शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : भारतीय लष्कर कोणत्याही ऑपरेशनल टास्कसाठी तयार - बिपीन रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 16:05 IST

CoronaVirus: "कोरोनाचा परिणाम तिन्ही दलात मर्यादित प्रमाणात झाला आहे."

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. या लढ्यात लष्कारानेही पुढाकार घेतला आहे. लष्कर म्हणून कोरोनाविरुद्ध लढण्याची जबाबदारी आम्ही समजतो. आम्हाला जे बजेट दिले आहे, त्याचा योग्य उपयोग केला जाईल आणि कोरोनाशी सामना करण्यासाठी लष्कर कोणत्याही ऑपरेशनल टास्कसाठी तयार आहे, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी सांगितले.

मला तुम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की, आपल्या सर्व जवानांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केले आहे. आम्ही हे सुनिश्चित करण्यास सक्षम आहोत की कोरोनाचा प्रसार होणार नाही. तसेच, आपण सुरक्षित आहोत याची खात्री करुन घ्यावी लागेल, कारण जर आपले लष्कर, नौदल आणि वायू सेनेच्या जवानांना या विषाणूचा परिणाम झाला तर आपण आपल्या लोकांचे संरक्षण कसे करणार, असा सवालही बिपीन रावत यांनी केला.

कोरोनाचा परिणाम तिन्ही दलात मर्यादित प्रमाणात झाला आहे. शिस्त व धैर्य आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत झाली आहे. ही वेळ अशी आहे की जेव्हा काही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. साथीच्या आजारावर लढायचे असल्यास आपल्याला त्याचे अनुसरण करावे लागेल. धैर्य आणि शिस्त आम्हाला कोरोनाच्या संकटावर मात करण्यास मदत करेल, बिपीन रावत म्हणाले. 

वैज्ञानिक आणि वैद्यकीय संशोधनाशी संबंधित इतर संस्थां देशातील वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन आल्या आहेत, ज्या आतापर्यंत आम्ही अन्य देशांतून आयात करत होतो. याशिवाय, या कोरोनाने आपल्याला हा धडा शिकविला आहे की आता स्वावलंबी होण्याची वेळ आली आहे, असेही बिपीन रावत यावेळी म्हणाले.

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १९९० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २६४९६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये ५८०४ जण बरे झाल आहेत. तर आतापर्यंत देशात कोरोनामुळे ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBipin Rawatबिपीन रावत