शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

CoronaVirus News: मजुरांना रेल्वेनं नव्हे, चार्टर्ड विमानानं माघारी आणणार; 'या' राज्याकडून तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:11 IST

मुख्यमंत्र्यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र; चार्टर्ड विमानांना परवानगी देण्याची मागणी

रांची: लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांचे प्रचंड हाल सुरू आहेत. हाती काम नसल्यानं मजुरांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योगधंदे ठप्प असल्यानं मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यासाठी रेल्वेनं श्रमिक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र तरीही मजुरांचे हाल संपत नाहीत. त्यामुळे झारखंड सरकारनं आता मोठा निर्णय घेतला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी लडाख, अंदमान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अडकलेल्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना माघारी आणण्यासाठी चार्टर्ड विमानं सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. यासाठी सोरेन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलं आहे. लडाख, अंदमान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना बस किंवा ट्रेनमधून राज्यात आणणं शक्य नसल्यानं चार्टर्ड विमानानं आणण्याची परवानगी द्या. ही परवानगी मिळाल्यास मजुरांना सुरक्षित घरी आणता येईल, अशी विनंती सोरेन यांनी शहांकडे केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परवानगीमुळे दीड लाख मजूर झारखंडमध्ये परतल्याची माहिती मुख्यमंत्री सोरेन यांनी पत्रात दिली आहे. लडाख, अंदमान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना विमानानं परत आणण्यासाठी झारखंड सरकारनं १२ मे रोजी परवानगी मागितली होती. सध्या लडाखमध्ये २००, ईशान्येतील राज्यांमध्ये जवळपास ४५० मजूर अडकले आहेत. त्यांना बस किंवा रेल्वेच्या माध्यमातून परत आणणं अशक्य आहे. त्यामुळे त्यांना चार्टर्ड विमानानं सन्मानपूर्वक झारखंडमध्ये आणण्याची परवानगी द्या, असं सोरेन यांनी शहांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरूसीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथपीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखलतिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज