शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

coronavirus: कोरोना लसीकरणासाठी समित्या स्थापन करा, केंद्राची राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 07:02 IST

Coronavirus News : पंतप्रधानांनी अलीकडेच मुलाखतीत लसीविषयी भाष्य करताना प्रत्येक नागरिकापर्यंत प्रतिबंधक लस पोहोचेल, अशी व्यवस्था केली जाईल, असे स्पष्ट केले होते.

नवी दिल्ली : कोरोनावरील प्रतिबंधक लस प्रत्येक नागरिकाला दिली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली असतानाच या लसीच्या वितरणासाठी नियोजनाची तयारी सुरू झाली आहे. लसीच्या वितरणासाठी राज्यांनी समन्वय समित्यांची स्थापना करावी, अशी सूचना केंद्राने सर्व राज्यांना केली आहे. पंतप्रधानांनी अलीकडेच मुलाखतीत लसीविषयी भाष्य करताना प्रत्येक नागरिकापर्यंत प्रतिबंधक लस पोहोचेल, अशी व्यवस्था केली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार केंद्रीय पातळीवर नियोजन सुरू झाले आहे. सुमारे वर्षभर चालणाऱ्या या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी राज्यांनी समन्वय समित्यांची स्थापना करावी, असे सुचवले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून या मोहिमेसाठी काय तयारी करावी, याबाबतच्या सूचना केल्या आहेत. राज्यांनी राज्य व जिल्हा पातळ्यांवर समन्वय समित्यांची स्थापना करणे व राज्य आणि जिल्हा कृती दलांची स्थापना करण्यास सुचविले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समावेशापासून या समित्यांच्या स्थापनेची सुरुवात होईल. समन्वयासाठी जबाबदाऱ्या1. लस साठवणुकीसाठी शीतगृहे परिपूर्ण आहेत का, हे तपासणे2. प्रत्यक्ष मोहीम राबविण्यासाठी आवश्यक असलेली सज्जता तपासणे3. एखाद्या राज्यात मोहीम राबविण्यात अडचण येत असेल तर त्यावर तोडगा काढणे4. अतिदुर्गम भागातही प्रतिबंधक लस विनासायास पोहोचेल, यासाठी नियोजन करणे

प्राेत्साहनासाठी बक्षीस याेजना राबवा समाजमाध्यमांवर लसीविषयी कोणत्याही प्रकारचा अपप्रचार होऊ नये, यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच आरोग्यासंदर्भात सद्य:स्थितीत सुरू असलेल्या कोणत्याही योजनांना बाधा येऊ न देता वर्षभर लसीकरण मोहीम राबवण्याची सूचना केली आहे. सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या जिल्हे, गट तसेच ग्रामीण भागातील प्रभागांना प्रोत्साहित करण्यासाठी बक्षीस योजना राबविण्यास सुचविले आहे. मोहिमेत जनसहभाग वाढावा यासाठी कल्पक योजना राज्यांनी राबवाव्यात असेही पत्रात नमूद आहे.देशात कोरोनाचे ४८,६४८ नवे रुग्ण देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१५ टक्क्यांवर पोहोचले आहे तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६ लाखांहून कमी झाली आहे. शुक्रवारी ४८,६४८ नवे कोरोना रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या ८० लाख ८८ हजार झाली आहे. या संसर्गातून ७३ लाख ७३ हजारांहून अधिक जण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५० टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार