शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

CoronaVirus News: तिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 16:36 IST

CoronaVirus News: २५ मेपासून देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू होणार; नियमावली जाहीर

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे ठप्प असलेली हवाई सेवा आता हळूहळू पूर्ववत होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं सरकारनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. २५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार आहे. मात्र विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक नियम पाळावे लागतील. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी याबद्दलची माहिती आज पत्रकार परिषद घेऊन दिली. सरकारनं विमानाचे तिकीट दर निश्चित केले आहेत. या नियमाचं पालन सर्व विमान कंपन्यांना करावं लागेल. यासोबतच सरकारनं विमान कंपन्या आणि प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली आहे. मेट्रो टू मेट्रो शहरांसाठी काही नियम असतील. मेट्रो टू नॉन मेट्रो शहरांसाठी वेगळे नियम असतील. सुरुवातीला विमानतळांचा एक तृतीयांश भाग सुरू करण्यात येईल. कोणत्याही विमानात जेवण दिलं जाणार नाही. केवळ ३३ टक्के विमानांना उड्डाणाची परवानगी असेल, अशी माहिती पुरी यांनी दिली. विमानात प्रवास करताना दोन प्रवाशांमध्ये एक आसन सोडलं जाणार का, या प्रश्नाला अद्याप असा कोणताही नियम नसल्याचं पुरी म्हणाले. मात्र इतर नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल, असं पुरींनी सांगितलं. सरकार ऑगस्टपर्यंत तिकिटांचे दर निश्चित करणार येतील. उदाहरणार्थ, दिल्ली ते मुंबई विमानाचं तिकीट किमान साडे तीन हजार ते कमाल १० हजारांपर्यंत असेल. सरकारनं घालून दिलेल्या नियमानुसारच कंपन्यांना तिकीटांचे दर निश्चित करावे लागतील. ऑगस्टपर्यंत कंपन्यांना याचं पालन करावं लागेल, असं पुरी म्हणाले.वंदे भारत अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत २० हजार भारतीयांना परदेशातून मायदेशी आणण्यात आल्याची माहिती पुरी यांनी दिली. काही देशांमध्ये भारतीय अडकले आहेत. मात्र तिथली सरकारं अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी परवानगी देत नसल्यानं अडचणी येत आहेत, असं नागरी उड्डाण मंत्र्यांनी सांगितलं.नियम बदलले! जाणून घ्या, विमानतळ प्रशासनाच्या प्रवाशांसाठी नव्या सूचनापीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखलराष्ट्रवादीच्या भित्रेपणावर 'प्रहार' करताना निलेश राणेंची चक्क शिवसेनेच्या हिमतीला दाद

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या