शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

Coronavirus : दुकानदार अन् भाजीवाल्यांना मिळणार ई-पास; घरोघरी पोहोचवलं जाणार सामान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 14:31 IST

किराणा माल आणि भाजीपाल्याला खरेदी करण्याची मुभा दिली असतानाही लोकांनी घोळक्यानं, तर कुठे रांगेत उभे राहून गर्दी गेल्याचं चित्र होतं.

ठळक मुद्देभारतात कोरोनाचे रुग्ण ५६०च्या वर गेले असून, आतापर्यंत या जीवघेण्या रोगानं ११ जण दगावलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काल २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. रात्री सामान खरेदी करण्यासाठी ग्राहकांची दुकानांबाहेर गर्दी पाहायला मिळाली. किराणा माल आणि भाजीपाल्याला खरेदी करण्याची मुभा दिली असतानाही लोकांनी घोळक्यानं, तर कुठे रांगेत उभे राहून गर्दी गेल्याचं चित्र होतं.

नवी दिल्लीः देशात कोरोनानं अक्षरशः कहर केलेला आहे. भारतात कोरोनाचे रुग्ण ५६०च्या वर गेले असून, आतापर्यंत या जीवघेण्या रोगानं ११ जण दगावलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काल २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. रात्री सामान खरेदी करण्यासाठी ग्राहकांची दुकानांबाहेर गर्दी पाहायला मिळाली. किराणा माल आणि भाजीपाल्याला खरेदी करण्याची मुभा दिली असतानाही लोकांनी घोळक्यानं, तर कुठे रांगेत उभे राहून गर्दी गेल्याचं चित्र होतं. त्यावर आता दिल्लीतल्या केजरीवाल सरकारनं तोडगा काढला आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिल्लीतल्या दुकानदार आणि भाजीपाला विकणाऱ्यांना ई-पास देण्याची घोषणा केली आहे. लोकांनी घरातच थांबावे आणि दुकानांबाहेर गर्दी करू नये. तसेच लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण काल पाहिलं, त्यानंतर अत्यावश्यक सामान खरेदी करण्यासाठी दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं बंद करण्यात येणार नाहीत. मी जनतेला पुन्हा सांगू इच्छितो की, घाबरून सामान खरेदी करू नका. अत्यावश्यक सामानाचा कोणताही तुटवडा नाही. अत्यावश्यक सामान विक्रेत्यांना ई-पास देण्यात येणार आहे. जे कोणी आपली दुकानं आणि कारखाना उघडणार असतील, त्यांना ई-पासची सुविधा पुरविण्यात येणार आहे.  कोणत्याही समस्येसाठी हेल्पलाइन जारीकोणत्याही प्रकारच्या अडचणीसाठी हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत. जर कोणालाही काही त्रास असल्यास हेल्पलाइन नंबर- 23469536 कॉल करून अडचण सांगावी.दिल्लीतल्या संक्रमितांची संख्या ३१वरआरोग्य विभागानुसार, मंगळवार संध्याकाळी दिल्लीत कोरोना संशयित सापडला आहे. त्याच्यात कोरोनाची लक्षणं आढळून आली असून, रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच आरोग्य विभागानं रुग्णाचे तपासणी अहवाल पुन्हा पडताळून पाहण्यासाठी पुण्यातील आयसीएमआर लॅबमध्ये पाठवले आहेत. रिपोर्ट आल्यानंतरच रुग्ण कोरोनाबाधित आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या