शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Coronavirus: चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होते? केंद्र सरकारनं दिलं 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 14:41 IST

सध्या कोरोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली आहे. या व्हायरसच्या कचाट्यात आतापर्यंत ४३ हजार नागरिक सापडले

ठळक मुद्देलोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नयेजगभरात कुठेही कोरोना व्हायरसचा संबंध पोल्ट्री उत्पादनाशी नाहीकोरोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली आहे.

नवी दिल्ली - चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतीय नागरिकांच्या मनात आहे. यात व्हायरसबाबत अनेक अफवांना उधाण आलं आहे. चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होईल अशी अफवा लोकांमध्ये पसरली आहे. त्यामुळे चिकन विक्रीतही घट झाली आहे. चिकन खाण्यापासून लोक दूर जात आहेत. 

मात्र केंद्र सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. केंद्रीय पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितले की, लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, पोल्ट्री उत्पादनाशी कोरोना व्हायरसचा काहीही संबंध नाही, चिकन पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे लोकांनी चिकन खाणं टाळू नये. त्याचसोबत जगभरात कुठेही कोरोना व्हायरसचा संबंध पोल्ट्री उत्पादनाशी नाही तसेच त्या व्यवसायाशी संबंध असलेल्या कोणलाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

भावा, हीच तर आपली मैत्री; पंतप्रधान मोदींच्या 'त्या' पत्राला चीनने दिलं उत्तर 

याबाबत पशु उत्पादन मंत्रालयाकडून अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे की, लवकरच लोकांसाठी सूचना पत्र जारी करण्यात यावं. पोल्ट्री उत्पादनात कोरोना व्हायरस पसरतो या अफवेमुळे देशभरातील कृषी उद्योगाशी संबधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली. या मुलाखतीनंतर याबाबत केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 

चीन सरकार २०,००० कोरोनाग्रस्तांना मारणार?; जाणून घ्या बातमीमागचं सत्य

सध्या कोरोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली आहे. या व्हायरसच्या कचाट्यात आतापर्यंत ४३ हजार नागरिक सापडले असून यातील १ हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात पसरला आहे. चीनच्या वुहान शहरात नागरिकांना घरामध्येच कैद करुन ठेवण्यात आलं आहे. भारतातही या आजाराचे काही रुग्ण आढळल्याची माहिती आहे. 

मोदीसाहेब! माझ्या मुलाला वाचवा, जपानमध्ये अडकलेल्या लेकासाठी बापाची आर्त हाक

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांना पत्र लिहून कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारत मदत करण्यास तयार आहे असं सांगितले आहे. या पत्रात मोदींनी कोरोना व्हायरसच्या विरोधात आम्ही चीनमधील लोकांच्यासोबत आहोत. त्याचसोबत चीनच्या हुबेई प्रांतात अडकलेल्या ६५० भारतीयांना एअरलिफ्ट करण्यास मदत केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी चीनफिंग यांचे कौतुकही केले होते. यावर चीनने भारताचं कौतुक करत तुम्ही करत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. पंतप्रधान मोदींच्या या पत्रामुळे चीनशी असलेल्या भारताच्या मैत्रीचे प्रतिबिंब उमटले असं चीनकडून सांगण्यात आलं. 

हवेच्या माध्यमातून लोकांमध्ये पसरतोय कोरोना व्हायरस; शांघाय अधिकाऱ्यांचा दावा 

टॅग्स :corona virusकोरोनाCentral Governmentकेंद्र सरकारHealthआरोग्यchinaचीन