शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Coronavirus : मुस्लिमांसाठी भारत स्वर्ग, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित; मोदी कॅबिनेटमधील मंत्र्यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 14:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अखंड राष्ट्र, धर्म, प्रदेश आणि जातीच्या पार जाऊन कोरोनाच्या साथीशी एकजुटीनं लढा देत आहोत.

ठळक मुद्देकोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारेही कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बलिगी जमातचं प्रकरण असो किंवा पालघरच्या साधूंच्या हत्येचा प्रकार यांना काही जणांकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोदी सरकारमधले मंत्री असलेल्या मुख्तार अब्बास नक्वी यावर भाष्य केलं आहे. भारत हा मुस्लिमांसाठी स्वर्ग असून, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित असल्याचं ते म्हणाले आहेत.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारेही कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तबलिगी जमातचं प्रकरण असो किंवा पालघरच्या साधूंच्या हत्येचा प्रकार यांना काही जणांकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारमधले मंत्री असलेल्या मुख्तार अब्बास नक्वी यावर भाष्य केलं आहे. भारत हा मुस्लिमांसाठी स्वर्ग असून, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित असल्याचं ते म्हणाले आहेत. इस्लामिक देशांच्या गटाच्या टिपण्णीवर प्रतिक्रिया देताना नक्वी म्हणाले की, "धर्मनिरपेक्षता आणि सौहार्द" ही "राजकीय फॅशन" नसून भारत आणि भारतीयांसाठी "परिपूर्ण पॅशन" आहे. या सर्वसमावेशक संस्कृती आणि दृढ वचनबद्धतेमुळेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला विविधतेतील एकतेच्या धाग्यात बांधला आले आहे. अल्पसंख्याकांसह देशातील सर्व नागरिकांचे घटनात्मक, सामाजिक, धार्मिक हक्क ही भारताची घटनात्मक व नैतिक हमी आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या "विविधतेतील एकता" चे सामर्थ्य कमकुवत होऊ शकत नाही.आपण दक्षतापूर्वक एकत्रित होऊन समाजात दुही माजवणाऱ्या अशा शक्तींच्या प्रचाराला पराभूत केले पाहिजे. फेक न्यूज पसरवणारे, चिथावणी देणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे. या प्रकारची षड्यंत्र रचणे आणि कोरोनाविरुद्ध देशातील सामूहिक युद्ध दुर्बल होऊ देता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अखंड राष्ट्र, धर्म, प्रदेश आणि जातीच्या पार जाऊन कोरोनाच्या साथीशी एकजुटीनं लढा देत आहोत. केंद्रीय मंत्री नक्वी म्हणाले की, देशातील सर्व मुस्लिम धार्मिक नेते, इमाम, धार्मिक-सामाजिक संस्था आणि भारतीय मुस्लिम समाज यांनी २४ एप्रिलपासून रमजानच्या पवित्र महिन्यात घरी राहून एकत्रितपणे प्रार्थना, इफ्तार आणि इतर धार्मिक कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील ३०हून अधिक राज्य वक्फ बोर्डांच्या लोकांनी पवित्र रमजान महिन्यात धार्मिक, सार्वजनिक, वैयक्तिक ठिकाणी लॉकडाऊन, कर्फ्यू, सामाजिक अंतर प्रभावीपणे पाळण्यासाठी आणि लोकांना स्वतःहून प्रार्थना जागरूक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य वक्फ बोर्डाने मुस्लिम धार्मिक नेते, इमाम, धार्मिक-सामाजिक संस्था, मुस्लिम समाज आणि स्थानिक प्रशासनासह काम करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या विरोधात एकजुटीने लढा देत आहे. जगातील बहुतेक मुस्लिम राष्ट्रांनीही रमजानमधील मशिदी आणि इतर धार्मिक स्थळांवर असलेल्या गर्दीच्या कार्यांवर बंदी घातली आहे आणि घरी नमाज, इफ्तार आणि इतर धार्मिक कर्तव्ये पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत, याचाही उल्लेख नक्वी यांनी केला आहे.  

Coronavirus : Reliance Jioचा जबरदस्त प्लॅन; 350 जीबी डेटासह बरंच काही

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या