शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Coronavirus: स्थलांतरित मजूर, विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी वाढता दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 06:52 IST

अनेक राज्यांची खास व्यवस्था करण्याची तयारी

नवी दिल्ली : राजस्थानात कोटा येथील स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या व ‘लॉकडाऊन’मुळे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना खास बसेसची व्यवस्था करून उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्य सरकारांनी आपापल्या राज्यांत परत नेल्यानंतर इतरही राज्यांवर परराज्यांमध्ये अडकलेले विद्यार्थी व स्थलांतरित मजुरांना परत आणण्यासाठी वाढता दबाव येत आहे. अनेक राज्यांनी त्यासाठी खास व्यवस्था करण्याची तयारी दाखविली असून, केंद्राने त्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.उत्तर प्रदेश व उत्तराखंडनंतर आता मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, प. बंगाल, आसाम व झारखंड ही राज्येही राजस्थानमध्ये अडकलेल्या आपापल्या विद्यार्थ्यांना घरी परत नेण्याची व्यवस्था करण्याच्या तयारीला लागली आहेत.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून अन्य राज्यांमध्ये अडकून पडलेल्या त्यांच्या राज्यातील लोकांची अडचण सोडविण्याची त्यांना गळ घातली. अनेक राज्यांनी हा विषय मांडला असून, लवकरच यावर निर्णय घेऊ, असे शहा यांनी सांगितल्याचे गेहलोत म्हणाले.गेहलोत असेही म्हणाले की, ऐनवेळी ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्याआधी केंद्र सरकारने उद्योगधंद्यानिमित्त असे घराबाबेर फिरणाºया लोकांना घरी परत जाण्यासाठी चार-पाच दिवसांचा वेळ द्यायला हवा होता. भारत सरकार अन्य देशांमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना विशेष विमाने पाठवून परत आणते व अन्य देशांनाही भारतात अडकलेल्या त्यांच्या नागरिकांना विशेष विमाने करून मायदेशी परत नेऊ देते, तर सरकारने राज्यांनाही तशी परवानगी द्यायला हवी.झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही अशीच भावना बोलून दाखविली. ते म्हणाले की, परराज्यांमध्ये अडकलेल्या माझ्या राज्यातील लोकांना परत आणण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा आग्रह मी केंद्राकडे धरणार आहे. हिमाचल प्रदेश व मध्यप्रदेश सरकारांकडेही नागरिकांकडून अशीच मागणी सातत्याने केली जात आहे, असे त्या राज्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.राजस्थानातील ५ लाख स्थलांतरित लोक अडकलेराजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, कामधंद्यानिमित्त गेलेले राजस्थानमधील सुमारे पाच लाख स्थलांतरित कामगार, छोटे दुकानदार व व्यापारी व खासगी नोकरदार आसाम, प. बंगाल, ईशान्येकडील अन्य राज्ये, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा, केरळ व महाराष्ट्रासह अन्य राज्यांत अडकून पडले आहेत.महिनाभर घराबाहेर राहिल्याने ते हताश झाले असून, घरी परतण्यास आतुर झाले आहेत. ‘लॉकडाऊन’ उठल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने कामधंद्याला लागण्यापूर्वी आधी त्यांना आपापल्या घरी जाऊन मानसिक शांतता मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या