शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

CoronaVirus News: मजुरांना रेल्वेनं नव्हे, चार्टर्ड विमानानं माघारी आणणार; 'या' राज्याकडून तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:11 IST

मुख्यमंत्र्यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र; चार्टर्ड विमानांना परवानगी देण्याची मागणी

रांची: लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांचे प्रचंड हाल सुरू आहेत. हाती काम नसल्यानं मजुरांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योगधंदे ठप्प असल्यानं मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यासाठी रेल्वेनं श्रमिक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र तरीही मजुरांचे हाल संपत नाहीत. त्यामुळे झारखंड सरकारनं आता मोठा निर्णय घेतला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी लडाख, अंदमान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अडकलेल्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना माघारी आणण्यासाठी चार्टर्ड विमानं सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. यासाठी सोरेन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलं आहे. लडाख, अंदमान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना बस किंवा ट्रेनमधून राज्यात आणणं शक्य नसल्यानं चार्टर्ड विमानानं आणण्याची परवानगी द्या. ही परवानगी मिळाल्यास मजुरांना सुरक्षित घरी आणता येईल, अशी विनंती सोरेन यांनी शहांकडे केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परवानगीमुळे दीड लाख मजूर झारखंडमध्ये परतल्याची माहिती मुख्यमंत्री सोरेन यांनी पत्रात दिली आहे. लडाख, अंदमान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना विमानानं परत आणण्यासाठी झारखंड सरकारनं १२ मे रोजी परवानगी मागितली होती. सध्या लडाखमध्ये २००, ईशान्येतील राज्यांमध्ये जवळपास ४५० मजूर अडकले आहेत. त्यांना बस किंवा रेल्वेच्या माध्यमातून परत आणणं अशक्य आहे. त्यामुळे त्यांना चार्टर्ड विमानानं सन्मानपूर्वक झारखंडमध्ये आणण्याची परवानगी द्या, असं सोरेन यांनी शहांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरूसीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथपीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखलतिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज