शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोना विषाणूंच्या संसर्गशक्तीत जूनअखेरपासून झाली वाढ, आरोग्यस्थिती अधिक बिकट होण्याची तज्ज्ञांना भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 09:56 IST

अभ्यासातील निष्कर्ष; आरोग्यस्थिती आणखी बिघडण्याची भीती

ठळक मुद्देअभ्यासातील निष्कर्ष; आरोग्यस्थिती आणखी बिघडण्याची भीती

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गशक्तीमध्ये (आर नंबर) जूनच्या अखेरीपासून मोठी वाढ झाली असल्याचे एका अभ्यासातून आढळून आले. या साथीच्या दुसऱ्या लाटेने कळस गाठल्यानंतरची ही घटना आहे. त्यापायी कोरोना साथीमुळे आरोग्यस्थिती आणखी बिकट होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांना वाटत आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रमाणात जूनमध्ये घट झाली होती. मात्र २० जून ते ७ जुलै या कालावधीत संसर्गामध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. याच कालावधीत देशात विविध तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळांवर हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यातूनही कोरोनाचा प्रसार वाढला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

१५ मे ते २६ जून या कालावधीत संसर्गाची पातळी ०.७८ ते ०.८८च्या दरम्यान होती. चेन्नई येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमधील शास्त्रज्ञ सीताभ्रा सिन्हा यांनी गणिती प्रारूपांच्या मदतीने या स्थितीचे विश्लेषण केले.त्यांनी सांगितले की, सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होण्याचा वेग गेल्या काही दिवसांमध्ये मंदावला आहे. १०० कोरोना रुग्णांच्या एका गटामुळे आता ८८ लोकांना या आजाराचा संसर्ग होतो. पूर्वी हेच प्रमाण ७८ होते. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येवरून कोरोना विषाणूच्या संसर्गशक्तीबद्दल निष्कर्ष काढता येतो. विषाणूंमध्ये संसर्गशक्ती कमी असल्यास साथ मोठ्या प्रमाणावर फैलावण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. 

महाराष्ट्र, केरळमध्ये जास्त प्रमाणमहाराष्ट्र, केरळ वगळता अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गशक्तीचे प्रमाण एकपेक्षा कमी आहे. तर महाराष्ट्र, केरळमध्ये हे प्रमाण अनुक्रमे १.१ व १ असे प्रमाण आहे. केंद्राने कोरोना साथीसंदर्भात नेमलेल्या कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले होते की, कोरोना रुग्णांची संख्या सर्वात कमी होण्याच्या पातळीपासून आपला देश अद्याप खूप दूर आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसKeralaकेरळNIti Ayogनिती आयोग