शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: "अन्य देशांपेक्षा भारताची स्थिती आटोक्यात; वेळेत उपाय योजल्याने झाले शक्य"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:23 IST

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहेत, जनतेच्या सहभागामुळे हा लढा शक्य झाला आहे. यापुढेही मास्कचा वापर करीत अधिक काळजी घेत सतर्क राहावे लागेल, असे मोदी यांनी सांगितले.

नवी दिल्ली : कोरोनावर नियंत्रण आणण्यात भारताला अपयश येईल, असे सर्वांना वाटत होते. पण लॉकडाऊन, निर्बंध आणि जनतेला विश्वासात घेऊन सरकारने उचललेली पावले यांमुळे अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.

केरळमधील रेव्हरंड जोसेफ मार थोमा यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, कोरोना हा केवळ शारीरिक आजार नसून, हे मोठे संकट आहे आणि सारे जग कोरोनाशी झुंज देत आहे. या लढ्यासाठी प्रत्येक भारतीयाला आपली जीवनशैली बदलावी लागेल. चुकीच्या सवयी सोडाव्या लागतील.

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहेत, जनतेच्या सहभागामुळे हा लढा शक्य झाला आहे. यापुढेही मास्कचा वापर करीत अधिक काळजी घेत सतर्क राहावे लागेल, असे मोदी यांनी सांगितले.राहुल यांची टीकादेशात कोरोनाबाधितांची संख्या ५ लाखांवर गेली आहे. देशाच्या प्रत्येक भागात रुग्ण आढळत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोरोनाविरुद्धच्या लढ्याची उपाययोजना नसल्यानेच हे घडत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. रुग्ण वाढत असले तरी मंत्रिगट वा आयसीएमआरची बैठक झालेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेण्याऐवजी निवेदन जारी करणे सुरू केले आहे. पंतप्रधानांसह सारेच प्रश्नांची उत्तर देणे टाळत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी