शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

CoronaVirus News: लवकरच देशात कोरोनाचं दहन?; गेल्या ९८ दिवसांत जे घडलं नाही, ते काल घडलं

By कुणाल गवाणकर | Updated: October 25, 2020 09:04 IST

CoronaVirus News: देशातील कोरोना वाढीचा वेग मंदावला; सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७ लाखांच्या खाली

नवी दिल्ली: देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. मात्र अजूनही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. काल दिवसभरात ५८० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या ९८ दिवसांत पहिल्यांदाच इतक्या कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना संकटाची तीव्रता काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. देशातील विविध भागांमध्ये कोरोनाचा वेग आटोक्यात येत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. सप्टेंबरच्या मध्यावर कोरोनानं देशात अक्षरश: थैमान घातलं होतं. १५ सप्टेंबरला देशात कोरोनामुळे १ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात येत आहे. काल देशात ५८० जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. गेल्या ९८ दिवसांत प्रथमच इतक्या कमी प्रमाणात कोरोना रुग्ण दगावले.मुंबईच्या नावे कोरोना बळींची नकोशी नोंद; बनले देशातील पहिले शहरगेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. काल दिवसभरात देशात ५१ हजार २३ कोरोना रुग्ण आढळून आले. देशात आतापर्यंत ७८ लाख ६३ हजार ९१३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या घडीला ६.७५ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ७० लाख ६९ हजार ९९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९.९ टक्क्यांवर जाऊन पोहोचलं आहे.आनंदाची बातमी! कोरोनाच्या पहिल्या औषधाला FDA कडून मंजुरी, कमी वेळात रुग्ण बरे होणार, तज्ज्ञांचा दावाकेरळमधील कोरोना रग्णांच्या संख्येत वाढदेशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला. त्यानंतर केरळ सरकारनं तातडीनं हालचाली सुरू केल्या. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला. मात्र आता केरळमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. काल दिवसभरात केरळमध्ये कोरोनाच्या ८ हजार २५३ रुग्णांची नोंद झाली. ....म्हणून कोरोना संक्रमण झाल्यानंतर केस गळण्याची समस्या उद्भवते, तज्ज्ञांचा खुलासामहाराष्ट्रातून गुड न्यूज; दिल्लीनं चिंता वाढवली दिल्लीत काल ४ हजार ११६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. १८ सप्टेंबरनंतर प्रथमच दिल्लीत इतक्या मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळले. पश्चिम बंगालमध्येही कोरोना संकटाची तीव्रता वाढली आहे. काल पश्चिम बंगालमध्ये ४ हजार १४८ नवे कोरोना रुग्ण सापडले. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग सहाव्या दिवशी घट पाहायला मिळाली. काल दिवसभरात राज्यात ६ हजार ४१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १३७ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस