाबत केरळ देशामध्ये १४व्या क्रमांकावर आहे. (वृत्तसंस्था)मृत्यूदर अवघा ०.५ टक्केकेरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले की, आमच्या राज्यात कोरोना विषाणूच्या साथीमुळे मृत्यूदर ०.५ टक्के असून जगामध्ये हेच प्रमाण ५ टक्के इतके आहे. काही ठिकाणी हाच मृत्यूदर १० टक्क्यांहून अधिक आहे. रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षात ठेवलेल्या कोरोना रुग्णांपैकी बहुतांश लोकांची प्रकृती स्थिर आहे. फक्त काही रुग्णांचीच प्रकृती चिंताजनक आहे.केरळमध्ये आजारातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. असे असले तरी लॉकडाऊन शिथिल अथवा मागे घेण्याइतपत परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.- पिनाराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याKeralaकेरळ