शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

Coronavirus: जगातील दर दहा लाख लोकांमागे भारतात सर्वात कमी कोरोना बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 06:48 IST

एकूण रुग्णसंख्या ७२ लाखांवर; कोरोना चाचण्यांचा पल्ला ९ कोटींवर

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर असला तरी, दर दहा लाख लोकांमागे देशात फक्त ७९ जण कोरोनामुळे मरण पावतात. हे जगातील सर्वात कमी प्रमाण आहे. भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या बुधवारी ७२ लाख ३९ हजारांवर पोहोचली असून, आजवर झालेल्या कोरोना चाचण्यांनी ९ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

देशात बुधवारी कोरोनाचे ६३,५०९ नवे रुग्ण आढळून आले असून, या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या ७२,३९,३८९ झाली आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ६३ लाखांवर पोहोचली आहे. बरे होणाºयांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ८७.०५ टक्के आहे. कोरोनामुळे बुधवारी आणखी ७३० जण मरण पावल्याने बळींची एकूण संख्या १,१०,५८६ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सलग सहाव्या दिवशी ९ लाखांपेक्षा कमी आहे. सध्या देशात ८,२६,८७८ कोरोना रुग्ण उपचार घेत असून, बरे झालेल्यांची संख्या ६३,०१,९२७ आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५३ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १३ आॅक्टोबर रोजी ११,४५,०१५ कोरोना चाचण्या पार पडल्या. या चाचण्यांची एकूण संख्या ९,००,९०,१२२ झाली आहे.२० राज्यांत संसर्ग होण्याचे प्रमाण राष्ट्रीय स्तराहून कमी८.१९ टक्के कोरोनाचा संसर्ग होण्याचे राष्ट्रीय स्तरावरील सरासरी प्रमाण आहे. त्यापेक्षा २० हून अधिक राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामध्ये बिहार, गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, हरयाणा, ओदिशा, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, पश्चिम बंगाल आदींचा समावेश आहे.मुंबईतील दोघांसह तीन जणांना झाला पुन्हा संसर्गकोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा त्या विषाणूचा संसर्ग झालेले तीन रुग्ण इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेने आढळून आले आहेत. त्यातील दोन मुंबईतील व एक अहमदाबादमधील आहे. कोरोना विषाणूचा बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो, असे एका पाहणीत नुकतेच आढळून आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत