शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोना विषाणूंच्या संसर्गशक्तीत जूनअखेरपासून झाली वाढ, आरोग्यस्थिती अधिक बिकट होण्याची तज्ज्ञांना भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 09:56 IST

अभ्यासातील निष्कर्ष; आरोग्यस्थिती आणखी बिघडण्याची भीती

ठळक मुद्देअभ्यासातील निष्कर्ष; आरोग्यस्थिती आणखी बिघडण्याची भीती

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गशक्तीमध्ये (आर नंबर) जूनच्या अखेरीपासून मोठी वाढ झाली असल्याचे एका अभ्यासातून आढळून आले. या साथीच्या दुसऱ्या लाटेने कळस गाठल्यानंतरची ही घटना आहे. त्यापायी कोरोना साथीमुळे आरोग्यस्थिती आणखी बिकट होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांना वाटत आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रमाणात जूनमध्ये घट झाली होती. मात्र २० जून ते ७ जुलै या कालावधीत संसर्गामध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. याच कालावधीत देशात विविध तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळांवर हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यातूनही कोरोनाचा प्रसार वाढला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

१५ मे ते २६ जून या कालावधीत संसर्गाची पातळी ०.७८ ते ०.८८च्या दरम्यान होती. चेन्नई येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमधील शास्त्रज्ञ सीताभ्रा सिन्हा यांनी गणिती प्रारूपांच्या मदतीने या स्थितीचे विश्लेषण केले.त्यांनी सांगितले की, सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होण्याचा वेग गेल्या काही दिवसांमध्ये मंदावला आहे. १०० कोरोना रुग्णांच्या एका गटामुळे आता ८८ लोकांना या आजाराचा संसर्ग होतो. पूर्वी हेच प्रमाण ७८ होते. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येवरून कोरोना विषाणूच्या संसर्गशक्तीबद्दल निष्कर्ष काढता येतो. विषाणूंमध्ये संसर्गशक्ती कमी असल्यास साथ मोठ्या प्रमाणावर फैलावण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. 

महाराष्ट्र, केरळमध्ये जास्त प्रमाणमहाराष्ट्र, केरळ वगळता अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गशक्तीचे प्रमाण एकपेक्षा कमी आहे. तर महाराष्ट्र, केरळमध्ये हे प्रमाण अनुक्रमे १.१ व १ असे प्रमाण आहे. केंद्राने कोरोना साथीसंदर्भात नेमलेल्या कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले होते की, कोरोना रुग्णांची संख्या सर्वात कमी होण्याच्या पातळीपासून आपला देश अद्याप खूप दूर आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसKeralaकेरळNIti Ayogनिती आयोग