शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

coronavirus : डॉक्टरांच्या गटाने ममता बॅनर्जींना लिहिले खुले पत्र, केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 20:01 IST

पश्चिम बंगाल सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कोलकाता - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील  पश्चिम बंगाल सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनिवासी डॉक्टरांच्या एका पथकाने ममता बॅनर्जी यांना खुले पत्र लिहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची होत असलेली चुकीची नोंद आणि राज्यात होत असलेल्या कमी चाचण्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

बंगाली डॉक्टर, आरोग्य विषयक तज्ज्ञ आणि आरोग्य सेवक अशी स्वतःची ओळख करून देणाऱ्या या गटाने संपूर्ण देशात कोरोना चाचण्या पुरेशा संख्येत होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गेल्या एक दीड आठवड्यापासून पश्चिम बंगालमध्ये कोरोनाबाबत वाढत असलेल्या चिंतेबाबत आम्ही निरीक्षण करत आहोत. बंगालमध्ये दररोज सरासरी केवळ 33.7 कोरोना चाचण्या होत आहेत. तर राष्ट्रीय सरासरी 156.9 आहे. मात्र  दरदिवशी सुमारे 1 हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे, असे या डॉक्टरांनी रॉयटर्समधील वृत्ताच्य हवाल्याने   आपल्या पत्रात म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारपर्यंत पश्चिम बंगालमध्ये केवळ 7 हजार 034 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. याच्या तुलनेत आंध्र प्रदेशमध्ये 41 हजार 512, राजस्थानमध्ये 55 हजार 759 आणि तामिळनाडूमध्ये 53 हजार 045 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये बंगालपेक्षा कमी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.  

दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात कमी प्रमाणात कोरोना चाचण्या होण्यासाठी आयसीएमआरला दोषी ठरवले आहे. सुरुवातीला आयसीएमआरकडून टेस्टिंग किट्स पुरवण्यात आल्या नाहीत. तर नंतर दिलेल्या किट्स सदोष होत्या असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीdoctorडॉक्टर