शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

CoronaVirus News: तिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 16:36 IST

CoronaVirus News: २५ मेपासून देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू होणार; नियमावली जाहीर

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे ठप्प असलेली हवाई सेवा आता हळूहळू पूर्ववत होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं सरकारनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. २५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार आहे. मात्र विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक नियम पाळावे लागतील. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी याबद्दलची माहिती आज पत्रकार परिषद घेऊन दिली. सरकारनं विमानाचे तिकीट दर निश्चित केले आहेत. या नियमाचं पालन सर्व विमान कंपन्यांना करावं लागेल. यासोबतच सरकारनं विमान कंपन्या आणि प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली आहे. मेट्रो टू मेट्रो शहरांसाठी काही नियम असतील. मेट्रो टू नॉन मेट्रो शहरांसाठी वेगळे नियम असतील. सुरुवातीला विमानतळांचा एक तृतीयांश भाग सुरू करण्यात येईल. कोणत्याही विमानात जेवण दिलं जाणार नाही. केवळ ३३ टक्के विमानांना उड्डाणाची परवानगी असेल, अशी माहिती पुरी यांनी दिली. विमानात प्रवास करताना दोन प्रवाशांमध्ये एक आसन सोडलं जाणार का, या प्रश्नाला अद्याप असा कोणताही नियम नसल्याचं पुरी म्हणाले. मात्र इतर नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल, असं पुरींनी सांगितलं. सरकार ऑगस्टपर्यंत तिकिटांचे दर निश्चित करणार येतील. उदाहरणार्थ, दिल्ली ते मुंबई विमानाचं तिकीट किमान साडे तीन हजार ते कमाल १० हजारांपर्यंत असेल. सरकारनं घालून दिलेल्या नियमानुसारच कंपन्यांना तिकीटांचे दर निश्चित करावे लागतील. ऑगस्टपर्यंत कंपन्यांना याचं पालन करावं लागेल, असं पुरी म्हणाले.वंदे भारत अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत २० हजार भारतीयांना परदेशातून मायदेशी आणण्यात आल्याची माहिती पुरी यांनी दिली. काही देशांमध्ये भारतीय अडकले आहेत. मात्र तिथली सरकारं अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी परवानगी देत नसल्यानं अडचणी येत आहेत, असं नागरी उड्डाण मंत्र्यांनी सांगितलं.नियम बदलले! जाणून घ्या, विमानतळ प्रशासनाच्या प्रवाशांसाठी नव्या सूचनापीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखलराष्ट्रवादीच्या भित्रेपणावर 'प्रहार' करताना निलेश राणेंची चक्क शिवसेनेच्या हिमतीला दाद

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या