शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

coronavirus : डॉक्टरांच्या गटाने ममता बॅनर्जींना लिहिले खुले पत्र, केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 20:01 IST

पश्चिम बंगाल सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कोलकाता - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील  पश्चिम बंगाल सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनिवासी डॉक्टरांच्या एका पथकाने ममता बॅनर्जी यांना खुले पत्र लिहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची होत असलेली चुकीची नोंद आणि राज्यात होत असलेल्या कमी चाचण्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

बंगाली डॉक्टर, आरोग्य विषयक तज्ज्ञ आणि आरोग्य सेवक अशी स्वतःची ओळख करून देणाऱ्या या गटाने संपूर्ण देशात कोरोना चाचण्या पुरेशा संख्येत होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गेल्या एक दीड आठवड्यापासून पश्चिम बंगालमध्ये कोरोनाबाबत वाढत असलेल्या चिंतेबाबत आम्ही निरीक्षण करत आहोत. बंगालमध्ये दररोज सरासरी केवळ 33.7 कोरोना चाचण्या होत आहेत. तर राष्ट्रीय सरासरी 156.9 आहे. मात्र  दरदिवशी सुमारे 1 हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे, असे या डॉक्टरांनी रॉयटर्समधील वृत्ताच्य हवाल्याने   आपल्या पत्रात म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारपर्यंत पश्चिम बंगालमध्ये केवळ 7 हजार 034 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. याच्या तुलनेत आंध्र प्रदेशमध्ये 41 हजार 512, राजस्थानमध्ये 55 हजार 759 आणि तामिळनाडूमध्ये 53 हजार 045 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये बंगालपेक्षा कमी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.  

दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात कमी प्रमाणात कोरोना चाचण्या होण्यासाठी आयसीएमआरला दोषी ठरवले आहे. सुरुवातीला आयसीएमआरकडून टेस्टिंग किट्स पुरवण्यात आल्या नाहीत. तर नंतर दिलेल्या किट्स सदोष होत्या असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीdoctorडॉक्टर