शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : भारतातील रेल्वे १९७४ नंतर प्रथमच झाली बंद!, युद्धकाळातही सुरू होत्या गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 05:35 IST

coronavirus : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वेगाड्या बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. सध्या केवळ मालगाड्याच सुरू असून, त्यातून अत्यावश्यक वस्तूंची ने-आण केली जात आहे.

मुंबई : भारतातील रेल्वेसेवा आतापर्यंत एकदाच पूर्णपणे बंद राहिली होती. जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली ८ मे १९७४ रोजी सुरू झालेला संप २७ मेपर्यंत म्हणजे तब्बल २० दिवस सुरू होता. त्या काळात देशभरातील रेल्वे बंद होती. त्यानंतर पहिल्यांदाच देशात रेल्वेगाड्या बंद झाल्या आहेत आणि तो निर्णय कोरोनामुळे केंद्र सरकारनेच घेतला आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वेगाड्या बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. सध्या केवळ मालगाड्याच सुरू असून, त्यातून अत्यावश्यक वस्तूंची ने-आण केली जात आहे. पण पॅसेंजर, एक्स्प्रेस यांपासून उपनगरी गाड्या तसेच मेट्रो रेल्वेही आता बंद आहे.लॉकडाउन असूनही लोक कोरोनाबाबत हवे तितके गंभीर नसल्याने रेल्वेने ट्विटर अकाउंटवरून देशातील लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करताना आतापर्यंत रेल्वे कधीच थांबली नव्हती, महायुद्धाच्या काळातही रेल्वेगाड्या धावत होत्या, याचा उल्लेख केला आहे.युद्धकाळातही रेल्वे बंद झाली नाही, परिस्थितीचे गांभीर्य ओळखा, आपापल्या घरातच राहा, असे रेल्वेने म्हटले आहे. रेल्वेचा हा संदेश समाजमाध्यमांवर खूपच व्हायरल झाला आहे. सध्या रेल्वे बंद असली तरी लोक घराबाहेर पडताना दिसत आहे. संचारबंदी असूनही त्यांना कोरोनाचे गांभीर्य लक्षात आले नाही, असाच याचा अर्थ लावला जात आहे.आपत्तीतही सुरूचमुंबईत बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, अनेकदा प्रचंड पाऊ स झाला. पण रेल्वेची उपनगरी सेवा सुरूच राहिली. ती बंद करावी लागते, याचा अर्थच परिस्थिती अतिशय कठीण आहे. त्यामुळे आपण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे आणि घरीच थांबावे, असे मेसेज रेल्वेच्या ट्विटरचा उल्लेख करून एकमेकांना पाठविले जात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे