शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

CoronaVirus News: लवकरच देशात कोरोनाचं दहन?; गेल्या ९८ दिवसांत जे घडलं नाही, ते काल घडलं

By कुणाल गवाणकर | Updated: October 25, 2020 09:04 IST

CoronaVirus News: देशातील कोरोना वाढीचा वेग मंदावला; सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७ लाखांच्या खाली

नवी दिल्ली: देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. मात्र अजूनही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. काल दिवसभरात ५८० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या ९८ दिवसांत पहिल्यांदाच इतक्या कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना संकटाची तीव्रता काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. देशातील विविध भागांमध्ये कोरोनाचा वेग आटोक्यात येत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. सप्टेंबरच्या मध्यावर कोरोनानं देशात अक्षरश: थैमान घातलं होतं. १५ सप्टेंबरला देशात कोरोनामुळे १ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात येत आहे. काल देशात ५८० जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. गेल्या ९८ दिवसांत प्रथमच इतक्या कमी प्रमाणात कोरोना रुग्ण दगावले.मुंबईच्या नावे कोरोना बळींची नकोशी नोंद; बनले देशातील पहिले शहरगेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. काल दिवसभरात देशात ५१ हजार २३ कोरोना रुग्ण आढळून आले. देशात आतापर्यंत ७८ लाख ६३ हजार ९१३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या घडीला ६.७५ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ७० लाख ६९ हजार ९९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९.९ टक्क्यांवर जाऊन पोहोचलं आहे.आनंदाची बातमी! कोरोनाच्या पहिल्या औषधाला FDA कडून मंजुरी, कमी वेळात रुग्ण बरे होणार, तज्ज्ञांचा दावाकेरळमधील कोरोना रग्णांच्या संख्येत वाढदेशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला. त्यानंतर केरळ सरकारनं तातडीनं हालचाली सुरू केल्या. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला. मात्र आता केरळमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. काल दिवसभरात केरळमध्ये कोरोनाच्या ८ हजार २५३ रुग्णांची नोंद झाली. ....म्हणून कोरोना संक्रमण झाल्यानंतर केस गळण्याची समस्या उद्भवते, तज्ज्ञांचा खुलासामहाराष्ट्रातून गुड न्यूज; दिल्लीनं चिंता वाढवली दिल्लीत काल ४ हजार ११६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. १८ सप्टेंबरनंतर प्रथमच दिल्लीत इतक्या मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळले. पश्चिम बंगालमध्येही कोरोना संकटाची तीव्रता वाढली आहे. काल पश्चिम बंगालमध्ये ४ हजार १४८ नवे कोरोना रुग्ण सापडले. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग सहाव्या दिवशी घट पाहायला मिळाली. काल दिवसभरात राज्यात ६ हजार ४१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १३७ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस