शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

CoronaVirus: कोरोनाविरोधातील लढाईत भारतातील या राज्यांनी घेतली आघाडी, काही ठिकाणी रुग्णांची संख्या शुन्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 09:51 IST

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. मात्र अशा परिस्थितीतही देशातील काही राज्यांनी कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेत आघाडी घेतली आहे.

ठळक मुद्देतेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ आणि हरियाणा या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर ३ टक्क्यांहून कमी आहेपूर्वोत्तर भारतात कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर जवळपास शुन्यावर पोहोचला आहे.राष्ट्रीय स्तरावरही कोरोना रुग्णांच्या वाढीसाठी लागणारा कालावधी १४ दिवसांवर पोहोचला आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलाव दिवसेंदिवस गंभीर रूप घेत चालला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. मात्र अशा परिस्थितीतही देशातील काही राज्यांनी कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेत आघाडी घेतली आहे. तसेच काही राज्यांमध्ये तर आजच्या घडीला कोरोनाचा एकही रुग्ण  नाही. कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेत दक्षिणेकडील आणि पूर्वोत्तर भारतातील राज्यांनी लक्षणीय आघाडी घेतली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार तेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ आणि हरियाणा या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर ३ टक्क्यांहून कमी आहे. या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा काळ २० दिवसांवर पोहोचला आहे. तर पूर्वोत्तर भारतात हा दर जवळपास शुन्यावर पोहोचला आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरही कोरोना रुग्णांच्या वाढीसाठी लागणारा कालावधी १४ दिवसांवर पोहोचला आहे.

गेल्या १० दिवसांचा विचार केल्यास कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी ३६ दिवसांवर पोहेचला आहे. तर हरियाणामध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी ३५ दिवस लागले आहेत. तर उत्तर प्रदेशात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यास २४ दिवस लागले आहेत.

राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाम जास्त असले तरी आता हे प्रमाण हळूहळू कमी होत चालले आहे. या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी १८ दिवसांवर पोहोचले आहे. तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल पंजाब आणि गुजरातमध्ये रुग्णसंख्या दुप्पच होण्यासाठी लागणारा कालावधी १४ दिवसांवर पोहोचला आहे.

सकारात्मक बाब म्हणजे मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि गोवा या राज्यांमध्ये आजच्या घडीला कोरोनाचा एकही रुग्ण नाही आहे. या राज्यांमधील सर्व कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सिक्कीम, नागालँड, दमण-दीव आणि लक्षद्विप येथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.

सद्यस्थितीत भारताता कोरोनाचे ३५ हजार ६१० रुग्ण आहेत. त्यापैकी ८ हजार ३७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत १ हजार ७५ रुग्णांता मृत्यू झाला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत