शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

School Reopen: देशात प्राथमिक शाळा लवकरच सुरू होणार?; ICMR चे डॉ. भार्गव यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 18:11 IST

भारतातही सुरुवातीला प्राइमरी स्कूल उघडले जाऊ शकतात. त्यानंतर माध्यमिक शाळा उघडता येतील

ठळक मुद्देसुरुवातीच्या काळात प्राथमिक शाळा उघडल्या जाऊ शकतात. कारण मोठ्या माणसांच्या तुलनेत छोट्या मुलांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका कमी आहे.कोरोना काळात यूरोपमध्ये अनेक देशात प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या नव्हत्या.टीचर, बस ड्रायव्हर आणि इतर कर्मचारी वर्गाचं लसीकरण होणं आवश्यक आहे

नवी दिल्ली – देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट(Corona Virus Second Wave) ओसरत असली तरी वैज्ञानिकांकडून वारंवार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका असताना अनेक राज्यांनी पुन्हा शाळा सुरू करण्याची(School Reopening) तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान ICMR चे डॉ. बलराम भार्गव यांनी शाळा सुरू करण्याबाबत मोठं विधान केले आहे.

मंगळवारी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत डॉ. बलराम भार्गव यांना शाळा उघडण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, सुरुवातीच्या काळात प्राथमिक शाळा उघडल्या जाऊ शकतात. कारण मोठ्या माणसांच्या तुलनेत छोट्या मुलांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका कमी आहे. यूरोपातील अनेक देशात कोरोनाच्या वाढत्या काळातही प्राथमिक शाळा(Primary School) उघडण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशातही प्राथमिक शाळा सुरू केल्या जाऊ शकतात. त्यानंतर माध्यमिक शाळा उघडता येतील असं त्यांनी सांगितले.

मोठ्या माणसांच्या तुलनेत छोटी मुलं सहजरित्या व्हायरसचा सामना करत आहेत. छोट्या मुलांच्या लंग्समध्ये ACE रिसेप्टर्स कमी असतं ज्याठिकाणी व्हायरस हल्ला करतं. कारण मुलांमध्ये ACE रिसेप्टर्स कमी असतं त्यामुळे लहान मुलांमध्ये संक्रमणाचा धोका कमी प्रमाणात आढळतो. परंतु त्याचसोबत ६ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये ५७.२ टक्के अँन्टिबॉडी आढळल्या आहेत. जे मोठ्या माणसांप्रमाणे आहेत असं भार्गव म्हणाले.

 

दरम्यान, कोरोना काळात यूरोपमध्ये अनेक देशात प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे भारतातही सुरुवातीला प्राइमरी स्कूल उघडले जाऊ शकतात. त्यानंतर माध्यमिक शाळा उघडता येतील. परंतु शाळेमधील जितकाही  सपोर्ट स्टाफ आहे त्यात टीचर, बस ड्रायव्हर आणि इतर कर्मचारी वर्गाचं लसीकरण होणं आवश्यक आहे असंही डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.

एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया काय म्हणाले?

भारतात अनेक शाळा कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच बंद आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत काही ठिकाणी १० वी आणि १२ वीचे वर्ग भरवण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा बंद करण्यात आले."ज्या ठिकाणी कोरोना विषाणूच्या केसेस कमी आहेत, त्या ठिकाणच्या शाळा सुरू करण्याबाबत मी सांगत आहे. ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या ठिकाणी अशी योजना आखली जाऊ शकते. परंतु संसर्ग पुन्हा वाढताना दिसल्यास त्या पुन्हा बंद केल्या जाऊ शकतात. परंतु जिल्ह्यांनी एका दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यावर विचार केला पाहिजे आणि शाळा सुरू करण्याच्या योजना आखल्या पाहिजे असंही गुलेरिया  म्हणाले.

मुलांमध्ये चांगली इम्युनिटी

"मुलांच्या एकूण विकासात शालेय शिक्षणाचा अतिशय महत्त्व आहे. ऑनलाईन वर्गांपेक्षा मुलांना शाळेतील वर्गांमध्ये जाणं आवश्यक आहे. भारतात अतिशय कमी प्रमाणात मुलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि ज्यांना ती झाली आहे ते आपली इम्युनिटी चांगली असल्यामुळे लवकर बरे होण्यास सक्षम आहेत. सीरो सर्व्हेमध्ये याचा खुलासा झाला की मुलांमंध्ये वयस्क लोकांपेक्षा अधिक प्रमाणात अँटिबॉडिज आहेत. यामुळे शाळा उघडल्या गेल्या पाहिजे. जितकं शाळेत शिक्षण सोपं असतं तितकं ते ऑनलाईनमध्ये नाही, असंही गुलेरिया यांनी स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या