शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सायकलला प्रोत्साहन द्या; केंद्राची राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 03:56 IST

वाहतुकीचे व्यवहार व्हावेत विनारोकड

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात संसर्गापासून वाचण्यासाठी अनेक जण स्वत:च्या वाहनाने प्रवास करणे पसंत करत आहेत. मात्र सायकलसारख्या (ज्यात इंजिनाचा वापर नाही) वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्यास लोकांना प्रोत्साहन द्यावे, अशी सूचना केंद्राने राज्य सरकारांना केली आहे.वाहतूक व्यवस्थेचे सर्व व्यवहार विनारोकड (कॅशलेस) व्हावेत यासाठी राज्य सरकारांनी प्रयत्न करायला हवेत असे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये सायकलस्वारांसाठी ४० मैलाचे नवे रस्ते बनविण्यात आले आहेत. आॅकलंडमध्ये १० टक्के रस्ते मोटरकार व अन्य वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्या रस्त्यांवरून फक्त सायकलस्वार जाऊ शकतील. ही उदाहरणे गृह मंत्रालयाने राज्यांसमोर मांडली आहेत. विविध राज्ये व मेट्रो रेल्वे कंपन्यांना लिहिलेल्या एका पत्रात केंद्रीय गृह सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी म्हटले आहे की, सायकलीसारख्या वाहनांचा वापर वाढावा यासाठी देशपातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. पाच किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी सायकलसारख्या वाहनाचा लोकांनी उपयोग केला तर त्याचे अनेक फायदे होतील. अशा वाहतूक व्यवस्थेला कमी मनुष्यबळ लागेल, ती वाहतूक व्यवस्था त्वरित अमलात आणता येईल. प्रदूषण अजिबात होणार नाही.दीर्घकालीन उपाययोजना अमलात आणाकेंद्रीय गृह सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी सांगितले की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी दीर्घकालीन तीन टप्प्यांची योजना आखायला हवी. त्यामध्ये सहा महिने, एक वर्ष व एक ते तीन वर्षांकरिता करावयाच्या उपाययोजनांची आखणी करावी. फिजिकल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम पाळून वाहतूक व्यवस्थेचे संचालन केले जावे. वाहतूक व्यवस्थेतील सर्व व्यवहार विनारोकड होण्यासाठी भीम, फोनपे, गुगल पे, पेटीएम, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आदी पयार्यांचा वापर करण्यात यावा.प्रवासी क्षमता कमीकोरोना साथीच्या काळात देशातील मेट्रो, बससेवेची २५ ते ५० टक्केच प्रवासी क्षमता उपयोगात आणावी असे केंद्राने राज्यांना सुचविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या