शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

Coronavirus : भारतातील रेल्वे १९७४ नंतर प्रथमच झाली बंद!, युद्धकाळातही सुरू होत्या गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 05:35 IST

coronavirus : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वेगाड्या बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. सध्या केवळ मालगाड्याच सुरू असून, त्यातून अत्यावश्यक वस्तूंची ने-आण केली जात आहे.

मुंबई : भारतातील रेल्वेसेवा आतापर्यंत एकदाच पूर्णपणे बंद राहिली होती. जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली ८ मे १९७४ रोजी सुरू झालेला संप २७ मेपर्यंत म्हणजे तब्बल २० दिवस सुरू होता. त्या काळात देशभरातील रेल्वे बंद होती. त्यानंतर पहिल्यांदाच देशात रेल्वेगाड्या बंद झाल्या आहेत आणि तो निर्णय कोरोनामुळे केंद्र सरकारनेच घेतला आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वेगाड्या बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. सध्या केवळ मालगाड्याच सुरू असून, त्यातून अत्यावश्यक वस्तूंची ने-आण केली जात आहे. पण पॅसेंजर, एक्स्प्रेस यांपासून उपनगरी गाड्या तसेच मेट्रो रेल्वेही आता बंद आहे.लॉकडाउन असूनही लोक कोरोनाबाबत हवे तितके गंभीर नसल्याने रेल्वेने ट्विटर अकाउंटवरून देशातील लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करताना आतापर्यंत रेल्वे कधीच थांबली नव्हती, महायुद्धाच्या काळातही रेल्वेगाड्या धावत होत्या, याचा उल्लेख केला आहे.युद्धकाळातही रेल्वे बंद झाली नाही, परिस्थितीचे गांभीर्य ओळखा, आपापल्या घरातच राहा, असे रेल्वेने म्हटले आहे. रेल्वेचा हा संदेश समाजमाध्यमांवर खूपच व्हायरल झाला आहे. सध्या रेल्वे बंद असली तरी लोक घराबाहेर पडताना दिसत आहे. संचारबंदी असूनही त्यांना कोरोनाचे गांभीर्य लक्षात आले नाही, असाच याचा अर्थ लावला जात आहे.आपत्तीतही सुरूचमुंबईत बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, अनेकदा प्रचंड पाऊ स झाला. पण रेल्वेची उपनगरी सेवा सुरूच राहिली. ती बंद करावी लागते, याचा अर्थच परिस्थिती अतिशय कठीण आहे. त्यामुळे आपण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे आणि घरीच थांबावे, असे मेसेज रेल्वेच्या ट्विटरचा उल्लेख करून एकमेकांना पाठविले जात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे