शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

Coronavirus : मुस्लिमांसाठी भारत स्वर्ग, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित; मोदी कॅबिनेटमधील मंत्र्यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 14:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अखंड राष्ट्र, धर्म, प्रदेश आणि जातीच्या पार जाऊन कोरोनाच्या साथीशी एकजुटीनं लढा देत आहोत.

ठळक मुद्देकोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारेही कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बलिगी जमातचं प्रकरण असो किंवा पालघरच्या साधूंच्या हत्येचा प्रकार यांना काही जणांकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोदी सरकारमधले मंत्री असलेल्या मुख्तार अब्बास नक्वी यावर भाष्य केलं आहे. भारत हा मुस्लिमांसाठी स्वर्ग असून, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित असल्याचं ते म्हणाले आहेत.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारेही कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तबलिगी जमातचं प्रकरण असो किंवा पालघरच्या साधूंच्या हत्येचा प्रकार यांना काही जणांकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारमधले मंत्री असलेल्या मुख्तार अब्बास नक्वी यावर भाष्य केलं आहे. भारत हा मुस्लिमांसाठी स्वर्ग असून, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित असल्याचं ते म्हणाले आहेत. इस्लामिक देशांच्या गटाच्या टिपण्णीवर प्रतिक्रिया देताना नक्वी म्हणाले की, "धर्मनिरपेक्षता आणि सौहार्द" ही "राजकीय फॅशन" नसून भारत आणि भारतीयांसाठी "परिपूर्ण पॅशन" आहे. या सर्वसमावेशक संस्कृती आणि दृढ वचनबद्धतेमुळेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला विविधतेतील एकतेच्या धाग्यात बांधला आले आहे. अल्पसंख्याकांसह देशातील सर्व नागरिकांचे घटनात्मक, सामाजिक, धार्मिक हक्क ही भारताची घटनात्मक व नैतिक हमी आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या "विविधतेतील एकता" चे सामर्थ्य कमकुवत होऊ शकत नाही.आपण दक्षतापूर्वक एकत्रित होऊन समाजात दुही माजवणाऱ्या अशा शक्तींच्या प्रचाराला पराभूत केले पाहिजे. फेक न्यूज पसरवणारे, चिथावणी देणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे. या प्रकारची षड्यंत्र रचणे आणि कोरोनाविरुद्ध देशातील सामूहिक युद्ध दुर्बल होऊ देता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अखंड राष्ट्र, धर्म, प्रदेश आणि जातीच्या पार जाऊन कोरोनाच्या साथीशी एकजुटीनं लढा देत आहोत. केंद्रीय मंत्री नक्वी म्हणाले की, देशातील सर्व मुस्लिम धार्मिक नेते, इमाम, धार्मिक-सामाजिक संस्था आणि भारतीय मुस्लिम समाज यांनी २४ एप्रिलपासून रमजानच्या पवित्र महिन्यात घरी राहून एकत्रितपणे प्रार्थना, इफ्तार आणि इतर धार्मिक कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील ३०हून अधिक राज्य वक्फ बोर्डांच्या लोकांनी पवित्र रमजान महिन्यात धार्मिक, सार्वजनिक, वैयक्तिक ठिकाणी लॉकडाऊन, कर्फ्यू, सामाजिक अंतर प्रभावीपणे पाळण्यासाठी आणि लोकांना स्वतःहून प्रार्थना जागरूक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य वक्फ बोर्डाने मुस्लिम धार्मिक नेते, इमाम, धार्मिक-सामाजिक संस्था, मुस्लिम समाज आणि स्थानिक प्रशासनासह काम करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या विरोधात एकजुटीने लढा देत आहे. जगातील बहुतेक मुस्लिम राष्ट्रांनीही रमजानमधील मशिदी आणि इतर धार्मिक स्थळांवर असलेल्या गर्दीच्या कार्यांवर बंदी घातली आहे आणि घरी नमाज, इफ्तार आणि इतर धार्मिक कर्तव्ये पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत, याचाही उल्लेख नक्वी यांनी केला आहे.  

Coronavirus : Reliance Jioचा जबरदस्त प्लॅन; 350 जीबी डेटासह बरंच काही

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या