शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus : भारतीय लष्कर कोणत्याही ऑपरेशनल टास्कसाठी तयार - बिपीन रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 16:05 IST

CoronaVirus: "कोरोनाचा परिणाम तिन्ही दलात मर्यादित प्रमाणात झाला आहे."

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. या लढ्यात लष्कारानेही पुढाकार घेतला आहे. लष्कर म्हणून कोरोनाविरुद्ध लढण्याची जबाबदारी आम्ही समजतो. आम्हाला जे बजेट दिले आहे, त्याचा योग्य उपयोग केला जाईल आणि कोरोनाशी सामना करण्यासाठी लष्कर कोणत्याही ऑपरेशनल टास्कसाठी तयार आहे, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी सांगितले.

मला तुम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की, आपल्या सर्व जवानांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केले आहे. आम्ही हे सुनिश्चित करण्यास सक्षम आहोत की कोरोनाचा प्रसार होणार नाही. तसेच, आपण सुरक्षित आहोत याची खात्री करुन घ्यावी लागेल, कारण जर आपले लष्कर, नौदल आणि वायू सेनेच्या जवानांना या विषाणूचा परिणाम झाला तर आपण आपल्या लोकांचे संरक्षण कसे करणार, असा सवालही बिपीन रावत यांनी केला.

कोरोनाचा परिणाम तिन्ही दलात मर्यादित प्रमाणात झाला आहे. शिस्त व धैर्य आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत झाली आहे. ही वेळ अशी आहे की जेव्हा काही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. साथीच्या आजारावर लढायचे असल्यास आपल्याला त्याचे अनुसरण करावे लागेल. धैर्य आणि शिस्त आम्हाला कोरोनाच्या संकटावर मात करण्यास मदत करेल, बिपीन रावत म्हणाले. 

वैज्ञानिक आणि वैद्यकीय संशोधनाशी संबंधित इतर संस्थां देशातील वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन आल्या आहेत, ज्या आतापर्यंत आम्ही अन्य देशांतून आयात करत होतो. याशिवाय, या कोरोनाने आपल्याला हा धडा शिकविला आहे की आता स्वावलंबी होण्याची वेळ आली आहे, असेही बिपीन रावत यावेळी म्हणाले.

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १९९० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २६४९६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये ५८०४ जण बरे झाल आहेत. तर आतापर्यंत देशात कोरोनामुळे ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBipin Rawatबिपीन रावत