शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

Coronavirus: स्थलांतरित मजूर, विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी वाढता दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 06:52 IST

अनेक राज्यांची खास व्यवस्था करण्याची तयारी

नवी दिल्ली : राजस्थानात कोटा येथील स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या व ‘लॉकडाऊन’मुळे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना खास बसेसची व्यवस्था करून उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्य सरकारांनी आपापल्या राज्यांत परत नेल्यानंतर इतरही राज्यांवर परराज्यांमध्ये अडकलेले विद्यार्थी व स्थलांतरित मजुरांना परत आणण्यासाठी वाढता दबाव येत आहे. अनेक राज्यांनी त्यासाठी खास व्यवस्था करण्याची तयारी दाखविली असून, केंद्राने त्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.उत्तर प्रदेश व उत्तराखंडनंतर आता मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, प. बंगाल, आसाम व झारखंड ही राज्येही राजस्थानमध्ये अडकलेल्या आपापल्या विद्यार्थ्यांना घरी परत नेण्याची व्यवस्था करण्याच्या तयारीला लागली आहेत.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून अन्य राज्यांमध्ये अडकून पडलेल्या त्यांच्या राज्यातील लोकांची अडचण सोडविण्याची त्यांना गळ घातली. अनेक राज्यांनी हा विषय मांडला असून, लवकरच यावर निर्णय घेऊ, असे शहा यांनी सांगितल्याचे गेहलोत म्हणाले.गेहलोत असेही म्हणाले की, ऐनवेळी ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्याआधी केंद्र सरकारने उद्योगधंद्यानिमित्त असे घराबाबेर फिरणाºया लोकांना घरी परत जाण्यासाठी चार-पाच दिवसांचा वेळ द्यायला हवा होता. भारत सरकार अन्य देशांमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना विशेष विमाने पाठवून परत आणते व अन्य देशांनाही भारतात अडकलेल्या त्यांच्या नागरिकांना विशेष विमाने करून मायदेशी परत नेऊ देते, तर सरकारने राज्यांनाही तशी परवानगी द्यायला हवी.झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही अशीच भावना बोलून दाखविली. ते म्हणाले की, परराज्यांमध्ये अडकलेल्या माझ्या राज्यातील लोकांना परत आणण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा आग्रह मी केंद्राकडे धरणार आहे. हिमाचल प्रदेश व मध्यप्रदेश सरकारांकडेही नागरिकांकडून अशीच मागणी सातत्याने केली जात आहे, असे त्या राज्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.राजस्थानातील ५ लाख स्थलांतरित लोक अडकलेराजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, कामधंद्यानिमित्त गेलेले राजस्थानमधील सुमारे पाच लाख स्थलांतरित कामगार, छोटे दुकानदार व व्यापारी व खासगी नोकरदार आसाम, प. बंगाल, ईशान्येकडील अन्य राज्ये, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा, केरळ व महाराष्ट्रासह अन्य राज्यांत अडकून पडले आहेत.महिनाभर घराबाहेर राहिल्याने ते हताश झाले असून, घरी परतण्यास आतुर झाले आहेत. ‘लॉकडाऊन’ उठल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने कामधंद्याला लागण्यापूर्वी आधी त्यांना आपापल्या घरी जाऊन मानसिक शांतता मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या