शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

Coronavirus: ३ मे पर्यंत देशात कोरोना संक्रमणाची तीव्रता वाढणार का? ICMR ने दिलं उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 08:27 IST

कोरोना संक्रमणातून बरे झाल्यानंतर त्या रुग्णांप्रती समाजाची वागणूक शंकेसारखी असते. उपचारानंतर तो रुग्ण पूर्ण बरा झाला आहे हे स्वीकारायला समाज तयार नाही.

ठळक मुद्देदेशात आतापर्यंत २१ हजार ७०० जणांना कोरोनाची लागणबरे होऊन परतणाऱ्या रुग्णांप्रती समाजाची वागणूक चांगली नाहीएम्सच्या डॉक्टरांनी व्यक्त केली खंत

नवी दिल्ली – देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील काही दिवसांत कोरोना महामारीचे दिवसाला १ हजारपेक्षाही अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमणाने भारतात वेग पकडलाय का? असा प्रश्न निर्माण होतो. ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कारण अवघे काही दिवस लॉकडाऊनसाठी शिल्लक असताना देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होणं चिंताजनक आहे.

याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) गुरुवारी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलाराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ३ मे पर्यंत कोरोना व्हायरसची व्याप्ती आणखी वाढेल हे सांगणे फार कठीण आहे. तथापि, भारत अद्याप स्थिर स्थितीत आहे. सकारात्मकतेचा दर ४.५ टक्के वर स्थिर राहतो, त्या आधारावर देशाचा आलेख जलद गतीने वाढत नाही असं त्यांनी सांगितले.

कोरोनाला रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी ३ मेपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन सुरु ठेवला आहे. कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणे गरजेचे आहे. सध्या भारतात २१ हजार ७०० कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ७०० च्या वर लोकांचा जीव गेला आहे. गेल्या २४ तासात १ हजार ४०९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, कोरोना संक्रमणातून बरे झाल्यानंतर त्या रुग्णांप्रती समाजाची वागणूक शंकेसारखी असते. उपचारानंतर तो रुग्ण पूर्ण बरा झाला आहे हे स्वीकारायला समाज तयार नाही. त्यामुळे समाज अशा रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबांना सापत्न वागणूक देतो. त्यामुळे ज्यांच्यात कोरोनाचे लक्षण दिसत आहेत त्यांची समोर येण्याची मानसिकता नसते. कारण त्यांना वाटतं की, मी दवाखान्यात गेलो अथवा हॉस्पिटला गेलो तर शेजारील लोक आपल्या कुटुंबाला वाळीत टाकतील त्यांना त्रास देतील असं एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. तसेच समाजाच्या अशा वागण्यामुळे कोरोनाग्रस्त वाढत आहेत आणि मृत्यूदरही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या