शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

CoronaVirus News: देशात रुग्णांची संख्या ३ लाखांवर; मृतांचा आकडा ९ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 06:46 IST

एका दिवसात ११ हजारांहून अधिक नवे रुग्ण

नवी दिल्ली : कोरोनाचे शुक्रवारी ११ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. इतके रुग्ण एकाच दिवसात याआधी कधीही सापडले नव्हते. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३ लाखांपेक्षा जास्त झाली आहे.या आजारामुळे शुक्रवारी ३८९ जणांचा बळी गेला. त्यामुळे बळींची संख्या सुमारे ९ हजार झाली आहे. दिल्लीमध्ये या दिवशी १२९ जण मरण पावले.देशात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून त्यांची संख्या एका लाखाहून जास्त आहे. सध्या १,४५,७७९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर अन्य दीड लाख रुग्ण उपचारांनंतर पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे हे सुचिन्ह असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मतआहे.महाराष्ट्र, तामिळनाडूप्रमाणेच गुजरातमध्येही कोरोना साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे. या राज्यात शुक्रवारी कोरोनाचे ४९५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे गुजरातमधील कोरोना रुग्णांची एकुण संख्या २२ हजारपेक्षा अधिक झाली असून तिथे १४१५ जणांचा बळी गेला आहे.युरोप अजिबात सुरक्षित नाहीकोरोना विषाणूमुळे पसरलेली साथ अत्यंत भयानक असून त्यामुळे सर्व देशांनी अतिशय दक्ष राहिले पाहिजे. जिथे ही साथ ओसरली आहे असे चित्र सध्या दिसत आहे, तिथेतर आणखी सतर्क राहायला हवे असे जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधनोम घेब्रिसिस यांनी म्हटले आहे.भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्या पार्श्वभूमीवर घेब्रेसिस यांचे उद्गार महत्त्वाचे ठरतात. ते म्हणाले की, युरोपमध्ये कोरोना साथीची तीव्रता खूप कमी झाली असली तरी जगाच्या इतर भागांत ती वाढत आहे.युरोपही या साथीपासून सुरक्षित नाही कारण तिथेही पुन्हा. काही रुग्ण आढळून आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या