शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

coronavirus: देशात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत जुलैैपासून वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 07:36 IST

भारतात जूनअखेरपर्यंत झालेल्या कोरोना मृत्यूंपैकी सुमारे ७५ टक्के मृत्यू पूर्ण ‘लॉकडाऊन’चे कडक निर्बंध शिथिल करून १ जूनपासून ‘अनलॉक-१’चा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर जून महिन्यातच झाले, असे आकडेवारीच्या विश्लेषणावरून दिसते.

नवी दिल्ली : भारतात जूनच्या सुरुवातीस ‘अ‍ॅक्टिव’ रुग्ण (९७,००८) बरे झालेल्या रुग्णांहून (९५,७४४) जास्त होते. मात्र जूनच्या अखेरपर्यंत ‘अ‍ॅक्टिव’ रुग्णांहून बरे होणारे रुग्ण वाढू लागले व महिनाअखेरीस बरे झालेले रुग्ण ‘अ‍ॅक्टिव’ रुग्णांहून १.२ लाखांनी जास्त झाले. हे एक आशादायक चित्र म्हणावे लागेल.भारतात जूनअखेरपर्यंत झालेल्या कोरोना मृत्यूंपैकी सुमारे ७५ टक्के मृत्यू पूर्ण ‘लॉकडाऊन’चे कडक निर्बंध शिथिल करून १ जूनपासून ‘अनलॉक-१’चा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर जून महिन्यातच झाले, असे आकडेवारीच्या विश्लेषणावरून दिसते. मात्र जूननंतर हे निराशाजनक चित्र आशादायी होत गेले.वाढत्या चाचण्या, घरोघरी केलेले व्यापक सर्वेक्षण व कोरोना रुग्णसंख्या अधिक असलेले भाग पूर्णपणे बंद करणे यामुळे हे शक्य झाले. १३ मार्च रोजी देशात कोरोनाने पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. तेव्हापासून मेअखेर ‘लॉकडाऊन’  लागू असताना मृत्यूंची संख्या ५,५०० वर पोहोचली. मात्र १ जूनपासून ‘अनलॉक’चा पहिला टप्पा सुरु झाला आणि मृत्यूंची संख्या वाढू लागली. १ जून रोजी ५,६०६ असलेली मृत्यूंची संख्या जूनअखेर दुपटीने म्हणजे ११,८०३ ने वाढून १७,४०९वर पोहोचली.जूनमध्ये फक्त कोरोनाचे मृत्यूच फक्त वाढले असे नाही. नव्याने झालेले संसर्ग व बरे न झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत गेली. जूनच्या सुरुवातीस ९७,००८ एवढे असलेले ‘अ‍ॅक्टिव’ रुग्ण जूनअखेर वाढून २ लाख २० हजार ४७८वर पोहोचले. मार्चपासूनच्या आकडेवारीचा विचार केला तर देशातील आत्तापर्यंतच्या एकूण रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्ण एकट्या जूनमध्ये वाढल्याचे दिसते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या