शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत उद्याचा दिवस महत्त्वाचा का आहे?; डॉक्टरांना मिळणार मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 11:42 IST

राजस्थानच्या जोधपूर येथील ३९ वर्षीय इसम दिल्लीहून जयपूरला ट्रेनने आला. त्याला कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं.

ठळक मुद्दे ज्याठिकाणी लॉकडाऊनची गरज आहे तिथे लॉकडाऊन करावंकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना निर्देश देशात कोरोनाचा सामूहिक स्तरावर प्रार्दुभाव सुरु?

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस हळूहळू जगातील अन्य देशात शिरकाव करत आहे. चीननंतर इटलीला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीत एका दिवसाला ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे.. वाऱ्याच्या वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात १४ हजारांपेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे भारतात ४०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ८९ वर पोहचली आहे. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ५३ वरुन वाढून ८९ वर आली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव किती जलदगतीने होत आहे याचा अंदाज येऊ शकतो.

भारतात कोरोनाचा प्रार्दुभाव सामूहिक स्तरावर होणं सुरु झालंय का? या प्रश्नाच्या उत्तरावर भारतीय आरोग्य संशोधन परिषदेचे तज्ज्ञ डॉ. आर.आर गंगाखेडकर यांनी सांगितलं की, याबाबत निश्चित मंगळवारी सांगता येऊ शकेल. भारतात कम्यूनिटी ट्रान्समिशन(सामूहिक संसर्ग) होत आहे की नाही, हे आता आम्ही सांगण्याच्या स्थितीत नाही. मॅथमेटिकल मॉडलिंगवर काम सुरु आहे. मंगळवारपर्यंत आम्हाला याबाबत माहिती मिळू शकते असं त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र, केरळ, दिल्लीला फटका

सूरतमध्ये ६९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. गुजरातमध्ये कोरोना लागण झालेले ते पहिले रुग्ण होते. कोणताही परदेश दौरा त्यांनी केला नव्हता. मात्र व्हायरस प्रभावित दिल्ली आणि जयपूर येथे ते गेले होते. गुजरातमध्ये कोरोनाचे ७ रुग्ण आढळले. ज्यातील तिघांचे वय ६० पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत ८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केरळमध्ये ६७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना निर्देश

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले की, कोरोना लागण झालेल्या विभागांची माहिती आणि धोका कितपत आहे त्याचे संकलन राज्यस्तरावर करण्यास सांगितले आहे. ज्याठिकाणी लॉकडाऊनची गरज आहे तिथे लॉकडाऊन करावं. कोरोनाचा प्रार्दुभाव जलदगतीने होत आहे. त्यामुळे संसर्गजन्य कोरोनाची ही चैन तोडणं गरजेचे आहे असं ते म्हणाले.

हलगर्जीपणाचं उदाहरण

राजस्थानच्या जोधपूर येथील ३९ वर्षीय इसम दिल्लीहून जयपूरला ट्रेनने आला. त्याला कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं. राजस्थानमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या २६ आहे. तो अलीकडेच तुर्की येथे गेला होता. १८ मार्चला तो पुन्हा परतला. त्यासह पंजाबमध्ये ७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. बलदेव सिंग यांचे कुटुंब जर्मनी आणि इटलीला फिरुन आले. यातील २ जणांना कोरोनाची लागण आहे. बलदेव सिंग यांचे सहकारी दलजिंदर सिंग परदेशातून परतल्यानंतर लोकांना भेटण्याचं काम करतायेत.

आयसीएमआरचे डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, ८० टक्के सामान्य आजाराची लक्षण आहेत त्यांना कोरोना लागण झाल्याचं कळत नाही. २० टक्के लोकांना कोरोनाची लागण झालेली असते. यातील ५ टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासते. गंभीर स्वरुपाच्या रुग्णांची वेगवेगळी ओळख करण्यात आली आहे. काही औषध संयुक्त मिश्रणाने वापरण्यात येत आहेत. मात्र अद्याप कोणतंही औषध कोरोनावर तयार झालं नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर