शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

School Reopen: देशात प्राथमिक शाळा लवकरच सुरू होणार?; ICMR चे डॉ. भार्गव यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 18:11 IST

भारतातही सुरुवातीला प्राइमरी स्कूल उघडले जाऊ शकतात. त्यानंतर माध्यमिक शाळा उघडता येतील

ठळक मुद्देसुरुवातीच्या काळात प्राथमिक शाळा उघडल्या जाऊ शकतात. कारण मोठ्या माणसांच्या तुलनेत छोट्या मुलांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका कमी आहे.कोरोना काळात यूरोपमध्ये अनेक देशात प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या नव्हत्या.टीचर, बस ड्रायव्हर आणि इतर कर्मचारी वर्गाचं लसीकरण होणं आवश्यक आहे

नवी दिल्ली – देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट(Corona Virus Second Wave) ओसरत असली तरी वैज्ञानिकांकडून वारंवार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका असताना अनेक राज्यांनी पुन्हा शाळा सुरू करण्याची(School Reopening) तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान ICMR चे डॉ. बलराम भार्गव यांनी शाळा सुरू करण्याबाबत मोठं विधान केले आहे.

मंगळवारी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत डॉ. बलराम भार्गव यांना शाळा उघडण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, सुरुवातीच्या काळात प्राथमिक शाळा उघडल्या जाऊ शकतात. कारण मोठ्या माणसांच्या तुलनेत छोट्या मुलांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका कमी आहे. यूरोपातील अनेक देशात कोरोनाच्या वाढत्या काळातही प्राथमिक शाळा(Primary School) उघडण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशातही प्राथमिक शाळा सुरू केल्या जाऊ शकतात. त्यानंतर माध्यमिक शाळा उघडता येतील असं त्यांनी सांगितले.

मोठ्या माणसांच्या तुलनेत छोटी मुलं सहजरित्या व्हायरसचा सामना करत आहेत. छोट्या मुलांच्या लंग्समध्ये ACE रिसेप्टर्स कमी असतं ज्याठिकाणी व्हायरस हल्ला करतं. कारण मुलांमध्ये ACE रिसेप्टर्स कमी असतं त्यामुळे लहान मुलांमध्ये संक्रमणाचा धोका कमी प्रमाणात आढळतो. परंतु त्याचसोबत ६ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये ५७.२ टक्के अँन्टिबॉडी आढळल्या आहेत. जे मोठ्या माणसांप्रमाणे आहेत असं भार्गव म्हणाले.

 

दरम्यान, कोरोना काळात यूरोपमध्ये अनेक देशात प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे भारतातही सुरुवातीला प्राइमरी स्कूल उघडले जाऊ शकतात. त्यानंतर माध्यमिक शाळा उघडता येतील. परंतु शाळेमधील जितकाही  सपोर्ट स्टाफ आहे त्यात टीचर, बस ड्रायव्हर आणि इतर कर्मचारी वर्गाचं लसीकरण होणं आवश्यक आहे असंही डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.

एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया काय म्हणाले?

भारतात अनेक शाळा कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच बंद आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत काही ठिकाणी १० वी आणि १२ वीचे वर्ग भरवण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा बंद करण्यात आले."ज्या ठिकाणी कोरोना विषाणूच्या केसेस कमी आहेत, त्या ठिकाणच्या शाळा सुरू करण्याबाबत मी सांगत आहे. ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या ठिकाणी अशी योजना आखली जाऊ शकते. परंतु संसर्ग पुन्हा वाढताना दिसल्यास त्या पुन्हा बंद केल्या जाऊ शकतात. परंतु जिल्ह्यांनी एका दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यावर विचार केला पाहिजे आणि शाळा सुरू करण्याच्या योजना आखल्या पाहिजे असंही गुलेरिया  म्हणाले.

मुलांमध्ये चांगली इम्युनिटी

"मुलांच्या एकूण विकासात शालेय शिक्षणाचा अतिशय महत्त्व आहे. ऑनलाईन वर्गांपेक्षा मुलांना शाळेतील वर्गांमध्ये जाणं आवश्यक आहे. भारतात अतिशय कमी प्रमाणात मुलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि ज्यांना ती झाली आहे ते आपली इम्युनिटी चांगली असल्यामुळे लवकर बरे होण्यास सक्षम आहेत. सीरो सर्व्हेमध्ये याचा खुलासा झाला की मुलांमंध्ये वयस्क लोकांपेक्षा अधिक प्रमाणात अँटिबॉडिज आहेत. यामुळे शाळा उघडल्या गेल्या पाहिजे. जितकं शाळेत शिक्षण सोपं असतं तितकं ते ऑनलाईनमध्ये नाही, असंही गुलेरिया यांनी स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या