शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: जगातील दर दहा लाख लोकांमागे भारतात सर्वात कमी कोरोना बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 06:48 IST

एकूण रुग्णसंख्या ७२ लाखांवर; कोरोना चाचण्यांचा पल्ला ९ कोटींवर

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर असला तरी, दर दहा लाख लोकांमागे देशात फक्त ७९ जण कोरोनामुळे मरण पावतात. हे जगातील सर्वात कमी प्रमाण आहे. भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या बुधवारी ७२ लाख ३९ हजारांवर पोहोचली असून, आजवर झालेल्या कोरोना चाचण्यांनी ९ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

देशात बुधवारी कोरोनाचे ६३,५०९ नवे रुग्ण आढळून आले असून, या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या ७२,३९,३८९ झाली आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ६३ लाखांवर पोहोचली आहे. बरे होणाºयांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ८७.०५ टक्के आहे. कोरोनामुळे बुधवारी आणखी ७३० जण मरण पावल्याने बळींची एकूण संख्या १,१०,५८६ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सलग सहाव्या दिवशी ९ लाखांपेक्षा कमी आहे. सध्या देशात ८,२६,८७८ कोरोना रुग्ण उपचार घेत असून, बरे झालेल्यांची संख्या ६३,०१,९२७ आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५३ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १३ आॅक्टोबर रोजी ११,४५,०१५ कोरोना चाचण्या पार पडल्या. या चाचण्यांची एकूण संख्या ९,००,९०,१२२ झाली आहे.२० राज्यांत संसर्ग होण्याचे प्रमाण राष्ट्रीय स्तराहून कमी८.१९ टक्के कोरोनाचा संसर्ग होण्याचे राष्ट्रीय स्तरावरील सरासरी प्रमाण आहे. त्यापेक्षा २० हून अधिक राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामध्ये बिहार, गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, हरयाणा, ओदिशा, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, पश्चिम बंगाल आदींचा समावेश आहे.मुंबईतील दोघांसह तीन जणांना झाला पुन्हा संसर्गकोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा त्या विषाणूचा संसर्ग झालेले तीन रुग्ण इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेने आढळून आले आहेत. त्यातील दोन मुंबईतील व एक अहमदाबादमधील आहे. कोरोना विषाणूचा बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो, असे एका पाहणीत नुकतेच आढळून आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत