शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

Coronavirus: गुजरातमध्ये दररोज व्यक्त होतेय कृतज्ञता, महिनाभरापासून सुरुयं थाळी अन् टाळीचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 15:45 IST

मोदींच्या आवाहनुनसार देशभरात चहूबाजूने विस्तारलेल्या शहरात आणि ग्रामीण हद्दीतील रहिवासी वसाहतींतही ‘नाद’ करण्यात मोठा उत्साह दिसला. जवळपास १५ मिनीटांपर्यंत विविध

राजकोट - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार २२ मार्च रोजी देशातील नागरिकांनी जनात कर्फ्युचं पालन केलं. त्यानंतर, दिवसभर जनता कर्फ्यूत सहभागी झालेल्या नागरिकांनी सायंकाळी ५ वाजता टाळी, थाळी, घंटा आणि शंखनाद करुन गो-कोरोना-गो अशी साद घातली. सुमारे १५ मिनीटे सुरु असलेल्या या उपक्रमानंतर नागरिक पुन्हा घरात विसावले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्माचारी, पोलीस, डॉक्टर्स, नर्स आणि इतर नागरिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मोदींनी देशवासियांना टाळी अन् थाळी वाजविण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनाला देशवासियांनी मोठा प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे गुजरातमध्ये एका वसाहतीत आजही दररोज  सायंकाळी ५ वाजता घराबाहेर येऊन ही कृतज्ञता व्यक्त कली जात आहे.  

मोदींच्या आवाहनुनसार देशभरात चहूबाजूने विस्तारलेल्या शहरात आणि ग्रामीण हद्दीतील रहिवासी वसाहतींतही ‘नाद’ करण्यात मोठा उत्साह दिसला. जवळपास १५ मिनीटांपर्यंत विविध साहित्यासह डफ आणि ढोलचा नाद केल्यानंतर नागरिकांनी देशभक्तीचा नारा देत समारोप केला होता. यावेळी त्यांनी दिलेल्या भारतमाता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी काही नागरिकांनी चक्क रस्त्यावर येऊन रॅलीच काढली, तर काहींनी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासत एकत्र जमाव केला. विशेष म्हणजे मोदींनी केलेल्या या आवाहनाला उद्या १ महिना पूर्ण होत आहे. मात्र, २२ मार्चपासून आजतागायत गुजरातच्या राजकोट येथील एका रहिवासी वसाहतीमधील सर्वच नागरिक आजही अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. 

दररोज सांयकाळी ५ वाजता हे नागरिक आपल्या घरााबाहेर किंवा बाल्कीनत सोशल डिस्टन्सिंग पाळून एकत्र येतात. त्यानंतर, पुढील काही मिनिटांसाठी टाळी, थाळी आणि शंख नाद करतात. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे आता ३ मे पर्यंत हे नागरिक, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. दरम्यान, ५ एप्रिल रोजी मोदींनी घरातील लाईट्स बंद करुन ९ मिनिटांसाठी दिवे, किंवा मोबाईल टॉर्चच्या माध्यमातून कोरोनाविरुद्धच्या लढाईत देश एकत्र असल्याचा संदेश देण्याचं आवाहन केलं होतं. मोदींच्या या आवाहनालाही नागरिकांनी उंदड प्रतिसाद दिला. 

टॅग्स :Gujaratगुजरातcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी