शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

coronavirus: केंद्र सरकारकडून दिल्लीला मिळत असलेल्या मदतीबाबत अरविंद केजरीवाल यांनी केले मोठे विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 14:52 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. मात्र कोरोना विषाणूमुळे आलेल्या संकटानंतर केजरीवाल यांनी केंद्र सरकारबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्राकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे म्हटले आहेतआम्ही जेव्हा जेव्हा पीपीई किट्स, व्हेटिंलेटरबाबत मदत मागितली, तेव्हा केंद्राने ती मदत उपलब्ध करून दिली दिल्लीतील आयोग्य यंत्रणा कोरोनाच्या ५० हजारांपर्यंत रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम आहे

नवी दिल्ली - सध्या देशात कोरोना विषाणूच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. त्यात दिल्लीतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० हजारांवर पोहोचली आहे. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दरम्यान, उल्लेखनीय बाब म्हणजे देशातील काँग्रेसशासित राज्ये केंद्र सरकारवर सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करत आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्राकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे म्हटले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. मात्र कोरोना विषाणूमुळे आलेल्या संकटानंतर केजरीवाल यांनी केंद्र सरकारबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या मदतीबाबत केजरीवाल म्हणाले की, सद्यस्थितीत केंद्र सरकारबाबत आपली काहीच तक्रार नाही. या संकटाच्या काळात केंद्र सरकारने दिल्लीसोबत सापत्न वागणुकीसारखे काही केले नाही. आम्ही जेव्हा जेव्हा पीपीई किट्स, व्हेटिंलेटरबाबत मदत मागितली, तेव्हा केंद्राने ती मदत उपलब्ध करून दिली. मात्र ही बाब म्हणजे केंद्र सरकारसोबत मैत्री वगैरे काही नाही. पण दिल्ली सरकार सध्या कुठल्याही विवादात पडण्यापेक्षा कोरोनावर मात करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

इतर राज्यांप्रमाणे शेतकरी, बारा बलुतेदारांना पॅकेज द्या, देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी 

सदस्य देशांच्या दबावासमोर WHO झुकली, कोरोना विषाणूसंबधी तपासास मान्यता

कोहळा दाखवून आवळा? आर्थिक पॅकेजवर सरकारच्या तिजोरीतून होणार केवळ एवढीच रक्कम खर्च

दरम्यान, दिल्लीमध्ये लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळणे आवश्यक असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. तसेच स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी दिल्लीमधून किमान ५० ते १०० ट्रेन चालवण्यात आल्या पाहिजेत, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली. तसेच दिल्लीतील आयोग्य यंत्रणा कोरोनाच्या ५० हजारांपर्यंत रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम आहे, असा दावाही केजरीवाल यांनी केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालCentral Governmentकेंद्र सरकार