शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : राजस्थानच्या भिलवाडा शहरात डॉक्टर व कम्पाउंडरना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 06:58 IST

Coronavirus : ही बाब उघड होताच भिलवाडा जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद केल्या आहेत. सर्व दुकानेही बंद आहेत.

भिलवाडा : राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात कोरोना विषाणूची सहा जणांना लागण झाल्याने जिल्ह्यातील लोक धास्तावले आहेत. तेथील २७ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांना संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. त्यात तीन डॉक्टर्स व तीन कम्पाउंडर्सचा समावेश आहे.ही बाब उघड होताच भिलवाडा जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद केल्या आहेत. सर्व दुकानेही बंद आहेत. कोरोनाचा अधिक संसर्ग कोणाला होऊ नये, म्हणून राजस्थान सरकारने भिलवाडा जिल्ह्याची सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित रुग्णालयाच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

ज्या रुग्णालयातील डॉक्टर्स व कम्पाउंंडर्सना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, ते बृजेश बांगड मेमोरियल हॉस्पिटल बंद करण्यात आले आहे. या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सुमारे ३५ रुग्णांपैकी काही रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे, प्रकृती चिंताजनक असलेल्या ५ ते १० गंभीर रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. बांगड हॉस्पिटलच्या एक किलोमीटरच्या परिसरात संचारबंदी लागू केली आहे. या घटनेनंतर सदर हॉस्पिटल दुपारी सील करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये जाण्यास आता डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही परवानगी नाही. भिलवाडा शहरातील लोकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. मात्र अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते १0 व संध्याकाळी ५ ते रात्री ७ या काळात टप्प्याटप्प्याने सवलत देण्यात येणार आहे.जिल्ह्यात नव्या वाहनांना प्रवेश करायला बंदी आहे. स्थानिक लोकांना घरी परतण्यात अडचण येणार नाही. मात्र त्यांची सीमेवर तपासणी करण्यात येईल आणि मगच शहरात प्रवेश द्यायचा की नाही, हा निर्णय घेतला जाईल. हे डॉक्टर्स व कम्पाउंडर्स कोणाकोणाच्या संपर्कात आले होते, याचाही शोध घेण्यात येत आहे. त्यानंतर त्यांचीही तपासणी करण्यात येईल. (वृत्तसंस्था)प्रकरण गंभीर का?आतापर्यंत परदेशांतून परतलेल्यांनाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचे प्रमाण अधिक होते. या प्रकरणात मात्र सामुदायिक संसर्ग झाल्याचे लक्षात आले आहे. सामुदायिक संसर्ग अधिक धोकादायक आहे. त्यामुळे राजस्थान सरकार अधिक चिंतेत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थान