शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ३ मे पर्यंत देशात कोरोना संक्रमणाची तीव्रता वाढणार का? ICMR ने दिलं उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 08:27 IST

कोरोना संक्रमणातून बरे झाल्यानंतर त्या रुग्णांप्रती समाजाची वागणूक शंकेसारखी असते. उपचारानंतर तो रुग्ण पूर्ण बरा झाला आहे हे स्वीकारायला समाज तयार नाही.

ठळक मुद्देदेशात आतापर्यंत २१ हजार ७०० जणांना कोरोनाची लागणबरे होऊन परतणाऱ्या रुग्णांप्रती समाजाची वागणूक चांगली नाहीएम्सच्या डॉक्टरांनी व्यक्त केली खंत

नवी दिल्ली – देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील काही दिवसांत कोरोना महामारीचे दिवसाला १ हजारपेक्षाही अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमणाने भारतात वेग पकडलाय का? असा प्रश्न निर्माण होतो. ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कारण अवघे काही दिवस लॉकडाऊनसाठी शिल्लक असताना देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होणं चिंताजनक आहे.

याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) गुरुवारी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलाराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ३ मे पर्यंत कोरोना व्हायरसची व्याप्ती आणखी वाढेल हे सांगणे फार कठीण आहे. तथापि, भारत अद्याप स्थिर स्थितीत आहे. सकारात्मकतेचा दर ४.५ टक्के वर स्थिर राहतो, त्या आधारावर देशाचा आलेख जलद गतीने वाढत नाही असं त्यांनी सांगितले.

कोरोनाला रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी ३ मेपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन सुरु ठेवला आहे. कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणे गरजेचे आहे. सध्या भारतात २१ हजार ७०० कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ७०० च्या वर लोकांचा जीव गेला आहे. गेल्या २४ तासात १ हजार ४०९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, कोरोना संक्रमणातून बरे झाल्यानंतर त्या रुग्णांप्रती समाजाची वागणूक शंकेसारखी असते. उपचारानंतर तो रुग्ण पूर्ण बरा झाला आहे हे स्वीकारायला समाज तयार नाही. त्यामुळे समाज अशा रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबांना सापत्न वागणूक देतो. त्यामुळे ज्यांच्यात कोरोनाचे लक्षण दिसत आहेत त्यांची समोर येण्याची मानसिकता नसते. कारण त्यांना वाटतं की, मी दवाखान्यात गेलो अथवा हॉस्पिटला गेलो तर शेजारील लोक आपल्या कुटुंबाला वाळीत टाकतील त्यांना त्रास देतील असं एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. तसेच समाजाच्या अशा वागण्यामुळे कोरोनाग्रस्त वाढत आहेत आणि मृत्यूदरही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या