शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

coronavirus : कोरोनाग्रस्ताच्या उपचारात ऑक्सिजनचा तुटवडा भासू देऊ नका; केंद्राचे राज्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 22:43 IST

कोरोनाग्रस्ताच्या उपचारात त्याची कमतरता भासू देऊ नका, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा खंडित करू नका, असं निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्वच राज्यांना दिले आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भाल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात ऑक्सिजनच्या पुरवठ्याकडे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. कोरोना व्हायरसच्या दृष्टीने ऑक्सिजनचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आवश्यक वस्तूंच्या यादीमध्ये करण्यात आला आहे, त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या उपचारात त्याची कमतरता भासू देऊ नका, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. कर्मचार्‍यांना घरोघरी ऑक्सिजन युनिट्स नेण्याची सुविधाभल्ला यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, लॉकडाऊनसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांद्वारे सर्व प्रकारच्या वैद्यकीय पुरवठा साहित्य व उपकरणे तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गॅस आणि लिक्विड ऑक्सिजन निर्माण करणारी सर्व उत्पादक युनिट, ऑक्सिजन सिलिंडर्सचे उत्पादन करणारे युनिट आणि त्यांची वाहतूक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी करणाऱ्यांना कोणतीही बाधा येता कामा नये. तसेच ऑक्सिजन युनिट्सचा पुरवठा सुनिश्चित केला जावा. या पत्राद्वारे त्यांनी कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन युनिट त्यांच्या घरातून कारखान्यात नेण्याची परवानगी दिली आहे. परंतु संबंधित कामात सामाजिक अंतर राखणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.  सर्व रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याबाबत वेळेत माहिती देण्याच्या सूचनायापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या पद्धतींविषयी राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्व रुग्णालये आणि संबंधित कर्मचार्‍यांना ऑक्सिजन पुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून राज्यांनी गरजेनुसार पुरवठा करावा, असंही त्यांनी सुचवलं आहे. आज एकाच दिवसात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 708 नव्या रुग्णांची भर पडली असून, गेल्या 24 तासांत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या 4281 वर पोहोचली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 3 हजार 851 रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 318 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर तामिळनाडू आणि दिल्लीमध्येही रुग्णांचा आकडा 500च्या वर पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmit Shahअमित शहाCentral Governmentकेंद्र सरकार