शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Coronavirus : कोरोना विषाणूंच्या संसर्गशक्तीत जूनअखेरपासून झाली वाढ, आरोग्यस्थिती अधिक बिकट होण्याची तज्ज्ञांना भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 09:56 IST

अभ्यासातील निष्कर्ष; आरोग्यस्थिती आणखी बिघडण्याची भीती

ठळक मुद्देअभ्यासातील निष्कर्ष; आरोग्यस्थिती आणखी बिघडण्याची भीती

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गशक्तीमध्ये (आर नंबर) जूनच्या अखेरीपासून मोठी वाढ झाली असल्याचे एका अभ्यासातून आढळून आले. या साथीच्या दुसऱ्या लाटेने कळस गाठल्यानंतरची ही घटना आहे. त्यापायी कोरोना साथीमुळे आरोग्यस्थिती आणखी बिकट होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांना वाटत आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रमाणात जूनमध्ये घट झाली होती. मात्र २० जून ते ७ जुलै या कालावधीत संसर्गामध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. याच कालावधीत देशात विविध तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळांवर हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यातूनही कोरोनाचा प्रसार वाढला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

१५ मे ते २६ जून या कालावधीत संसर्गाची पातळी ०.७८ ते ०.८८च्या दरम्यान होती. चेन्नई येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमधील शास्त्रज्ञ सीताभ्रा सिन्हा यांनी गणिती प्रारूपांच्या मदतीने या स्थितीचे विश्लेषण केले.त्यांनी सांगितले की, सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होण्याचा वेग गेल्या काही दिवसांमध्ये मंदावला आहे. १०० कोरोना रुग्णांच्या एका गटामुळे आता ८८ लोकांना या आजाराचा संसर्ग होतो. पूर्वी हेच प्रमाण ७८ होते. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येवरून कोरोना विषाणूच्या संसर्गशक्तीबद्दल निष्कर्ष काढता येतो. विषाणूंमध्ये संसर्गशक्ती कमी असल्यास साथ मोठ्या प्रमाणावर फैलावण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. 

महाराष्ट्र, केरळमध्ये जास्त प्रमाणमहाराष्ट्र, केरळ वगळता अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गशक्तीचे प्रमाण एकपेक्षा कमी आहे. तर महाराष्ट्र, केरळमध्ये हे प्रमाण अनुक्रमे १.१ व १ असे प्रमाण आहे. केंद्राने कोरोना साथीसंदर्भात नेमलेल्या कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले होते की, कोरोना रुग्णांची संख्या सर्वात कमी होण्याच्या पातळीपासून आपला देश अद्याप खूप दूर आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसKeralaकेरळNIti Ayogनिती आयोग