शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

CoronaVirus: केंद्राच्या आक्षेपानंतर केरळने शिथिलीकरण नियम बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 00:46 IST

नियमांना केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर केरळ सरकारने केंद्राच्या मार्गदर्शिकेनुरूप फेरबदल केले.

नवी दिल्ली : कोरोना साथीचा प्रसार बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आलेल्या १४ पैकी सात जिल्ह्यांमध्ये ‘लॉकडाऊन’चे निर्बंध सोमवारपासून शिथिल करण्यासाठी केलेल्या नियमांना केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर केरळ सरकारने केंद्राच्या मार्गदर्शिकेनुरूप फेरबदल केले.आधी केलेल्या नियमांनुसार शिथिलीकरण सोमवारी सकाळी लागू होताच केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी केरळचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्याने केलेले नियम केंद्र सरकारने ५ एप्रिल रोजी जारी केलेल्या मार्गदर्शिकेचे अनेक बाबतींत उल्लंघन करणारे असल्याचा आक्षेप घेऊन शिथिलीकरणाच्या जास्तीच्या बाबी तात्काळ रद्द कराव्यात, असे सुचविले.केंद्राने ज्यास आक्षेप घेतला होता त्यात आंतरजिल्हा प्रवासास परवानगी देणे, सम व विषम नंबर प्लेटच्या खासगी वाहनांना एक दिवसाआड परवानगी देणे, दुचाकी वाहनावर मागील सीटवर बसून प्रवास करू देणे, उपाहारगृहे, केशकर्तनालये, इलेक्ट्रिक वस्तूंच्या दुरुस्तीची दुकाने पुन्हा सुरू करणे अशा बाबींचा समावेश असल्याचे समजते.काही भागांमध्ये निर्बंध शिथिल करून केरळ जनजीवन पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आजपासून पाऊल टाकत आहे. अजूनही धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने नागरिकांनी सावध राहण्याची व सर्व सुरक्षा उपाय पाळणे गरजेचे आहे.-पिनराय विजयन, मुख्यमंत्री केरळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या