शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

CoronaVirus: कोरोनापासून लष्कराला दूर ठेवण्यात यश- राजनाथसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 06:45 IST

सीमापलीकडील आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज

नवी दिल्ली : देशाच्या लष्करातील जवानांना कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले आहे असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. सीमेपलीकडून येणाºया कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे, असेही त्यांनी सांगितले.देशात कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या मंत्रीगटाचे राजनाथ सिंह हे प्रमुख आहेत. ते म्हणाले की, भारताच्या तीनही संरक्षण दलांच्या जवानांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अतिशय काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी काही नियमही तयार केले असून त्यांचे जवानांकडून अत्यंत काटेकोर पालन होत आहे. सीमेपलीकडून कोणीही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल.वेस्टर्न नेव्हल कमांडच्या २६ नौसैनिकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ माजली होती. या साथीमुळे लष्कराच्या हालचालींवर तसेच युद्धसज्जतेवर परिणाम झाला असल्याची चर्चा होती. त्या गोष्टीचा राजनाथ सिंह यांनी ठाम शब्दांत इन्कार केला. ते म्हणाले की, भारताचे लष्कर कोणत्याही स्थितीचा मुकाबला करायला सक्षम आहे. कोरोना साथीच्या दिवसांतही दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत खंड पडलेला नाही. सीमेपलीकडून दहशतवाद्यांची काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत.लष्कराकडून वैद्यकीय, अभियांत्रिकी मदतराजनाथसिंह म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात देशातील अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत राहावा तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी मदत यासाठी लष्कराचे साहाय्य घेण्यात येत आहे. विदेशांतही मदत पाठविण्यासाठी लष्करी जवानांचे सहकार्य मोलाचे ठरत आहे.कोरोना साथीचा फैलाव आणखी वाढू नये याकरिता सोशल डिस्टन्सिंग करणे, लष्करी छावणीचा परिसर निर्जंतुक करणे, घरातून काम करणे असे अनेक उपाय लष्कराने योजले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajnath Singhराजनाथ सिंहIndian Armyभारतीय जवान