शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

Coronavirus: "अन्य देशांपेक्षा भारताची स्थिती आटोक्यात; वेळेत उपाय योजल्याने झाले शक्य"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:25 AM

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहेत, जनतेच्या सहभागामुळे हा लढा शक्य झाला आहे. यापुढेही मास्कचा वापर करीत अधिक काळजी घेत सतर्क राहावे लागेल, असे मोदी यांनी सांगितले.

नवी दिल्ली : कोरोनावर नियंत्रण आणण्यात भारताला अपयश येईल, असे सर्वांना वाटत होते. पण लॉकडाऊन, निर्बंध आणि जनतेला विश्वासात घेऊन सरकारने उचललेली पावले यांमुळे अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.

केरळमधील रेव्हरंड जोसेफ मार थोमा यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, कोरोना हा केवळ शारीरिक आजार नसून, हे मोठे संकट आहे आणि सारे जग कोरोनाशी झुंज देत आहे. या लढ्यासाठी प्रत्येक भारतीयाला आपली जीवनशैली बदलावी लागेल. चुकीच्या सवयी सोडाव्या लागतील.

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहेत, जनतेच्या सहभागामुळे हा लढा शक्य झाला आहे. यापुढेही मास्कचा वापर करीत अधिक काळजी घेत सतर्क राहावे लागेल, असे मोदी यांनी सांगितले.राहुल यांची टीकादेशात कोरोनाबाधितांची संख्या ५ लाखांवर गेली आहे. देशाच्या प्रत्येक भागात रुग्ण आढळत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोरोनाविरुद्धच्या लढ्याची उपाययोजना नसल्यानेच हे घडत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. रुग्ण वाढत असले तरी मंत्रिगट वा आयसीएमआरची बैठक झालेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेण्याऐवजी निवेदन जारी करणे सुरू केले आहे. पंतप्रधानांसह सारेच प्रश्नांची उत्तर देणे टाळत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी