शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

coronavirus: केंद्र सरकारकडून दिल्लीला मिळत असलेल्या मदतीबाबत अरविंद केजरीवाल यांनी केले मोठे विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 14:52 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. मात्र कोरोना विषाणूमुळे आलेल्या संकटानंतर केजरीवाल यांनी केंद्र सरकारबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्राकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे म्हटले आहेतआम्ही जेव्हा जेव्हा पीपीई किट्स, व्हेटिंलेटरबाबत मदत मागितली, तेव्हा केंद्राने ती मदत उपलब्ध करून दिली दिल्लीतील आयोग्य यंत्रणा कोरोनाच्या ५० हजारांपर्यंत रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम आहे

नवी दिल्ली - सध्या देशात कोरोना विषाणूच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. त्यात दिल्लीतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० हजारांवर पोहोचली आहे. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दरम्यान, उल्लेखनीय बाब म्हणजे देशातील काँग्रेसशासित राज्ये केंद्र सरकारवर सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करत आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्राकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे म्हटले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. मात्र कोरोना विषाणूमुळे आलेल्या संकटानंतर केजरीवाल यांनी केंद्र सरकारबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या मदतीबाबत केजरीवाल म्हणाले की, सद्यस्थितीत केंद्र सरकारबाबत आपली काहीच तक्रार नाही. या संकटाच्या काळात केंद्र सरकारने दिल्लीसोबत सापत्न वागणुकीसारखे काही केले नाही. आम्ही जेव्हा जेव्हा पीपीई किट्स, व्हेटिंलेटरबाबत मदत मागितली, तेव्हा केंद्राने ती मदत उपलब्ध करून दिली. मात्र ही बाब म्हणजे केंद्र सरकारसोबत मैत्री वगैरे काही नाही. पण दिल्ली सरकार सध्या कुठल्याही विवादात पडण्यापेक्षा कोरोनावर मात करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

इतर राज्यांप्रमाणे शेतकरी, बारा बलुतेदारांना पॅकेज द्या, देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी 

सदस्य देशांच्या दबावासमोर WHO झुकली, कोरोना विषाणूसंबधी तपासास मान्यता

कोहळा दाखवून आवळा? आर्थिक पॅकेजवर सरकारच्या तिजोरीतून होणार केवळ एवढीच रक्कम खर्च

दरम्यान, दिल्लीमध्ये लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळणे आवश्यक असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. तसेच स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी दिल्लीमधून किमान ५० ते १०० ट्रेन चालवण्यात आल्या पाहिजेत, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली. तसेच दिल्लीतील आयोग्य यंत्रणा कोरोनाच्या ५० हजारांपर्यंत रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम आहे, असा दावाही केजरीवाल यांनी केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालCentral Governmentकेंद्र सरकार