शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: 'रामायण' मालिकेचा श्रेयवाद, दिग्विजय सिंहांनी सांगितलं राजीव गांधी कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 14:43 IST

रामायण मालिका शनिवारी सकाळी सुरु झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या घरात रामायण मालिका पाहात असल्याचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला होता

मुंबई - रामायण आणि महाभारत या मालिकांना नव्वदीच्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या मालिका सुरू असताना लोक आपापल्या घरातच थांबत असत. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट असायचा. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने आपल्याला सगळीकडेच अतिशय शांत वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमुळे लोकांना रामायण आणि महाभारत या कार्यक्रमांची आठवण आली आहे. रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिकांचे या काळात पुन्हा प्रक्षेपण केले जावे अशी मागणी सोशल मीडियावर होत होती आणि आता तर प्रेक्षकांना शनिवारपासून रामायण ही त्यांची आवडती मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळाली. मात्र, मोदी सरकार आणि भाजपा सरकार या मालिकांच्या प्रक्षेपणाचे श्रेय घेत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी ट्विटरवरुन या मालिकांचं श्रेय हे राजीव गांधींच असल्याचं म्हटलंय. 

रामायण मालिका शनिवारी सकाळी सुरु झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या घरात रामायण मालिका पाहात असल्याचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला होता. मात्र, नेटीझन्सने ट्विटरवरुन त्यांच्या या फोटोवर, देशातील सद्यपरिस्थीचा उहापोह केला. तसेच, केंद्रीयमंत्र्यांनी देशातील स्थितीकडे लक्ष द्यावे, कार्यालयीन बैठका घरात घ्याव्यात, रामायण काय पाहता, असे म्हणत जावडेकर यांना चांगलेच सुनावले. त्यानंतर, जावडेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरील रामायण पाहतानाचा फोटो डिलिट केला. मात्र, भाजपा नेत्यांकडून या मालिकांचे प्रमोशन करण्यात येत असून याच्या पनप्रक्षेपणाचे श्रेय लाटण्यात येत आहे. यावरुन दिग्विजय सिंह यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला टार्गेट केलंय. तसेच, देशाचे माजी पंतप्रधान आणि दिवंगत नेते राजीव गांधींच्या सांगण्यावरुनच रामानंद सागर यांनी रामायण मालिकेची निर्मित्ती केली होती, असे सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन म्हटलंय. 

दरम्यान, महाभारत या मालिकेला इतकी वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. बी.आर.चोप्रा आणि रवी चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत नितीश भारद्वाज, मुकेश खन्ना, गजेंद्र चौहान, प्रवीण कुमार, अर्जुन, पुनीत इस्सार, पंकज धीर, गुफी पेंटल आणि रुपा गांगुली यांच्या मुख्य भूमिका होत्या. आज इतक्या वर्षांनी देखील प्रेक्षक या मालिकेतील कलाकारांना खऱ्या नावाने नव्हे तर या मालिकेतील व्यक्तिरेखांच्या नावानेच ओळखतात. कदाचित, त्यामुळेच जावडेकर यांनी रामायण पाहतानाचा फोटो ट्विटरवर अपलोड केला होता.   

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याDigvijaya Singhदिग्विजय सिंहramayanरामायण