शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

Coronavirus: चिंताजनक! भारतात एका दिवसात कोरोनाचे १९४ रुग्ण आढळले; कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 08:27 IST

देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शनिवारी एका दिवसात सर्वात जास्त १९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत.

ठळक मुद्देसंपूर्ण जगभरात ६ लाख ६३ हजार ७४० लोकांना कोरोनाची लागण तर ३० हजार ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहेचीनला मागे टाकत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अमेरिका पहिल्या क्रमांकावर

नवी दिल्ली – संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस हळूहळू भारतात झपाट्याने वाढत चालला आहे. १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. देशासाठी २१ दिवस महत्त्वाचे आहेत. जर आपण हलगर्जीपणाने वागलो तर मोठा अनर्थ घडेल असा गर्भीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला होता.

देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शनिवारी एका दिवसात सर्वात जास्त १९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९८७ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा २४ झाला आहे. आतापर्यंत जगातील देशाचं पाहिलं तर जोपर्यंत यावर नियंत्रण आणत नाहीत तोपर्यंत कोरोना वाऱ्याच्या वेगाने लोकांना शिकार बनवतो. दिवसाला कोरोनाचे रुग्ण वाढत जातात. भारताची आकडेवारी पाहिली तर संशयितांची तपासणी योग्यरित्या होत नसल्याचं दिसून येत आहे. जितक्या प्रमाणात चाचणी केली जाईल हे आकडे आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

असाच आरोप अमेरिकेवरही केला जात आहे. संशयितांची तपासणी कमी प्रमाणात होत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी दिसते. जेव्हा तपासणी योग्यरितीने होईल हा आकडा वाढेल. ९ दिवसांपूर्वी अमेरिकेत १८,२०० कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आता अमेरिकेत १ लाख २३ हजारांहून अधिक रुग्ण आहेत, २ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत ९२ हजार ४७२ रुग्ण आहेत. यातील १० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये ७३ हजार २३५ रुग्ण आहेत. तर ५ हजार ९८२ मृत्यू झालेत. स्पेनपाठोपाठ जर्मनी ५७ हजार ६९५ कोरोनाबाधित आढळलेत. तर ४३३ जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जगभरात ६ लाख ६३ हजार ७४० लोक कोरोनाच्या विळख्यात अडकलेत तर ३० हजार ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतात कोरोनाच्या संशयित रुग्णांची तपासणी २१ मार्चनंतर जलदगतीने सुरु झाली. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. अनेक राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी एकमेकांपासून दूर राहणे हाच एक उपाय आहे. कोरोनाला पसरण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या संक्रमणाची साखळी तोडायलाच हवी. सोशल डिस्टंस केवळ रुग्णासाठी नाही तर प्रत्येकासाठी गरजेचा आहे. पंतप्रधानालाही हे गरजेचे आहे. यामुळे चुकीचा विचार करू नका. आप्तेष्ठांना आणि पुढे जाऊन देशाला मोठ्या संकटात टाकाल. बेजबाबदारपणा असाच राहिल्यास भारताला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला होता.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीन