शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

CoronaVirus: कोरोनाचे सुमारे ३ हजार रुग्ण बेपत्ता; कर्नाटकमधील मंत्र्याचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 21:23 IST

CoronaVirus: कर्नाटकच्या या मंत्र्यांने केलेल्या दाव्यानुसार, कोरोनाचे जवळपास ३ हजार रुग्ण बेपत्ता झाले आहेत.

ठळक मुद्देकर्नाटकमधील मंत्र्यांचा खळबळजनक दावाबेंगळुरूमधील सुमारे ३ हजार कोरोना रुग्ण बेपत्ता सरकारी यंत्रणा आणि प्रशासन अनभिज्ञ

बेंगळुरू: कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, कोरोनामुळे होणारे मृत्यूंचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. महाराष्ट्र, गोवाप्रमाणे कर्नाटकमध्येही लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र, कर्नाटकच्या एका मंत्र्यांने खळबळजनक दावा केला आहे. कर्नाटकच्या या मंत्र्यांने केलेल्या दाव्यानुसार, कोरोनाचे जवळपास ३ हजार रुग्ण बेपत्ता झाले आहेत. (karnataka minister claims that three thousand corona patients missing in bengaluru) 

कर्नाटकचे महसूल मंत्री ए. अशोक यांनी बुधवारी एक धक्कादायक दावा केला आहे. ए. अशोक यांनी बंगळुरूमधील दोन ते तीन हजार करोना रुग्ण बेपत्ता असल्याचं म्हटले आहे. या दोन ते तीन हजार रुग्णांनी आपले मोबाइल फोन बंद ठेवले असून काहींनी घर सोडून पलायन केले आहे, असाही दावा अशोक यांनी केला आहे. 

मारुतीचे अनेक प्रकल्प तात्पुरते बंद; आता कंपनी ऑक्सिजनची निर्मिती करणार

बेंगळुरूतील हजारो रुग्ण बेपत्ता

देशाची बडी आयटी सीटी मानल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये असा प्रकार घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माझ्या मते दोन ते तीन हजार करोनाबाधित लोकांनी त्यांचे मोबाइल बंद ठेऊन, घर सोडले आहे. ते नक्की कुठे गेलेत आम्हाला ठाऊक नाही. या व्यक्तींनी स्वत:चे फोन सुरू ठेवावेत. असे वागल्याने करोना रुग्णांची संख्या वाढत राहणार आहे. म्हणून या व्यक्तींना हात जोडून विनंती करतो की, त्यांनी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहन अशोक यांनी केले आहे. 

सर्वांना वेळेत लस मिळावी, यासाठी योग्य नियोजन करावे: नाना पटोले

कर्नाटकमध्ये कोरोनाचे ३१ हजार ८३० नवे रुग्ण

कर्नाटकमध्ये कोरोनाचे ३१ हजार ८३० रुग्ण आढळून आले असून १८० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये बंगळुरू शहरात सर्वाधिक म्हणजेच १७ हजार ५५० रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकात मंगळवार रात्रीपासून १४ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही लॉकडाउन लावत आहोत. सर्वांनी नियमांचे पालन करावे, सरकारला सहकार्य करावे, घरात थांबवे आणि अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी केले आहे.

RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक, मगच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार; ECI चा नवा नियम

दरम्यान, गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णालयांवर वाढलेला ताण लक्षात घेता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी लॉकडाऊनची घोषणा केली. गुरुवारी सायंकाळी ते सोमवारी सकाळपर्यंत लॉकडाऊन असेल. गोव्यात सध्या दर २४ तासांत दोन हजार नवे रुग्ण आढळतात व तीस कोरोनाग्रस्तांचा जीव जात आहे. त्यामुळे सरकारमधील आणि काही विरोधकांनी लॉकडाऊनची मागणी केली होती. सावंत सरकारवर राजकीय दबाव आला होता. अखेर त्यांनी लॉकडाऊन जाहीर केला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसKarnatakकर्नाटकBengaluruबेंगळूर