शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाविरोधातील लढाईत भारतातील या राज्यांनी घेतली आघाडी, काही ठिकाणी रुग्णांची संख्या शुन्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 09:51 IST

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. मात्र अशा परिस्थितीतही देशातील काही राज्यांनी कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेत आघाडी घेतली आहे.

ठळक मुद्देतेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ आणि हरियाणा या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर ३ टक्क्यांहून कमी आहेपूर्वोत्तर भारतात कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर जवळपास शुन्यावर पोहोचला आहे.राष्ट्रीय स्तरावरही कोरोना रुग्णांच्या वाढीसाठी लागणारा कालावधी १४ दिवसांवर पोहोचला आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलाव दिवसेंदिवस गंभीर रूप घेत चालला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. मात्र अशा परिस्थितीतही देशातील काही राज्यांनी कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेत आघाडी घेतली आहे. तसेच काही राज्यांमध्ये तर आजच्या घडीला कोरोनाचा एकही रुग्ण  नाही. कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेत दक्षिणेकडील आणि पूर्वोत्तर भारतातील राज्यांनी लक्षणीय आघाडी घेतली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार तेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ आणि हरियाणा या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर ३ टक्क्यांहून कमी आहे. या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा काळ २० दिवसांवर पोहोचला आहे. तर पूर्वोत्तर भारतात हा दर जवळपास शुन्यावर पोहोचला आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरही कोरोना रुग्णांच्या वाढीसाठी लागणारा कालावधी १४ दिवसांवर पोहोचला आहे.

गेल्या १० दिवसांचा विचार केल्यास कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी ३६ दिवसांवर पोहेचला आहे. तर हरियाणामध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी ३५ दिवस लागले आहेत. तर उत्तर प्रदेशात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यास २४ दिवस लागले आहेत.

राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाम जास्त असले तरी आता हे प्रमाण हळूहळू कमी होत चालले आहे. या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी १८ दिवसांवर पोहोचले आहे. तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल पंजाब आणि गुजरातमध्ये रुग्णसंख्या दुप्पच होण्यासाठी लागणारा कालावधी १४ दिवसांवर पोहोचला आहे.

सकारात्मक बाब म्हणजे मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि गोवा या राज्यांमध्ये आजच्या घडीला कोरोनाचा एकही रुग्ण नाही आहे. या राज्यांमधील सर्व कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सिक्कीम, नागालँड, दमण-दीव आणि लक्षद्विप येथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.

सद्यस्थितीत भारताता कोरोनाचे ३५ हजार ६१० रुग्ण आहेत. त्यापैकी ८ हजार ३७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत १ हजार ७५ रुग्णांता मृत्यू झाला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत