शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

coronavirus: केंद्र सरकारकडून दिल्लीला मिळत असलेल्या मदतीबाबत अरविंद केजरीवाल यांनी केले मोठे विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 14:52 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. मात्र कोरोना विषाणूमुळे आलेल्या संकटानंतर केजरीवाल यांनी केंद्र सरकारबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्राकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे म्हटले आहेतआम्ही जेव्हा जेव्हा पीपीई किट्स, व्हेटिंलेटरबाबत मदत मागितली, तेव्हा केंद्राने ती मदत उपलब्ध करून दिली दिल्लीतील आयोग्य यंत्रणा कोरोनाच्या ५० हजारांपर्यंत रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम आहे

नवी दिल्ली - सध्या देशात कोरोना विषाणूच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. त्यात दिल्लीतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० हजारांवर पोहोचली आहे. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दरम्यान, उल्लेखनीय बाब म्हणजे देशातील काँग्रेसशासित राज्ये केंद्र सरकारवर सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करत आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्राकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे म्हटले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. मात्र कोरोना विषाणूमुळे आलेल्या संकटानंतर केजरीवाल यांनी केंद्र सरकारबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या मदतीबाबत केजरीवाल म्हणाले की, सद्यस्थितीत केंद्र सरकारबाबत आपली काहीच तक्रार नाही. या संकटाच्या काळात केंद्र सरकारने दिल्लीसोबत सापत्न वागणुकीसारखे काही केले नाही. आम्ही जेव्हा जेव्हा पीपीई किट्स, व्हेटिंलेटरबाबत मदत मागितली, तेव्हा केंद्राने ती मदत उपलब्ध करून दिली. मात्र ही बाब म्हणजे केंद्र सरकारसोबत मैत्री वगैरे काही नाही. पण दिल्ली सरकार सध्या कुठल्याही विवादात पडण्यापेक्षा कोरोनावर मात करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

इतर राज्यांप्रमाणे शेतकरी, बारा बलुतेदारांना पॅकेज द्या, देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी 

सदस्य देशांच्या दबावासमोर WHO झुकली, कोरोना विषाणूसंबधी तपासास मान्यता

कोहळा दाखवून आवळा? आर्थिक पॅकेजवर सरकारच्या तिजोरीतून होणार केवळ एवढीच रक्कम खर्च

दरम्यान, दिल्लीमध्ये लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळणे आवश्यक असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. तसेच स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी दिल्लीमधून किमान ५० ते १०० ट्रेन चालवण्यात आल्या पाहिजेत, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली. तसेच दिल्लीतील आयोग्य यंत्रणा कोरोनाच्या ५० हजारांपर्यंत रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम आहे, असा दावाही केजरीवाल यांनी केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालCentral Governmentकेंद्र सरकार