शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाविरोधातील लढाईत भारतातील या राज्यांनी घेतली आघाडी, काही ठिकाणी रुग्णांची संख्या शुन्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 09:51 IST

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. मात्र अशा परिस्थितीतही देशातील काही राज्यांनी कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेत आघाडी घेतली आहे.

ठळक मुद्देतेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ आणि हरियाणा या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर ३ टक्क्यांहून कमी आहेपूर्वोत्तर भारतात कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर जवळपास शुन्यावर पोहोचला आहे.राष्ट्रीय स्तरावरही कोरोना रुग्णांच्या वाढीसाठी लागणारा कालावधी १४ दिवसांवर पोहोचला आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलाव दिवसेंदिवस गंभीर रूप घेत चालला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. मात्र अशा परिस्थितीतही देशातील काही राज्यांनी कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेत आघाडी घेतली आहे. तसेच काही राज्यांमध्ये तर आजच्या घडीला कोरोनाचा एकही रुग्ण  नाही. कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेत दक्षिणेकडील आणि पूर्वोत्तर भारतातील राज्यांनी लक्षणीय आघाडी घेतली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार तेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ आणि हरियाणा या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर ३ टक्क्यांहून कमी आहे. या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा काळ २० दिवसांवर पोहोचला आहे. तर पूर्वोत्तर भारतात हा दर जवळपास शुन्यावर पोहोचला आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरही कोरोना रुग्णांच्या वाढीसाठी लागणारा कालावधी १४ दिवसांवर पोहोचला आहे.

गेल्या १० दिवसांचा विचार केल्यास कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी ३६ दिवसांवर पोहेचला आहे. तर हरियाणामध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी ३५ दिवस लागले आहेत. तर उत्तर प्रदेशात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यास २४ दिवस लागले आहेत.

राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाम जास्त असले तरी आता हे प्रमाण हळूहळू कमी होत चालले आहे. या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी १८ दिवसांवर पोहोचले आहे. तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल पंजाब आणि गुजरातमध्ये रुग्णसंख्या दुप्पच होण्यासाठी लागणारा कालावधी १४ दिवसांवर पोहोचला आहे.

सकारात्मक बाब म्हणजे मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि गोवा या राज्यांमध्ये आजच्या घडीला कोरोनाचा एकही रुग्ण नाही आहे. या राज्यांमधील सर्व कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सिक्कीम, नागालँड, दमण-दीव आणि लक्षद्विप येथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.

सद्यस्थितीत भारताता कोरोनाचे ३५ हजार ६१० रुग्ण आहेत. त्यापैकी ८ हजार ३७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत १ हजार ७५ रुग्णांता मृत्यू झाला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत