शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनाग्रस्ताच्या उपचारात ऑक्सिजनचा तुटवडा भासू देऊ नका; केंद्राचे राज्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 22:43 IST

कोरोनाग्रस्ताच्या उपचारात त्याची कमतरता भासू देऊ नका, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा खंडित करू नका, असं निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्वच राज्यांना दिले आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भाल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात ऑक्सिजनच्या पुरवठ्याकडे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. कोरोना व्हायरसच्या दृष्टीने ऑक्सिजनचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आवश्यक वस्तूंच्या यादीमध्ये करण्यात आला आहे, त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या उपचारात त्याची कमतरता भासू देऊ नका, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. कर्मचार्‍यांना घरोघरी ऑक्सिजन युनिट्स नेण्याची सुविधाभल्ला यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, लॉकडाऊनसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांद्वारे सर्व प्रकारच्या वैद्यकीय पुरवठा साहित्य व उपकरणे तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गॅस आणि लिक्विड ऑक्सिजन निर्माण करणारी सर्व उत्पादक युनिट, ऑक्सिजन सिलिंडर्सचे उत्पादन करणारे युनिट आणि त्यांची वाहतूक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी करणाऱ्यांना कोणतीही बाधा येता कामा नये. तसेच ऑक्सिजन युनिट्सचा पुरवठा सुनिश्चित केला जावा. या पत्राद्वारे त्यांनी कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन युनिट त्यांच्या घरातून कारखान्यात नेण्याची परवानगी दिली आहे. परंतु संबंधित कामात सामाजिक अंतर राखणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.  सर्व रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याबाबत वेळेत माहिती देण्याच्या सूचनायापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या पद्धतींविषयी राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्व रुग्णालये आणि संबंधित कर्मचार्‍यांना ऑक्सिजन पुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून राज्यांनी गरजेनुसार पुरवठा करावा, असंही त्यांनी सुचवलं आहे. आज एकाच दिवसात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 708 नव्या रुग्णांची भर पडली असून, गेल्या 24 तासांत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या 4281 वर पोहोचली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 3 हजार 851 रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 318 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर तामिळनाडू आणि दिल्लीमध्येही रुग्णांचा आकडा 500च्या वर पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmit Shahअमित शहाCentral Governmentकेंद्र सरकार